शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

फलित काय?

By admin | Updated: December 3, 2015 03:29 IST

हवामानातील बदलांना कारणीभूत ठरणाऱ्या मानवी योगदानावर कायदेशीर निर्बंध लादणे आणि जगातील तमाम देशांमध्ये हवामानासंदर्भात करार घडवून आणणे, या हेतुने पॅरीस

हवामानातील बदलांना कारणीभूत ठरणाऱ्या मानवी योगदानावर कायदेशीर निर्बंध लादणे आणि जगातील तमाम देशांमध्ये हवामानासंदर्भात करार घडवून आणणे, या हेतुने पॅरीस येथे आयोजित आणि उद्याअखेर चालणाऱ्या पाच दिवसीय वार्षिक जागतिक परिषदेत हा हेतू साध्य करण्याच्या दृष्टीने फारसे काही होणार नाही याची साऱ्यांना अगोदरपासूनच कल्पना होती. वास्तविक भारत व चीनसारख्या बड्या विकसनशील देशांनी आतापर्यंतच्या परिषदांमधील भूमिकेशी फारकत घेत, हरितगृह वायू उत्सर्जनात भरीव कपात करण्याचे आश्वासन दिले आहे. जागतिक तपमानवाढ हे विकसित देशांनी अधाशीपणे केलेल्या इंधन वापराचे अपत्य आहे आणि त्यामुळे तपमानवाढ कमी करण्यासाठी, आम्ही आमच्या विकासाच्या स्वप्नांना मुरड घालून, हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणार नाही, अशी भूमिका विकसनशील देश आजपर्यंत घेत आले होते. विकसनशील देशांची ती भूमिका अजिबात चुकीची नव्हती. तरीदेखील जागतिक तपमानवाढीचे गांभीर्य लक्षात घेऊन, या देशांनी आपल्या भूमिकेला मुरड घातली आहे. भारताने आपल्या कर्बाम्ल वायू उत्सर्जनात, २०३० पर्यंत ३३ ते ३५ टक्क्यांनी कपात करण्याची तयारी दर्शविली आहे. इंडोनेशियाने २९ टक्क्यांच्या कपातीची तयारी दर्शविली आहे, तर चीनने २००५ च्या तुलनेत तब्बल ६० ते ६५ टक्क्यांची कपात करण्यास सहमती दिली आहे. इथे हे लक्षात घेणे गरजेचे आहे, की विकसनशील देशांनी हरितगृह वायू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्वच वायूंच्या उत्सर्जनात नव्हे, तर केवळ कर्बाम्ल वायूच्या उत्सर्जनात एवढी मोठी कपात करण्याची तयारी दाखविली आहे. याउलट विकसित देश सर्वच प्रकारच्या हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात कपात करणार आहेत. एवढी मोठी कपात झाल्यानंतर जागतिक तपमानवाढीस सहज पायबंद बसेल, असे जर कुणाला वाटत असेल, तर ते काही खरे नाही. त्यामागचे कारण हे आहे, की ही जी कपात करावयाची आहे, ती सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) तुलनेतील उत्सर्र्जनाच्या प्रमाणात करायची आहे. सध्याच्या घडीला भारत व चीनच्या अर्थव्यवस्था सात ते आठ टक्क्यांच्या दराने वाढत आहेत आणि आगामी काही वर्षे तरी वाढीचे हे प्रमाण साधारण याच पातळीवर राहण्याची अपेक्षा आहे. परिणामी कर्बाम्ल वायू उत्सर्जनात प्रत्यक्षात वाढच होणार आहे; कारण विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थांचा आकार २००५ च्या तुलनेत, २०३० मध्ये किमान सात ते आठ पट झालेला असेल. एकूण काय, तर या कपातीची गत, ‘आबा मेला अन् नातू झाला’ या वऱ्हाडी भाषेतील म्हणीसारखीच होण्याची दाट शक्यता आहे.