शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

ही कसली देशभक्ती?

By admin | Updated: June 19, 2017 00:57 IST

देशभक्ती ही प्रदर्शन करण्याची बाब खचितच नाही. आपला देश आणि मातृभूमीबद्दलचे प्रेम, अभिमान या गोष्टी मनात सदैव चिरंजीव ठेवून कायम कृतज्ञ राहणे आणि देशाच्या ऐक्यासाठी

देशभक्ती ही प्रदर्शन करण्याची बाब खचितच नाही. आपला देश आणि मातृभूमीबद्दलचे प्रेम, अभिमान या गोष्टी मनात सदैव चिरंजीव ठेवून कायम कृतज्ञ राहणे आणि देशाच्या ऐक्यासाठी आपापल्यापरीने खारीचा वाटा उचलणे हेच प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य असते. शेजारील शत्रू राष्ट्राला शिव्या घालून त्यातून आपणच खरे देशभक्त आहोत असा अर्थ काढणे चुकीचे आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या होमकुंडात ज्यांनी आपल्या सर्वस्वाची आहुती दिली, त्यांनी कधीच आपल्या देशभक्तीचा टेंभा मिरवला नव्हता. परंतु आता देशभक्तीची व्याख्या जो तो आपल्या सोयीने बदलू पाहत आहे. रविवारी झालेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी वादग्रस्त टिष्ट्वटस् करून ‘देशभक्ती’चे प्रदर्शन केले आहे. ‘तुम्ही अंतिम फेरीत पोहचलात, अभिनंदन. आमच्या निळ्या रंगात तुम्हाला रंगताना पाहताना आनंद होत आहे. आता निळे-पिवळे होण्यासाठी तयार राहा. आम्ही तुम्हाला पूर्ण निळे करून टाकू’...‘चला जाऊ द्या. तुम्ही जिंका, हजार वेळा जिंका फक्त दहशतवाद बंद करा. मला हार मान्य आहे. आम्हाला शांतता व प्रेम हवे आहे.’..‘तुम्हाला १८ ला कळेलच. त्यादिवशी फादर्स डे आहे. तुमच्याशी बाप खेळणार आहे.’ - वास्तविक क्रिकेट हा एक खेळ आहे आणि त्याकडे खिलाडूवृत्तीनेच पाहायला हवे. परंतु ऋषी कपूर यांचे टिष्ट्वटस् पाहिल्यावर कोठेतरी गल्लत होताना दिसत आहे. पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाया केल्या जात आहेत, ही गोष्ट काही आता लपून राहिलेली नाही. अमेरिकेतील ९/११ चा हल्ला आणि मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याने यास पुष्टी मिळालेली आहे. परंतु भारतीय संघासोबत क्रिकेट खेळणारे अतिरेकी नव्हेत, तर ते खेळाडू आहेत ही गोष्ट लक्षात घ्याला हवी. समोरचा कोणत्याही प्रतिस्पर्धी संघाशी चिवटपणे आणि जिद्दीने सामना करावाच, पण तो खिलाडूवृत्तीने. भारतीय खेळाडूदेखील पाकिस्तान असो की कोणताही संघ असो प्रत्येक वेळी खिलाडूवृत्तीचेच दर्शन घडवीत आले आहेत. असे नसते तर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने लंडनमधील एका हॉटेलमध्ये पाकिस्तानी कर्णधार सर्फराझच्या मुलाला कडेवर उचलून घेतलेच नसते. वारंवार अतिरेकी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानबद्दल राग, द्वेष आणि चीड प्रत्येक भारतीयाच्या मनात असायलाच हवी व ती स्वाभाविकही; पण खेळ खेळताना ती आड येऊ नये, हे ऋषी कपूरसारख्या ज्येष्ठ अभिनेत्याला कोण समजावणार?