शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

टोकाची राजकीय आक्रमकता काय कामाची?

By किरण अग्रवाल | Updated: August 4, 2024 12:09 IST

Politics : राजकारणात पाऊल ठेवणाऱ्या तरुणवर्गाने उद्दिष्टप्राप्तीचे भान राखणे गरजेचे

-  किरण अग्रवाल

 

राजकीय आंदोलनातील सहभागानंतर एका तरुण कार्यकर्त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला, ही घटना विषण्ण करणारीच आहे. या घटनेचे कोणतेही राजकारण न करता तरुण पिढीला आपण कोणती वाट दाखवीत आहोत, याचा विचार व्हायला हवा.

खरे तर राजकारणाच्या व्याख्या व उद्दिष्टे अलीकडच्या काळात बदलून गेली आहेत, तरी अंतिमत: ते करायचे कशासाठी? तर समाजाच्या व गाव- शहराच्या विकासासाठी, हे विसरता येत नाही; परंतु याच राजकारणातून एखाद्या उमेदीच्या तरुणाला जीव गमावण्याची वेळ येते तेव्हा दृष्टीआडच्या बाबींकडे लक्ष वेधले जाणे स्वाभाविक ठरते.

राजकारण हे केवळ निवडणुकीपुरते न राहता आता सदा सर्वकाळ, बारमाही स्वरूपाचे झाले आहे. आता आतापर्यंत एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवून लोक विकासासाठी मात्र हातात हात घेऊन काम करणारे नेते बघायला मिळत; मात्र असे राजकीय सामंजस्य आता दुर्मीळ होत चालले आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांची, टीका-टिप्पणीची पातळी व्यक्तिगत स्तरापर्यंत घसरली आहे. त्यामुळे अनावश्यकपणे एकमेकांकडे जणू शत्रू असल्यासारखे बघितले जाऊ लागले आहे. यात नेत्यांमध्ये प्रसंगी समझोते होतातही; परंतु स्थानिक पातळीवर कार्यकर्ते जे आपसांत भिडून परस्परांशी वैर पत्करून बसतात; ते सहजासहजी संपुष्टात येत नाही.

महत्त्वाचे म्हणजे, राजकीय अस्तित्वासाठीची उपक्रमशीलता गैर नसतेच; त्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी ती प्रदर्शित होते तेव्हा भलेही सामान्यांचा त्यात सहभाग लाभो अगर न लाभो; परंतु ती टीकेची बाब ठरत नाही. अलीकडे मात्र सामान्यांच्या मुद्यांऐवजी पक्ष व नेत्यांबद्दलच्या निष्ठा व्यक्त करण्यासाठी आंदोलने होऊ लागली आहेत. ती करतानाही जेव्हा भान न बाळगता आक्रमकताच अंगीकारली जाते तेव्हा अनपेक्षित प्रकार घडून येतात जे नेत्यांसाठी भलेही सुखावह ठरत असतील; परंतु सामान्यांमध्ये मात्र प्रश्न निर्माण करणारेच ठरतात. राजकारण व राजकारण्यांबद्दलची ‘निगेटिव्हिटी’ वाढण्यासच त्यामुळे मदत होते. दृष्टीआडच्या या बाबी आहेत; पण त्याबद्दल गांभीर्याने कोणीही विचार करताना दिसत नाही.

आमदार अमोल मिटकरी यांनी ‘मनसे’चे नेते राज ठाकरे यांच्यावर टीका करताना कथित आक्षेपार्ह शब्द वापरल्याने अकोल्यात त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. यावेळी मिटकरी यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली. यात आरोपी ठरलेले सर्वच कार्यकर्ते काही पूर्णवेळ राजकारण करणारे नाहीत. आपला उदरनिर्वाह, चरितार्थ चालवून राजकारणाद्वारे काही चांगले करून दाखविण्याची धडपड करणारे कार्यकर्ते आहेत; पण आततायीपणा करून बसले. कोणाच्या सांगण्याला भरीस पडून त्यांच्याकडून हे कृत्य घडले व कारवाई वगैरे बाबी हा पोलिसांच्या तपासणीचा भाग आहे; पण अकोल्यासारख्या ठिकाणीही अशा पातळीपर्यंत राजकारण घसरते, हे शोचनीयच म्हणायला हवे.

याच आंदोलनात सहभागी एक तरुण, जो वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून भविष्याची स्वप्ने रंगवण्याच्या वयात होता. त्याला घटना घडून गेल्यानंतर अचानक अस्वस्थता वाटू लागली व त्यातच पुढे हृदयविकाराने त्याचा जीव गेला, ही अतिशय दुःखद घटना! नेमके काय व कशामुळे झाले, हे तपासात पुढे येईलच; परंतु जे घडले ते दुर्दैवी आहे. राजकारण व अनुषंगिक बाबी ठेवा बाजूला; पण एक तरुण जीव असा गमावला गेला व संबंधित कुटुंबीयांवर हकनाक दुःखाचा डोंगर कोसळला; ही यानिमित्ताने राजकीय प्रवाहात अनायासे ओढले जाणाऱ्या तरुणांसाठी आत्मपरीक्षण करायला लावणारी बाब ठरली आहे.

जय मालोकार या तरुणाच्या मृत्यूचे राजकारण अजिबात कुणी करू नये, पक्षाचे लेबल चिकटवूनही त्याकडे कोणी पाहू नये. पाहायचेच तर एवढेच पाहा की, एका वेगळ्या आशा-अपेक्षेतून, ऊर्मीतून जो तरुणवर्ग राजकारणाकडे वळू पाहतो आहे त्या तरुणाईत याच स्तंभाच्या प्रारंभी म्हटल्याप्रमाणे राजकारण करायचे कशासाठी? यासंबंधीची जाण व भान कसे जागविता येईल? कारण बाकी काहीही होऊ द्या; पण जीव जाण्यास यत्किंचितही कारण ठरणारे राजकारण घडता कामा नये.

सारांशात, व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपांच्या व असंवैधानिक मार्गाचा अवलंब घडून येणाऱ्या राजकारणातून कुणाचेही भले होत नसते. तरुणवर्गाने वाहवत जाऊन राजकारण करण्याऐवजी यासंबंधीचे भान बाळगणे गरजेचे आहे.