शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

पोलीस जेव्हा सत्ताधाऱ्यांच्या 'सोंगट्या' बनतात...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 09:00 IST

सत्ताधाऱ्यांच्या ‘गुड बूक’मध्ये असलेले पोलीस अधिकारी, सत्तापालटानंतर ‘बॅड लिस्ट’मध्ये जातात आणि अखेरीस मानसिक त्रासाचे धनी होतात!

- दिनकर रायकर

ज्याचे राज्य त्याचे शिलेदार जास्त ताकदवर, ही पूर्वापार चालत आलेली परंपरा. पण, या परंपरेचे पाईक कोणी असावे, याचे तारतम्य असणेही गरजेचे असते. या पंक्तीत जर उच्चपदस्थ अधिकारी येऊ लागले तर लोकशाहीच्या तीन स्तभांपैकी एका स्तंभाची प्रतिमा मलिन होऊ लागते. दुर्दैवाने देशात हे सातत्याने होत असल्याचे दिसते. सत्ता बदलली की काही अधिकारी वरचढ होतात आणि आधीच्या सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांना त्रास देण्यास सुरुवात होते. मग, प्रश्न पडतो की, अधिकारी वर्ग सत्ताधीशांच्या हातचे बाहुले होतात का? होत असतील तर कशासाठी? सत्ताधारी त्यांचा वापर आपल्या ‘कामां’साठी करून घेतात का? असे असेल तर ते लोकशाहीसाठी घातक नाही का? 

गेल्या आठवड्यात अशाच विषयांवर सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला. तो देताना न्यायालयाने नोंदविलेले निरीक्षण डोळ्यांत अंजन घालणारे होते. त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे लोकशाहीच्या दुसऱ्या स्तंभाची अवहेलना होत असताना गप्प बसण्यासारखे होईल.खटला अगदी आपल्याकडच्या अनेक खटल्यांसारखाच. गुरजिंदर पाल सिंग हे छत्तीसगढचे निलंबित आयपीएस अधिकारी. ते अतिरिक्त पोलीस महासंचालक होते. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. शिवाय त्यांच्यावर राजद्रोहाचा खटलाही दाखल करण्यात आला आहे.

अटक टाळण्यासाठी त्यांनी तेथील उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण, निर्णय त्यांच्या बाजूने लागला नाही. अखेर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला साद घातली. तेथे त्यांचे म्हणणे ग्राह्य धरले गेले आणि न्यायालयाने त्यांना चार आठवड्यांसाठी अटकेपासून संरक्षण दिले. या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने सध्या सुरू असलेल्या ‘सहकार्याच्या ट्रेंड’बद्दल निराशा व्यक्त केली. पोलीस अधिकारी सत्तेत असणाऱ्यांना सहकार्य करतात आणि  सत्ताधारी पक्ष बदलला की नव्या राजवटीत आधीच्या सत्ताधाऱ्यांची मर्जी राखल्याबद्दल त्यांना भोगावे लागते. जोवर पोलीस अधिकारी सत्ताधारी पक्षाची तळी उचलत राहतील, तोवर हा खेळ असाच सुरू राहील आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे मत खंडपीठाने व्यक्त केले.

खंडपीठाच्या या मतामुळे सत्ताधारी आणि पोलीस अधिकारी यांच्यातील संबंध कसे असतात, याचे चित्र पुन्हा नव्याने स्पष्ट झाले आहे.  आधीच्या सत्ताधाऱ्यांच्या ‘गुड बूक’मध्ये असलेले,  सत्ता बदलल्यावर  नव्या सत्ताधाऱ्यांच्या ‘बॅड लिस्ट’मध्ये आलेले,  शिवाय नव्या सत्ताधाऱ्यांचे ऐकले नाही म्हणून मानसिक त्रासाचे धनी झालेले आणि बदली करून घेणारेही अनेक अधिकारी आहेत. सत्ताधाऱ्यांना खूश ठेवण्यासाठी विरोधी पक्षांना त्रास देत राहिल्यास सर्वोच्च न्यायालयाने म्हटले तसे, जेव्हा सत्ता परिवर्तन होते तेव्हा हेच अधिकारी टार्गेटवर येतात.

ज्युलिओ रिबेरो, सुबोध कुमार यांच्यासारखे अधिकारीही आहेत, ज्यांनी सत्ताधाऱ्यांपुढे मान तुकवली नाही. यांचा आदर्श साऱ्याच अधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे. याशिवाय,  राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पदावर असलेल्या अधिकाऱ्यांचा वापर आपण आपल्या फायद्यासाठी करून घ्यावा का, याचे भानही राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी ठेवणे गरजेचे आहे.

राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी प्रशासकीय व्यवस्थेचा मनमानी वापर करणे योग्य आहे का? पोलीस अधिकारी असो वा प्रशासकीय अधिकारी - त्यांनी निःपक्षपातीपणे आपली कर्तव्ये पार पाडावीत आणि कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक दबावाला बळी पडू नये, अशी त्यांच्याकडून अपेक्षा असते. पण, जे सध्या पाहायला मिळते ते निराशाजनक वास्तव आहे. राजकीय पक्ष, सत्ताधारी आणि पोलीस प्रशासन यांच्यातील संगनमत सामान्यांसाठी खेदजनक आहेच; शिवाय त्यांच्या विश्वासाला तडा देणारेही आहे.

सत्ताधाऱ्यांच्या अजेंड्यानुसार पोलीस काम करतात, असा लोकांचा समज होऊ लागला आहे. त्यातून पोलिसांवरील लोकांचा विश्वास कमी होत जाईल. जे समाजासाठी अत्यंत घातक आहे. सर्वोच्च न्यायालयाने अंजन घालण्याचे काम केले, आता अधिकारी वर्गाने आणि सत्ताधाऱ्यांनीही विचार करणे गरजेचे आहे. नाहीतरी न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी दोन दिवसांपूर्वी एका भाषणात म्हटले आहे की, सत्तेला सत्य सांगणे हे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे. असे केले तरच लोकशाही सुदृढ होईल.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय