शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

बच्चू कडूंचे काय चुकले?

By admin | Updated: April 4, 2016 22:00 IST

गावात रस्ता नाही, शाळा आहे; पण मुलाना बसायला जागा नाही. विहीर आहे; पण पाणी नाही. तलाठी थांबायला तयार नाही. शाळा सुटली की मुलांपेक्षा गुरुजींनाच घर गाठायची घाई.

गावात रस्ता नाही, शाळा आहे; पण मुलाना बसायला जागा नाही. विहीर आहे; पण पाणी नाही. तलाठी थांबायला तयार नाही. शाळा सुटली की मुलांपेक्षा गुरुजींनाच घर गाठायची घाई. गावातले आरोग्य केंद्र नावापुरते. डॉक्टर व नर्स दोघांचेही सोबतच अप-डाऊन. गावातले रुग्ण कोंडवाड्यातल्या गाईबैलांसारखे. गावातलाच बेरोजगार तरुण सकाळी दवाखाना उघडतो; झाडलोट करतो; रुग्णांना औषध-पाणी मलमपट्टी तोच करतो. काही दिवसानंतर लोक त्यालाच डॉक्टर म्हणून हाक मारतात व मनातला राग गिळून टाकतात. समस्या कायम आहेत. पूर्वीच्या पिढीने भोगले तेच आपल्या वाट्याला आले आहे. सरकारी बाबूंचे पोट शेण खाल्ल्याशिवाय भरत नाही. तहसील कार्यालय ते मंत्रालय असा हा खाबूगिरीचा उद्वेगजनक प्रवास पण आपली तक्रार नाही की खळखळ नाही.अशातच मग एखादा बच्चू कडू भ्रष्ट बाबूच्या कानफटात मारतो. बाबूचे सगेसोयरे झुंडीने येतात, काम बंद करतात. बच्चू कडूंना अटक होते. तरीही आपण शांत आणि षंढ. ज्याने पैसे खाण्यासाठी काम अडवून ठेवलेले असते, त्या बाबूवर सरकार कारवाई करीत नाही. उलट ज्या अपंग कर्मचाऱ्याच्या मदतीसाठी बच्चू कडू धावून जातात, त्यालाच निलंबित केले जाते. हा कुठला न्याय, असा साधा जाबही विचारण्याचे धारिष्ट्यही आपल्यात राहात नाही. समाज म्हणून आपला आत्मा हरवत चाललाय आणि नागरिक म्हणून आपल्याला आपल्याच कर्तव्यांचा विसर पडला आहे. कामे होत नाहीत म्हणून आपण लोकप्रतिनिधींना शिव्या घालतो. पण याच कामांची फाईल दाबून ठेवलेल्या सरकारी बाबूंची आपण कधी कानउघाडणी करीत नाही. टेबलाखालून पैसे सरकवायचे व आपले काम काढून घ्यायचे हेच आपले नागरिकत्व. त्यामुळे पैसे दिल्याशिवाय काम होत नाही व ते घेतल्याशिवाय काम करायचे नाही हा भ्रष्ट आचार समाजाच्या आणि व्यवस्थेच्या कधीचाच अंगवळणी पडला आहे. ही भ्रष्ट व्यवस्था नामशेष करू पाहणारा बच्चू कडूंसारखा लोकप्रतिनिधी मात्र अशा वर्तमानात गुन्हेगार ठरतो.बच्चू कडूंनी केलेल्या मारहाणीचे इथे अजिबात समर्थन करायचे नाही. पण जनतेच्या प्रश्नांबद्दल संवेदनशील असलेल्या या आमदाराला असे आक्रमक पाऊल का उचलावे लागले, या प्रश्नाचा विचार सरकारने, चॅनेलवर मोफत सल्ले देणाऱ्या नवविचारवंतांनी करू नये का? कायदे मंडळातील एक ज्येष्ठ सदस्य कायदा हातात घेतो तेव्हा त्याची हतबलता या भ्रष्ट व्यवस्थेतील तकलादूपण अधोरेखित करीत नाही का? बच्चू कडू हे गुंड नाहीत, ते वाळूमाफियाही नाहीत. अंध, अपंगांना मदत आणि गरीब रुग्णांची सेवा हाच त्यांच्या आयुष्याचा स्थायीभाव आहे. दादरच्या गाडगेबाबा धर्मशाळेत वेदनांनी विव्हळत असलेल्या कॅन्सरग्रस्तांसोबत रात्रभर जागणारा हा कार्यकर्ता आहे. कधी काळी बहिरमची यात्रा वेश्याव्यवसायासाठी बदनाम होती. हा देहविक्रय बंद करून आज तिथे महिलांना स्वावलंबन आणि स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले जाते. या चमत्काराचे सारे श्रेय गाडगेबाबांच्या या वारसदाराला जाते. आपल्या लग्नात अवाजवी खर्च टाळून अपंगांना मदत करणाऱ्या या लोकप्रतिनिधीला एखाद्या अडल्या-नडल्याच्या न्यायासाठी बाबूंच्या विनवण्या कराव्या लागत असतील तर त्यांनी शेवटी करावे तरी काय? बच्चू कडूंच्या विरोधात मंत्रालयातील सारे अधिकारी, कर्मचारी एकवटतात. लोकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी अशी एकजूट कधी दिसत नाही. मुख्यमंत्रीदेखील ‘अधिकारी माझे ऐकत नाही, काय करू?’ अशी व्यथा जाहीरपणे व्यक्त करतात. आपले कुणीच काही बिघडवू शकत नाही, हा माज त्यांच्यात आला आहे. याच लालफितीने त्रस्त होऊन माधव कदम हा मराठवाड्यातला गरीब शेतकरी मंत्रालयासमोर आत्महत्त्या करतो. तरी या कोडग्यांना त्याचे काहीच वाटत नाही. बच्चू कडूंनी केलेली मारहाण हे लोकक्षोभाचे प्रातिनिधिक रूप आहे. सरकारी बाबू सुधारले नाहीत तर हा वणवा मंत्रालयातून थेट तहसील कार्यालयांपर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. - गजानन जानभोर