शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

‘एक अलबेला’चं पुढं काय होणार ?

By admin | Updated: July 3, 2016 02:36 IST

भगवानदादांच्या ‘अलबेला’ या चित्रपटाबाबतीत जे त्या काळी घडलं होतं तेच या ‘एक अलबेला’ चित्रपटाबाबतीत घडताना दिसते आहे. त्यात काहीही बदल नाही. यामुळे तेव्हा काय आणि

- मंगेश देसाईभगवानदादांच्या ‘अलबेला’ या चित्रपटाबाबतीत जे त्या काळी घडलं होतं तेच या ‘एक अलबेला’ चित्रपटाबाबतीत घडताना दिसते आहे. त्यात काहीही बदल नाही. यामुळे तेव्हा काय आणि आज काय तेच चालू आहे. परिस्थिती फारशी बदललेली नाही याची खात्री पटली. त्यामुळेच आता पुन्हा अनेक प्रश्न मनात साचत चालले आहेत. सगळीकडे ज्या चित्रपटाची चर्चा आहे, त्यातली गाणी गाजत आहेत. मंगेशच्या भगवानदादाचं आणि विद्या बालनच्या गीता बालीचं सगळीकडून कौतुक होत आहे.. ज्या सिनेमाला समीक्षकांनी उचलून धरलं.. मीडियानं उचलून धरलं.. तो चित्रपट चित्रपटगृहांत नाही का, असा प्रश्न अनेकांना पडला. तसाच हा प्रश्न मलाही पडला आणि त्यानंच मला खूप त्रास झाला.खरंतर, या लेखमालेची सुरुवात वेगळीच करायची होती; पण कालपासून माझ्या मनात खूप वादळं निर्माण झाली. त्यांना वाट करून देणं फार गरजेचं होतं. आणि त्यासाठी आपली वाटणारी माणसंच पाहिजेत. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, लातूर, बीड, नांदेड एवढंच नाही, तर यू.के. असे देश-परदेशातले प्रेक्षक अनेक दिवसांपासून ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते तो ‘एक अलबेला’ २४ जूनला प्रदर्शित झाला. सोमवारपासून काही लोकांचे तो चित्रपट पाहण्याचे बेत पावसाने बदलायला लावले. निसर्गापुढे कोण काय करणार? म्हणून गेल्या सोमवारपासून मित्रमंडळी आणि नातेवाइकांबरोबर ‘एक अलबेला’ पाहण्याचं प्लॅनिंग अनेक लोकांनी केलं. आणि अ‍ॅडव्हान्स बुकिंगसाठी आॅनलाइन बघायला सुरुवात केली. तर चित्रपट कुठेच दिसेना. म्हणून बरीच माणसं चित्रपटगृहांकडे गेली तर समजलं की ‘एक अलबेला’ आता चित्रपटगृहांत नाही. मी २८ जूनला माझ्या वाढदिवसानिमित्त आणि ‘एक अलबेला’निमित्त आलेल्या २५०० फोन कॉल्सला उत्तर दिले. साधारण ३ हजारच्या वर मेसेजेसला उत्तरं दिली. त्यातले अनेक माझ्या फिल्ममधले मित्र, ओळखीचे होते. (ते तर खोटे बोलणार नाहीत ना!) प्रत्येकाने माझे, सिनेमाचे कौतुक केले. मी प्रत्येकाला बुकिंगबद्दल विचारत होतो. आणि आॅड डेला ५० टक्केच्या वर बुकिंग होतं असं उत्तर ऐकत होतो. थिएटरला भेट दिली. तेव्हाही हा सिनेमा लोकांना आवडतो आहे, चालणार, पावसाने थोडा प्रेक्षक स्लो झाला आहे. पण तरीही येणार अशी उत्तर ऐकली. अनेक पन्नाशीच्या वर असलेल्या आजोबा, काकींचे आशीर्वाद घेतले आणि एवढं सगळं असतानाही शुक्रवारपासून हा सिनेमा कोठेच नाही. हे भयानक आणि लाजिरवाणं आहे. भगवानदादांच्या ‘अलबेला’ या चित्रपटाबाबतीत जे घडलं तेच या ‘एक अलबेला’ चित्रपटाबाबतीत घडताना दिसतंय. त्यात काहीही बदल नाही. आजही तेच चालू आहे याची खात्री पटली. आणि पुन्हा अनेक प्रश्न मनात आले. ज्यांना हा सिनेमा आवडला ते ढं आहेत का? माझं, सिनेमाचं भरभरून कौतुक करत होते. ते माझे दुश्मन आहेत का? सिनेमासृष्टीत राजकारण आणि तेही घाणेरडं राजकारण शिरलं आहे, हे सिद्ध झालं. तेवढा आत्मपरीक्षण करणारा नट आहे. एवढी छान प्रसिद्धी. विद्या बालनसारखी उत्कृष्ट अभिनेत्री, भगवानदादांचं व्यक्तिचरित्र असतानाही आणि सिनेमा लोकांना पाहायचा असतानाही असा तो थिएटरवरून काढून टाकला जातो तर इतर मराठी सिनेमा निर्मात्यांनी काय करावे? सीडी घरीच बघावी. मराठी माणसांच्या महाराष्ट्रात मराठी (चालणाऱ्या) सिनेमांचेच हे हाल इतर भाषिक करणार असतील तर माझा या ‘मराठी चित्रपट’सृष्टीवरचा विश्वास फार काळ टिकणार नाही. माझीच माणसं मला साथ देत नसतील तर बाकीच्या भाषांचे सिनेमे करून मी आनंदात राहीन. ते कसेही वागले तरी फार वाईट वाटणार नाही; कारण ते माझे नाहीतच. मला माझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरे माझे प्रेक्षकच देऊ शकतात. आणि अजून एका प्रश्नाचं उत्तर द्यावं, या आठवड्यात एकही नवीन सिनेमा प्रदर्शित होत नसतानाही ‘एक अलबेला’ चित्रपटगृहांतून का काढला?

(जुलै महिन्याचे मानकरी असलेले लेखक प्रसिद्ध अभिनेते आहेत.)