शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

फलित काय?

By admin | Updated: December 3, 2015 03:29 IST

हवामानातील बदलांना कारणीभूत ठरणाऱ्या मानवी योगदानावर कायदेशीर निर्बंध लादणे आणि जगातील तमाम देशांमध्ये हवामानासंदर्भात करार घडवून आणणे, या हेतुने पॅरीस

हवामानातील बदलांना कारणीभूत ठरणाऱ्या मानवी योगदानावर कायदेशीर निर्बंध लादणे आणि जगातील तमाम देशांमध्ये हवामानासंदर्भात करार घडवून आणणे, या हेतुने पॅरीस येथे आयोजित आणि उद्याअखेर चालणाऱ्या पाच दिवसीय वार्षिक जागतिक परिषदेत हा हेतू साध्य करण्याच्या दृष्टीने फारसे काही होणार नाही याची साऱ्यांना अगोदरपासूनच कल्पना होती. वास्तविक भारत व चीनसारख्या बड्या विकसनशील देशांनी आतापर्यंतच्या परिषदांमधील भूमिकेशी फारकत घेत, हरितगृह वायू उत्सर्जनात भरीव कपात करण्याचे आश्वासन दिले आहे. जागतिक तपमानवाढ हे विकसित देशांनी अधाशीपणे केलेल्या इंधन वापराचे अपत्य आहे आणि त्यामुळे तपमानवाढ कमी करण्यासाठी, आम्ही आमच्या विकासाच्या स्वप्नांना मुरड घालून, हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणार नाही, अशी भूमिका विकसनशील देश आजपर्यंत घेत आले होते. विकसनशील देशांची ती भूमिका अजिबात चुकीची नव्हती. तरीदेखील जागतिक तपमानवाढीचे गांभीर्य लक्षात घेऊन, या देशांनी आपल्या भूमिकेला मुरड घातली आहे. भारताने आपल्या कर्बाम्ल वायू उत्सर्जनात, २०३० पर्यंत ३३ ते ३५ टक्क्यांनी कपात करण्याची तयारी दर्शविली आहे. इंडोनेशियाने २९ टक्क्यांच्या कपातीची तयारी दर्शविली आहे, तर चीनने २००५ च्या तुलनेत तब्बल ६० ते ६५ टक्क्यांची कपात करण्यास सहमती दिली आहे. इथे हे लक्षात घेणे गरजेचे आहे, की विकसनशील देशांनी हरितगृह वायू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्वच वायूंच्या उत्सर्जनात नव्हे, तर केवळ कर्बाम्ल वायूच्या उत्सर्जनात एवढी मोठी कपात करण्याची तयारी दाखविली आहे. याउलट विकसित देश सर्वच प्रकारच्या हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात कपात करणार आहेत. एवढी मोठी कपात झाल्यानंतर जागतिक तपमानवाढीस सहज पायबंद बसेल, असे जर कुणाला वाटत असेल, तर ते काही खरे नाही. त्यामागचे कारण हे आहे, की ही जी कपात करावयाची आहे, ती सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) तुलनेतील उत्सर्र्जनाच्या प्रमाणात करायची आहे. सध्याच्या घडीला भारत व चीनच्या अर्थव्यवस्था सात ते आठ टक्क्यांच्या दराने वाढत आहेत आणि आगामी काही वर्षे तरी वाढीचे हे प्रमाण साधारण याच पातळीवर राहण्याची अपेक्षा आहे. परिणामी कर्बाम्ल वायू उत्सर्जनात प्रत्यक्षात वाढच होणार आहे; कारण विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थांचा आकार २००५ च्या तुलनेत, २०३० मध्ये किमान सात ते आठ पट झालेला असेल. एकूण काय, तर या कपातीची गत, ‘आबा मेला अन् नातू झाला’ या वऱ्हाडी भाषेतील म्हणीसारखीच होण्याची दाट शक्यता आहे.