शहरं
Join us  
Trending Stories
1
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
2
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
3
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
4
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
5
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
6
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
7
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीसोबत करणार हातमिळवणी?
8
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
9
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
10
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
11
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
12
India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !
13
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
14
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
15
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
16
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
18
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
19
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
20
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."

बच्चू कडूंचे काय चुकले?

By admin | Updated: April 4, 2016 22:00 IST

गावात रस्ता नाही, शाळा आहे; पण मुलाना बसायला जागा नाही. विहीर आहे; पण पाणी नाही. तलाठी थांबायला तयार नाही. शाळा सुटली की मुलांपेक्षा गुरुजींनाच घर गाठायची घाई.

गावात रस्ता नाही, शाळा आहे; पण मुलाना बसायला जागा नाही. विहीर आहे; पण पाणी नाही. तलाठी थांबायला तयार नाही. शाळा सुटली की मुलांपेक्षा गुरुजींनाच घर गाठायची घाई. गावातले आरोग्य केंद्र नावापुरते. डॉक्टर व नर्स दोघांचेही सोबतच अप-डाऊन. गावातले रुग्ण कोंडवाड्यातल्या गाईबैलांसारखे. गावातलाच बेरोजगार तरुण सकाळी दवाखाना उघडतो; झाडलोट करतो; रुग्णांना औषध-पाणी मलमपट्टी तोच करतो. काही दिवसानंतर लोक त्यालाच डॉक्टर म्हणून हाक मारतात व मनातला राग गिळून टाकतात. समस्या कायम आहेत. पूर्वीच्या पिढीने भोगले तेच आपल्या वाट्याला आले आहे. सरकारी बाबूंचे पोट शेण खाल्ल्याशिवाय भरत नाही. तहसील कार्यालय ते मंत्रालय असा हा खाबूगिरीचा उद्वेगजनक प्रवास पण आपली तक्रार नाही की खळखळ नाही.अशातच मग एखादा बच्चू कडू भ्रष्ट बाबूच्या कानफटात मारतो. बाबूचे सगेसोयरे झुंडीने येतात, काम बंद करतात. बच्चू कडूंना अटक होते. तरीही आपण शांत आणि षंढ. ज्याने पैसे खाण्यासाठी काम अडवून ठेवलेले असते, त्या बाबूवर सरकार कारवाई करीत नाही. उलट ज्या अपंग कर्मचाऱ्याच्या मदतीसाठी बच्चू कडू धावून जातात, त्यालाच निलंबित केले जाते. हा कुठला न्याय, असा साधा जाबही विचारण्याचे धारिष्ट्यही आपल्यात राहात नाही. समाज म्हणून आपला आत्मा हरवत चाललाय आणि नागरिक म्हणून आपल्याला आपल्याच कर्तव्यांचा विसर पडला आहे. कामे होत नाहीत म्हणून आपण लोकप्रतिनिधींना शिव्या घालतो. पण याच कामांची फाईल दाबून ठेवलेल्या सरकारी बाबूंची आपण कधी कानउघाडणी करीत नाही. टेबलाखालून पैसे सरकवायचे व आपले काम काढून घ्यायचे हेच आपले नागरिकत्व. त्यामुळे पैसे दिल्याशिवाय काम होत नाही व ते घेतल्याशिवाय काम करायचे नाही हा भ्रष्ट आचार समाजाच्या आणि व्यवस्थेच्या कधीचाच अंगवळणी पडला आहे. ही भ्रष्ट व्यवस्था नामशेष करू पाहणारा बच्चू कडूंसारखा लोकप्रतिनिधी मात्र अशा वर्तमानात गुन्हेगार ठरतो.बच्चू कडूंनी केलेल्या मारहाणीचे इथे अजिबात समर्थन करायचे नाही. पण जनतेच्या प्रश्नांबद्दल संवेदनशील असलेल्या या आमदाराला असे आक्रमक पाऊल का उचलावे लागले, या प्रश्नाचा विचार सरकारने, चॅनेलवर मोफत सल्ले देणाऱ्या नवविचारवंतांनी करू नये का? कायदे मंडळातील एक ज्येष्ठ सदस्य कायदा हातात घेतो तेव्हा त्याची हतबलता या भ्रष्ट व्यवस्थेतील तकलादूपण अधोरेखित करीत नाही का? बच्चू कडू हे गुंड नाहीत, ते वाळूमाफियाही नाहीत. अंध, अपंगांना मदत आणि गरीब रुग्णांची सेवा हाच त्यांच्या आयुष्याचा स्थायीभाव आहे. दादरच्या गाडगेबाबा धर्मशाळेत वेदनांनी विव्हळत असलेल्या कॅन्सरग्रस्तांसोबत रात्रभर जागणारा हा कार्यकर्ता आहे. कधी काळी बहिरमची यात्रा वेश्याव्यवसायासाठी बदनाम होती. हा देहविक्रय बंद करून आज तिथे महिलांना स्वावलंबन आणि स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले जाते. या चमत्काराचे सारे श्रेय गाडगेबाबांच्या या वारसदाराला जाते. आपल्या लग्नात अवाजवी खर्च टाळून अपंगांना मदत करणाऱ्या या लोकप्रतिनिधीला एखाद्या अडल्या-नडल्याच्या न्यायासाठी बाबूंच्या विनवण्या कराव्या लागत असतील तर त्यांनी शेवटी करावे तरी काय? बच्चू कडूंच्या विरोधात मंत्रालयातील सारे अधिकारी, कर्मचारी एकवटतात. लोकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी अशी एकजूट कधी दिसत नाही. मुख्यमंत्रीदेखील ‘अधिकारी माझे ऐकत नाही, काय करू?’ अशी व्यथा जाहीरपणे व्यक्त करतात. आपले कुणीच काही बिघडवू शकत नाही, हा माज त्यांच्यात आला आहे. याच लालफितीने त्रस्त होऊन माधव कदम हा मराठवाड्यातला गरीब शेतकरी मंत्रालयासमोर आत्महत्त्या करतो. तरी या कोडग्यांना त्याचे काहीच वाटत नाही. बच्चू कडूंनी केलेली मारहाण हे लोकक्षोभाचे प्रातिनिधिक रूप आहे. सरकारी बाबू सुधारले नाहीत तर हा वणवा मंत्रालयातून थेट तहसील कार्यालयांपर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. - गजानन जानभोर