शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
4
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
5
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
6
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
7
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
8
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
9
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
10
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
11
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
12
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
13
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
14
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
15
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
16
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
17
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
18
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
19
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
20
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस जेव्हा सत्ताधाऱ्यांच्या 'सोंगट्या' बनतात...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 09:00 IST

सत्ताधाऱ्यांच्या ‘गुड बूक’मध्ये असलेले पोलीस अधिकारी, सत्तापालटानंतर ‘बॅड लिस्ट’मध्ये जातात आणि अखेरीस मानसिक त्रासाचे धनी होतात!

- दिनकर रायकर

ज्याचे राज्य त्याचे शिलेदार जास्त ताकदवर, ही पूर्वापार चालत आलेली परंपरा. पण, या परंपरेचे पाईक कोणी असावे, याचे तारतम्य असणेही गरजेचे असते. या पंक्तीत जर उच्चपदस्थ अधिकारी येऊ लागले तर लोकशाहीच्या तीन स्तभांपैकी एका स्तंभाची प्रतिमा मलिन होऊ लागते. दुर्दैवाने देशात हे सातत्याने होत असल्याचे दिसते. सत्ता बदलली की काही अधिकारी वरचढ होतात आणि आधीच्या सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांना त्रास देण्यास सुरुवात होते. मग, प्रश्न पडतो की, अधिकारी वर्ग सत्ताधीशांच्या हातचे बाहुले होतात का? होत असतील तर कशासाठी? सत्ताधारी त्यांचा वापर आपल्या ‘कामां’साठी करून घेतात का? असे असेल तर ते लोकशाहीसाठी घातक नाही का? 

गेल्या आठवड्यात अशाच विषयांवर सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला. तो देताना न्यायालयाने नोंदविलेले निरीक्षण डोळ्यांत अंजन घालणारे होते. त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे लोकशाहीच्या दुसऱ्या स्तंभाची अवहेलना होत असताना गप्प बसण्यासारखे होईल.खटला अगदी आपल्याकडच्या अनेक खटल्यांसारखाच. गुरजिंदर पाल सिंग हे छत्तीसगढचे निलंबित आयपीएस अधिकारी. ते अतिरिक्त पोलीस महासंचालक होते. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. शिवाय त्यांच्यावर राजद्रोहाचा खटलाही दाखल करण्यात आला आहे.

अटक टाळण्यासाठी त्यांनी तेथील उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण, निर्णय त्यांच्या बाजूने लागला नाही. अखेर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला साद घातली. तेथे त्यांचे म्हणणे ग्राह्य धरले गेले आणि न्यायालयाने त्यांना चार आठवड्यांसाठी अटकेपासून संरक्षण दिले. या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने सध्या सुरू असलेल्या ‘सहकार्याच्या ट्रेंड’बद्दल निराशा व्यक्त केली. पोलीस अधिकारी सत्तेत असणाऱ्यांना सहकार्य करतात आणि  सत्ताधारी पक्ष बदलला की नव्या राजवटीत आधीच्या सत्ताधाऱ्यांची मर्जी राखल्याबद्दल त्यांना भोगावे लागते. जोवर पोलीस अधिकारी सत्ताधारी पक्षाची तळी उचलत राहतील, तोवर हा खेळ असाच सुरू राहील आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे मत खंडपीठाने व्यक्त केले.

खंडपीठाच्या या मतामुळे सत्ताधारी आणि पोलीस अधिकारी यांच्यातील संबंध कसे असतात, याचे चित्र पुन्हा नव्याने स्पष्ट झाले आहे.  आधीच्या सत्ताधाऱ्यांच्या ‘गुड बूक’मध्ये असलेले,  सत्ता बदलल्यावर  नव्या सत्ताधाऱ्यांच्या ‘बॅड लिस्ट’मध्ये आलेले,  शिवाय नव्या सत्ताधाऱ्यांचे ऐकले नाही म्हणून मानसिक त्रासाचे धनी झालेले आणि बदली करून घेणारेही अनेक अधिकारी आहेत. सत्ताधाऱ्यांना खूश ठेवण्यासाठी विरोधी पक्षांना त्रास देत राहिल्यास सर्वोच्च न्यायालयाने म्हटले तसे, जेव्हा सत्ता परिवर्तन होते तेव्हा हेच अधिकारी टार्गेटवर येतात.

ज्युलिओ रिबेरो, सुबोध कुमार यांच्यासारखे अधिकारीही आहेत, ज्यांनी सत्ताधाऱ्यांपुढे मान तुकवली नाही. यांचा आदर्श साऱ्याच अधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे. याशिवाय,  राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पदावर असलेल्या अधिकाऱ्यांचा वापर आपण आपल्या फायद्यासाठी करून घ्यावा का, याचे भानही राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी ठेवणे गरजेचे आहे.

राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी प्रशासकीय व्यवस्थेचा मनमानी वापर करणे योग्य आहे का? पोलीस अधिकारी असो वा प्रशासकीय अधिकारी - त्यांनी निःपक्षपातीपणे आपली कर्तव्ये पार पाडावीत आणि कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक दबावाला बळी पडू नये, अशी त्यांच्याकडून अपेक्षा असते. पण, जे सध्या पाहायला मिळते ते निराशाजनक वास्तव आहे. राजकीय पक्ष, सत्ताधारी आणि पोलीस प्रशासन यांच्यातील संगनमत सामान्यांसाठी खेदजनक आहेच; शिवाय त्यांच्या विश्वासाला तडा देणारेही आहे.

सत्ताधाऱ्यांच्या अजेंड्यानुसार पोलीस काम करतात, असा लोकांचा समज होऊ लागला आहे. त्यातून पोलिसांवरील लोकांचा विश्वास कमी होत जाईल. जे समाजासाठी अत्यंत घातक आहे. सर्वोच्च न्यायालयाने अंजन घालण्याचे काम केले, आता अधिकारी वर्गाने आणि सत्ताधाऱ्यांनीही विचार करणे गरजेचे आहे. नाहीतरी न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी दोन दिवसांपूर्वी एका भाषणात म्हटले आहे की, सत्तेला सत्य सांगणे हे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे. असे केले तरच लोकशाही सुदृढ होईल.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय