शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

मोदी काय करणार?

By admin | Updated: May 27, 2016 04:12 IST

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्याकडे केलेल्या कळकळीच्या विनंतीचा मान राखावा असे खुद्द मोदींना कितीही वाटले तरी ते तसे करु शकतील

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्याकडे केलेल्या कळकळीच्या विनंतीचा मान राखावा असे खुद्द मोदींना कितीही वाटले तरी ते तसे करु शकतील का याविषयी खुद्द त्यांच्याच मनात शंका उपस्थित होऊ शकत असल्याने आता जयललिता यांनाच त्यांच्या आजवरच्या खाक्यानुसार दांडगाई करावी लागेल असे दिसते. अर्थात त्यांनी अशी दांडगाई करण्याचे पाऊल समजा उचललेच तर तिला संपूर्ण देशभरातून भरघोस पाठिंबा तर मिळेलच पण बव्हंशी राज्ये किमान या बाबतीत तरी त्यांचे अनुयायी होण्यास सिद्ध होतील. देशातील वैद्यकीय आणि दंतचिकित्सा महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी सर्वोच्च न्यायालयाने जी राष्ट्रीय प्रवेशपूर्व पात्रता परीक्षा (नीट) अनिवार्य केली आहे त्या अनिवार्यतेमधून किमान यंदाच्या वर्षापुरती तरी सूट मिळावी म्हणून केन्द्र सरकारने एक अध्यादेश जारी केला आहे. सरकारच्या या कृतीबद्दल जयललिता यांनी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन करतानाच अशी सूट कायमस्वरुपी मिळावी अशी विनंती केली आहे. आपल्या सरकारने वैद्यकीय प्रवेशाची जी रचना तयार केली आहे ती तयार करताना ग्रामीण भागातील तसेच मागास वर्गातील विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेतली आहे. पण ‘नीट’मुळे शहरी भागातील तसेच आर्थिकदृष्ट्या संपन्नावस्थेतील विद्यार्थीच केवळ पुढे राहातील व तुलनेने उपेक्षित विद्यार्थ्यांची आणखीनच उपेक्षा होईल असा दावा जयललिता यांनी केला आहे. अर्थात त्यांनी जे म्हटले आहे त्याला देशातील बहुतेक राज्यांचे निश्चितच समर्थन राहील कारण त्यांच्या मनातदेखील हीच भीती आहे. परंतु या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाची भूमिका आडमुठी म्हणता येईल इतकी ताठर आहे. अर्थात या संदर्भात आजवर जे काही घडले ते लक्षात घेता खुद्द केन्द्र सरकारची भूमिकादेखील ‘नीट’ची पक्षपाती असल्याचेच आढळून येते. वैद्यकीय प्रवेश पद्धतीचे देश पातळीवर समांगीकरण करणे हा केन्द्र सरकारच्याच नीतीचा एक भाग असल्याचेही दिसून येते. शिक्षण हा खरे तर राज्यघटनेनुसार केन्द्र आणि राज्य यांच्या सामाईक यादीमधील विषय. तो तसा असल्यानेच केन्द्राने आमच्यावर नीट लादू नये असा विविध राज्यांचा आग्रह आहे. पण केन्द्रास तो मान्य नसावा. सरकारने याच आठवड्यात जारी केलेल्या अध्यादेशास आव्हान दिले गेले आणि सर्वोच्च न्यायालयाने अध्यादेशही स्थगित ठेवला तर मोठाच पेचप्रसंग उभा राहू शकतो. त्यात तामिळनाडू राज्यदेखील येते. पण आरक्षण या विषयावर सर्वोच्च न्यायालयाने कमाल मर्यादा आखून दिलेली असताना एकट्या तामिळनाडू राज्याने या मर्यादेचा आदर न राखता तिचा भंग केला आहे. ते लक्षात घेता नीटच्या बाबतीतही हे राज्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशास झुगारुन देऊ शकते. जर तसे झाले तर देशातील अन्य राज्ये त्यापासून प्रेरणा घेणारच नाहीत असे नाही.