शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

मोदी काय करणार?

By admin | Updated: May 27, 2016 04:12 IST

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्याकडे केलेल्या कळकळीच्या विनंतीचा मान राखावा असे खुद्द मोदींना कितीही वाटले तरी ते तसे करु शकतील

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्याकडे केलेल्या कळकळीच्या विनंतीचा मान राखावा असे खुद्द मोदींना कितीही वाटले तरी ते तसे करु शकतील का याविषयी खुद्द त्यांच्याच मनात शंका उपस्थित होऊ शकत असल्याने आता जयललिता यांनाच त्यांच्या आजवरच्या खाक्यानुसार दांडगाई करावी लागेल असे दिसते. अर्थात त्यांनी अशी दांडगाई करण्याचे पाऊल समजा उचललेच तर तिला संपूर्ण देशभरातून भरघोस पाठिंबा तर मिळेलच पण बव्हंशी राज्ये किमान या बाबतीत तरी त्यांचे अनुयायी होण्यास सिद्ध होतील. देशातील वैद्यकीय आणि दंतचिकित्सा महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी सर्वोच्च न्यायालयाने जी राष्ट्रीय प्रवेशपूर्व पात्रता परीक्षा (नीट) अनिवार्य केली आहे त्या अनिवार्यतेमधून किमान यंदाच्या वर्षापुरती तरी सूट मिळावी म्हणून केन्द्र सरकारने एक अध्यादेश जारी केला आहे. सरकारच्या या कृतीबद्दल जयललिता यांनी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन करतानाच अशी सूट कायमस्वरुपी मिळावी अशी विनंती केली आहे. आपल्या सरकारने वैद्यकीय प्रवेशाची जी रचना तयार केली आहे ती तयार करताना ग्रामीण भागातील तसेच मागास वर्गातील विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेतली आहे. पण ‘नीट’मुळे शहरी भागातील तसेच आर्थिकदृष्ट्या संपन्नावस्थेतील विद्यार्थीच केवळ पुढे राहातील व तुलनेने उपेक्षित विद्यार्थ्यांची आणखीनच उपेक्षा होईल असा दावा जयललिता यांनी केला आहे. अर्थात त्यांनी जे म्हटले आहे त्याला देशातील बहुतेक राज्यांचे निश्चितच समर्थन राहील कारण त्यांच्या मनातदेखील हीच भीती आहे. परंतु या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाची भूमिका आडमुठी म्हणता येईल इतकी ताठर आहे. अर्थात या संदर्भात आजवर जे काही घडले ते लक्षात घेता खुद्द केन्द्र सरकारची भूमिकादेखील ‘नीट’ची पक्षपाती असल्याचेच आढळून येते. वैद्यकीय प्रवेश पद्धतीचे देश पातळीवर समांगीकरण करणे हा केन्द्र सरकारच्याच नीतीचा एक भाग असल्याचेही दिसून येते. शिक्षण हा खरे तर राज्यघटनेनुसार केन्द्र आणि राज्य यांच्या सामाईक यादीमधील विषय. तो तसा असल्यानेच केन्द्राने आमच्यावर नीट लादू नये असा विविध राज्यांचा आग्रह आहे. पण केन्द्रास तो मान्य नसावा. सरकारने याच आठवड्यात जारी केलेल्या अध्यादेशास आव्हान दिले गेले आणि सर्वोच्च न्यायालयाने अध्यादेशही स्थगित ठेवला तर मोठाच पेचप्रसंग उभा राहू शकतो. त्यात तामिळनाडू राज्यदेखील येते. पण आरक्षण या विषयावर सर्वोच्च न्यायालयाने कमाल मर्यादा आखून दिलेली असताना एकट्या तामिळनाडू राज्याने या मर्यादेचा आदर न राखता तिचा भंग केला आहे. ते लक्षात घेता नीटच्या बाबतीतही हे राज्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशास झुगारुन देऊ शकते. जर तसे झाले तर देशातील अन्य राज्ये त्यापासून प्रेरणा घेणारच नाहीत असे नाही.