शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

‘एक अलबेला’चं पुढं काय होणार ?

By admin | Updated: July 3, 2016 02:36 IST

भगवानदादांच्या ‘अलबेला’ या चित्रपटाबाबतीत जे त्या काळी घडलं होतं तेच या ‘एक अलबेला’ चित्रपटाबाबतीत घडताना दिसते आहे. त्यात काहीही बदल नाही. यामुळे तेव्हा काय आणि

- मंगेश देसाईभगवानदादांच्या ‘अलबेला’ या चित्रपटाबाबतीत जे त्या काळी घडलं होतं तेच या ‘एक अलबेला’ चित्रपटाबाबतीत घडताना दिसते आहे. त्यात काहीही बदल नाही. यामुळे तेव्हा काय आणि आज काय तेच चालू आहे. परिस्थिती फारशी बदललेली नाही याची खात्री पटली. त्यामुळेच आता पुन्हा अनेक प्रश्न मनात साचत चालले आहेत. सगळीकडे ज्या चित्रपटाची चर्चा आहे, त्यातली गाणी गाजत आहेत. मंगेशच्या भगवानदादाचं आणि विद्या बालनच्या गीता बालीचं सगळीकडून कौतुक होत आहे.. ज्या सिनेमाला समीक्षकांनी उचलून धरलं.. मीडियानं उचलून धरलं.. तो चित्रपट चित्रपटगृहांत नाही का, असा प्रश्न अनेकांना पडला. तसाच हा प्रश्न मलाही पडला आणि त्यानंच मला खूप त्रास झाला.खरंतर, या लेखमालेची सुरुवात वेगळीच करायची होती; पण कालपासून माझ्या मनात खूप वादळं निर्माण झाली. त्यांना वाट करून देणं फार गरजेचं होतं. आणि त्यासाठी आपली वाटणारी माणसंच पाहिजेत. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, लातूर, बीड, नांदेड एवढंच नाही, तर यू.के. असे देश-परदेशातले प्रेक्षक अनेक दिवसांपासून ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते तो ‘एक अलबेला’ २४ जूनला प्रदर्शित झाला. सोमवारपासून काही लोकांचे तो चित्रपट पाहण्याचे बेत पावसाने बदलायला लावले. निसर्गापुढे कोण काय करणार? म्हणून गेल्या सोमवारपासून मित्रमंडळी आणि नातेवाइकांबरोबर ‘एक अलबेला’ पाहण्याचं प्लॅनिंग अनेक लोकांनी केलं. आणि अ‍ॅडव्हान्स बुकिंगसाठी आॅनलाइन बघायला सुरुवात केली. तर चित्रपट कुठेच दिसेना. म्हणून बरीच माणसं चित्रपटगृहांकडे गेली तर समजलं की ‘एक अलबेला’ आता चित्रपटगृहांत नाही. मी २८ जूनला माझ्या वाढदिवसानिमित्त आणि ‘एक अलबेला’निमित्त आलेल्या २५०० फोन कॉल्सला उत्तर दिले. साधारण ३ हजारच्या वर मेसेजेसला उत्तरं दिली. त्यातले अनेक माझ्या फिल्ममधले मित्र, ओळखीचे होते. (ते तर खोटे बोलणार नाहीत ना!) प्रत्येकाने माझे, सिनेमाचे कौतुक केले. मी प्रत्येकाला बुकिंगबद्दल विचारत होतो. आणि आॅड डेला ५० टक्केच्या वर बुकिंग होतं असं उत्तर ऐकत होतो. थिएटरला भेट दिली. तेव्हाही हा सिनेमा लोकांना आवडतो आहे, चालणार, पावसाने थोडा प्रेक्षक स्लो झाला आहे. पण तरीही येणार अशी उत्तर ऐकली. अनेक पन्नाशीच्या वर असलेल्या आजोबा, काकींचे आशीर्वाद घेतले आणि एवढं सगळं असतानाही शुक्रवारपासून हा सिनेमा कोठेच नाही. हे भयानक आणि लाजिरवाणं आहे. भगवानदादांच्या ‘अलबेला’ या चित्रपटाबाबतीत जे घडलं तेच या ‘एक अलबेला’ चित्रपटाबाबतीत घडताना दिसतंय. त्यात काहीही बदल नाही. आजही तेच चालू आहे याची खात्री पटली. आणि पुन्हा अनेक प्रश्न मनात आले. ज्यांना हा सिनेमा आवडला ते ढं आहेत का? माझं, सिनेमाचं भरभरून कौतुक करत होते. ते माझे दुश्मन आहेत का? सिनेमासृष्टीत राजकारण आणि तेही घाणेरडं राजकारण शिरलं आहे, हे सिद्ध झालं. तेवढा आत्मपरीक्षण करणारा नट आहे. एवढी छान प्रसिद्धी. विद्या बालनसारखी उत्कृष्ट अभिनेत्री, भगवानदादांचं व्यक्तिचरित्र असतानाही आणि सिनेमा लोकांना पाहायचा असतानाही असा तो थिएटरवरून काढून टाकला जातो तर इतर मराठी सिनेमा निर्मात्यांनी काय करावे? सीडी घरीच बघावी. मराठी माणसांच्या महाराष्ट्रात मराठी (चालणाऱ्या) सिनेमांचेच हे हाल इतर भाषिक करणार असतील तर माझा या ‘मराठी चित्रपट’सृष्टीवरचा विश्वास फार काळ टिकणार नाही. माझीच माणसं मला साथ देत नसतील तर बाकीच्या भाषांचे सिनेमे करून मी आनंदात राहीन. ते कसेही वागले तरी फार वाईट वाटणार नाही; कारण ते माझे नाहीतच. मला माझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरे माझे प्रेक्षकच देऊ शकतात. आणि अजून एका प्रश्नाचं उत्तर द्यावं, या आठवड्यात एकही नवीन सिनेमा प्रदर्शित होत नसतानाही ‘एक अलबेला’ चित्रपटगृहांतून का काढला?

(जुलै महिन्याचे मानकरी असलेले लेखक प्रसिद्ध अभिनेते आहेत.)