शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

यूपीत गुन्हेगारीमुक्ती केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2017 23:08 IST

या वर्षाच्या प्रारंभी उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीदरम्यान भारतीय जनता पार्टीने कायदा व व्यवस्थेला प्रमुख मुद्दा बनविले होते.

या वर्षाच्या प्रारंभी उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीदरम्यान भारतीय जनता पार्टीने कायदा व व्यवस्थेला प्रमुख मुद्दा बनविले होते. राज्यातील यापूर्वीच्या मायावती व अखिलेश यादव सरकारवर ‘जंगल राज’चा आरोप करून सत्तारूढ झाल्यास उत्तर प्रदेश ‘गुन्हेगारीमुक्त’ करण्याची ग्वाही दिली होती. परंतु नव्या सरकारच्या तीन महिन्यांच्या कालावधीतील घटनाक्रम बघता या दिशेने फारशी काही सुधारणा झाल्याचे दिसत नाही. उलटपक्षी राज्याच्या अनेक भागातून हत्या, लूटमार आणि बलात्काराच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. विशेषत: सहारनपूर आणि जेवर येथील घटनांनी लोकांमधील दहशत वाढली असतानाच अतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या राज्याच्या विधानसभेतच स्फोटके सापडल्याने येथील कायदा आणि व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विधानसभेच्या सुरक्षेतच एवढ्या त्रुटी असतील तर उर्वरित राज्याची स्थिती काय असणार? हा दहशतवादी हल्ल्याचा कट असल्याचा संशय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणाची राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत (एनआयए) चौकशी व्हावी अशीही त्यांची मागणी आहे. ती होईलही. पण विधानसभेत जेथे एरवी कुठल्याही बाह्य व्यक्तीस परवानगी नसते एखाद्या सदस्याच्या आसनाखाली स्फोटके पोहोचतातच कशी? गेल्या आठवड्यातसुद्धा एका युवकाने विधानभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. त्याला नंतर अटक झाली. पण या घटनांनी योगी सरकारपुढे फार मोठे आव्हान निर्माण केले. खरे तर योगींनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारताच एकापाठोपाठ एक निर्णयांचा जो सपाटा लावला होता तो बघता आता लवकरच उत्तर प्रदेशचा चेहरामोहरा बदलणार अशी आशा त्या राज्यातील जनतेसह साऱ्या देशवासीयांना वाटली होती. मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत शेतकऱ्यांना एक लाखापर्यंतची कर्जमाफी देऊन निवडणूक जाहीरनाम्याच्या आधारे कामाचा एक नवा पायंडा योगींनी घातला आणि त्यानंतर महापुरुषांच्या नावावर सुट्या रद्द करणे, अवैध कत्तलखान्यांवर कठोर कारवाई, भूमाफियांवर लगाम कसण्यासाठी कृती दल, रस्ते खड्डेमुक्त करण्याचे अभियान, सरकारी कार्यालयांची स्वच्छता, गावात १८ आणि शहरात २४ तास वीज, अ‍ॅन्टी रोमिओ स्क्वाड अशी निर्णयांची जणू झडच लागली. परंतु राज्यातील विद्यमान परिस्थिती बघता भाजपाच्या स्वप्नातील उत्तर प्रदेश साकारण्यास योगींना अजूनही बरीच मजल मारावी लागणार हे स्पष्ट दिसून येते. आणि योगी लवकरच राज्य गुन्हेगारीमुक्त करू शकले नाही तर मात्र जनतेचा अपेक्षाभंग होईल.