शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
8
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
9
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
10
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
11
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
12
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
13
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
14
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
15
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
16
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
17
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
18
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
19
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
20
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय

चूक काय गुडेवारांची ?

By admin | Updated: May 13, 2016 00:04 IST

अमरावती महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या बदलीवार्ताने अवघे शहर ढवळून निघाले आहे.

लोकमत प्रासंगिकअमरावती महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या बदलीवार्ताने अवघे शहर ढवळून निघाले आहे. केवळ राजकीय प्रतिष्ठेपोटी करण्यात आलेली ही बदली सामान्य नागरिकांच्या जिव्हारी लागली आहे. शहरभरातून आता एकच सवाल विचारला जात आहे- चूक काय गुडेवारांची? चंद्रकांत गुडेवार हे अमरावती महापालिकेचे आयुक्त म्हणून अवघ्या वर्षभरापूर्वी रूजू झालेत. कधी नव्हे तो आश्चर्यकारक बदल अमरावतीकर अनुभवू लागले आहेत. अमरावती शहरात होणारी रस्ते, नाल्या, पेव्हींग ब्लॉकची कामे अचानक कशी दर्जेदार होत आहेत. शहर स्वच्छतेत झालेला बदल नोंद घेण्याजोगा आहे. सामान्यांचा घामाचा पैसा सदुपयोगी लागतो आहे. महापालिकेतील दलाली संपुष्टात आली आहे. नागरिकांना थेट आयुक्तांचे दालन खुले आहे. कंत्राटदारी भ्रष्टाचाराशिवाय होऊच शकत नाही, असाच सर्वत्र समज आहे. अमरावती महापालिका त्याच चाकोरीतून प्रवास करीत आली आहे. परंतु आता कंत्राटदार सांगतात ते अविश्वसनीयच आहे. एक उदाहरण नोंदविण्याजोगे आहे. राजू मुंदडा आणि महेंद्रसिंग बैस हे जिल्हा परिषदेत कंत्राट स्वीकारणारे कंत्राटदार. ते म्हणाले, आम्ही महापालिकेत कंत्राटासाठीची नोंदणी केली. नोंदणी केली की, संबंधित टेबलवर पन्नास हजार रुपये ठेवावेच लागतात. सर्वत्र हा नियम सारखा आहे. आम्ही कंत्राटदारांनीही तो स्वीकारलेला आहे. नोंदणी झाली म्हणून संबंधित कर्मचाऱ्याच्या पुढ्यात आम्ही चाळीस हजार रुपये ठेवले. तो ताडकन म्हणाला, पैसे नकोच; पण पैशांची गोष्टही नको. अविश्वसनीय आहे; पण खरे आहे. आजपर्यंत आम्ही त्या कार्यालयात चहा प्यायलो त्याचेदेखील पैसे आम्हाला द्यावे लागले नाहीत. एखादा प्रमुख अधिकारी निकोप आणि प्रामाणिक असल्याची अनेक उदाहरणे आहेत; परंतु त्याच्या अधिनिस्त असलेले कर्मचारीही त्याच्या धाकाने भ्रष्टाचार करीत नाहीत, असे चित्र असलेले अमरावती महापालिका हे देशातील एकमेव उदाहरण ठरावे. महापालिकेत रोज काही तास घालविणाऱ्या एका प्रख्यात बिल्डरचाही अनुभव असाच- ते म्हणतात, नियमबाह््य कामे करायची. मोठ्या रकमा भरण्याला फाटा द्यायचा. अधिकारी-लोकप्रतिनिधींच्या संगनमताने मंजुरी मिळवायची, ही महापालिकेची आजवरची रीत. माझ्यासारख्या गुणवत्तापूर्ण व्यवसाय करू इच्छिणाऱ्या व्यावसायिकालाही त्यात नाईलाजाने सामील व्हावे लागत असे. गुडेवार आलेत नि आम्हा बिल्डरांचे लक्षावधी रुपये वाचलेत. कुणाला पैसेच द्यावे लागत नाहीत हो! केवढा हा आमूलाग्र बदल! हे केवळ गुडेवारच घडवून आणू शकतात. राजकीय स्वार्थासाठी अशा अधिकाऱ्यांचा बळी जात असेल तर अमरावतीचे ते दुर्भाग्यच!भ्रष्टाचार गुडेवारांना असा थरथर कापत असताना अमरावतीच्या काही राजकीय नेतृत्त्वांना गुडेवार का नको, हा सवाल अंतर्मुख करणारा आहे. सामान्यांची वकिली करणारा, सामान्यांसाठी लढणारा, सामान्य म्हणूनच जगणारा हा अधिकारी नाव-अडनावाने कुणीही असो- तो आहे सामान्यांचे प्रतिरूप! तो आहे लोकशाहीचे स्वच्छ स्वरूप! गुडेवारांच्या बदलीवार्तेनंतर सामान्यांच्या मनात उमटलेली वेदनेची लकेर त्याचीच पावती होती. गुडेवारांच्या बदली स्थगितीसाठी सामान्यजनांतून ऐनवेळी होऊ लागलेला उठाव त्यांच्या चकाकणाऱ्या प्रामाणिकतेचे प्रमाण होते. अमरावती ही विदर्भाची सांस्कृतिक राजधानी आहे. नावात देवेंद्र असलेल्या फडणवीसांनी गुडेवारांसारखा कर्मठ अधिकारी त्यांच्या मामाच्या गावी धाडला; पण दुर्दैव- या इंद्रपुरीची शान जपण्यासाठी देवेंद्र अपयशी ठरले. त्यांना मान तुकवावी लागली, स्वार्थी राजकारणापुढे! आघाडी शासनापेक्षा युती शासन वेगळे आहे हे दाखविण्याची नामी संधी मुख्यमंत्र्यांनी गमावली. त्यांच्या राजकीय कौशल्यगुणांची हार म्हणा की, स्थानिक नेतृत्त्वांपुढे नमते घ्यावे लागण्याची अपरिहार्यता; मुख्यमंत्र्यांनीही केला तो अन्यायच! प्रामाणिकतेला हुसकावून लावण्याचा, भ्रष्टाचाराला राजाश्रय देण्याचा!