शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

मुंबई लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या गर्दीवर उतारा काय? रेल्वे प्रशासनाने नेहमीप्रमाणेच उदासीन

By सचिन लुंगसे | Updated: August 12, 2024 08:45 IST

मेल-एक्स्प्रेसच्या लाइनवरून लोकलला वाट दिली असती तर ठिकठिकाणच्या प्लॅटफॉर्मवर झालेली गर्दी मोकळी झाली असती.

- ताजा विषय : सचिन लुंगसे, उप-मुख्य उपसंपादक

ओव्हरहेड वायर तुटून किंवा लोकल रुळावरून घसरून झालेल्या गोंधळानंतर दादरपासून ठाण्यापर्यंतच्या प्लॅटफॉर्मवर झालेल्या गर्दीने नुकतेच मुंबईकरांचे लक्ष वेधून घेतले. मात्र याच काळात मेल-एक्स्प्रेसच्या लाइनवरून लोकलला वाट दिली असती तर ठिकठिकाणच्या प्लॅटफॉर्मवर झालेली गर्दी मोकळी झाली असती. मात्र, रेल्वे प्रशासनाने यापैकी काहीच केले नाही. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे येथील प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणासाठी घेण्यात आलेल्या मोठ्या ब्लॉकनंतर किमान आठवडाभर लोकल प्रवाशांचे हाल झाले. तेव्हापासून प्रवाशांच्या पाठीमागे लागलेली साडेसाती अजून संपलेली नाही. ओव्हरहेड वायरवर बांबू पडत आहेत. रेल्वे रुळाला तडे जात आहेत. ओव्हरहेड वायर तुटत आहे आणि यात लोकल प्रवासी लटकून घरी जात आहेत. गेल्या आठवड्यात ठाकुर्ली आणि कल्याणदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली आणि डाऊन दिशेने घरी जाणारे नोकरदार  प्लॅटफॉर्मवर लटकले. घाटकोपरला प्लॅटफॉर्मपासून जिन्यांवरही प्रवाशांची गर्दी झाली होती. अशावेळी एखादी दुर्घटना घडली असती तर त्याला जबाबदार कोण? या प्रश्नाचे उत्तर रेल्वे कधीच देत नाही.

घाटकोपर रेल्वे स्थानक हे मेट्रो मार्गाला जोडले गेले आहे. या मेट्रो मार्गावर दररोज  सुमारे साडेचार लाख प्रवासी प्रवास करतात. सकाळी, सायंकाळी आणि रात्री लोकल व मेट्रोचे असे प्रवासी मिळून गर्दीत भर पडते. साहजिकच लोकलच्या खोळंब्यानंतर एवढ्या मोठ्या गर्दीला सामावून घेण्यात प्लॅटफॉर्म कमी पडतात. यावर उपाय म्हणून स्थानकांवरील पूल, जिने रुंद असणे गरजेचे आहे. घाटकोपर, परळ रेल्वे स्थानक चकाचक करताना या गोष्टींचा विचार करण्यात आला असला, तरी सर्वच स्थानकांवर याची गरज आहे. रेल्वे स्थानकांची रंगरंगोटी करतानाच लोकल फेऱ्या वाढविण्यासोबत रेल्वे लाइनच्या रखडलेल्या विस्तारीकरणावरही सातत्याने भर दिला पाहिजे. रेल्वे लाइनच्या विस्तारीकरणासाठी केवळ २०१५-१६ चे जुने प्रस्ताव नव्याने चर्चेत आणण्यापेक्षा रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला पाहिजे.

रेल्वे प्रशासनाने याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून किंवा प्रवासी संघटनांच्या मदतीने गर्दीवर उतारा काढला पाहिजे. मात्र मध्य रेल्वे आपल्या कामकाजाचा पाढा प्रत्येकवेळी जनसमुदायासमोर मांडते. आमचा पसारा मोठा आहे, कामाला वेळ लागणार, असे रडगाणे गाते. पश्चिम रेल्वेशी आमची तुलना करू नका, असेही सांगते. मात्र गर्दी कमी करण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीमध्ये तोडगा शोधत नाही ही वस्तुस्थिती आहे.

काय करता येईल?

सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी मेल आणि एक्स्प्रेसऐवजी लोकलला प्राधान्य द्यावे. लोकलसाठी बांधण्यात आलेल्या ट्रॅकवर फक्त लोकल चालविण्यात याव्यात, मेल एक्स्प्रेस तत्काळ थांबविण्यात याव्यात. वर्षोनुवर्षे रखडलेले प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे. यांत्रिक बिघाड, तांत्रिक कारण, मालगाडी, मेल, लोकल रुळावरून घसरल्याने किंवा इतर कारणाने लोकल सेवा रखडली तर आपत्कालीन परिस्थिती जाहीर करावी.

अशावेळी मेलसाठी असलेल्या ट्रॅकवरूनही अतिरिक्त लोकल ट्रेन सोडण्यात याव्यात. लोकल सेवेसाठी मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, हार्बर, ट्रान्सहार्बर, एमआरव्हीसी मिळून वेगळे संयुक्त प्राधिकरण करण्यात यावे, जेणेकरून रेल्वे स्थानकांवरील गर्दी कमी होईल.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलrailwayरेल्वे