शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

काय चाललंय राव.. हा कोणता टॅक्स अन् कशाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 07:52 IST

अतिरिक्त कर मिळविण्यासाठी ‘टीसीएस’ची नामी शक्कल सरकारने लढविली आहे. विदेशात जाणाऱ्या श्रीमंतांचा प्रवास आता आणखी महागणार आहे.

- पवन देशपांडे, सहायक संपादक, लोकमत

आपण रोज कोणता ना कोणता टॅक्स देत असतो, याची आपल्यालाही कल्पना नसते. कारण कोणतीही वस्तू, कोणतीही सेवा घेताना आपण दिलेल्या एकूण रकमेत काही वाटा हा कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या टॅक्सचा असतोच असतो. आता गेल्या काही दिवसांपासून एका नव्या प्रकारच्या टॅक्सची चर्चा आहे. ‘टीसीएस’ असे त्याचे नाव आहे. प्रत्यक्षात भारतात राहणाऱ्यांसाठी हा टॅक्स नाही; पण विदेशात जाणाऱ्यांची या टॅक्सने झोप उडविली आहे. गेल्या आठवड्यात विदेशात क्रेडिट कार्डद्वारे खर्च करण्यावर २० टक्के कर संकलित केला जाईल, असे सरकारने जाहीर केले आणि त्यामुळे अनेक श्रीमंतांची झोप उडाली. आता आपल्या सगळ्या खर्चावर २० टक्के पैसे अधिक करावे लागणार, याची चिंता सगळ्यांना लागली होती. 

प्रथम हे पाहावे लागेल की, ‘टीसीएस’ अर्थात ‘टॅक्स कलेक्टेड ॲक्ट सोर्स’ म्हणजे काय? - म्हणजे एखादी वस्तू, सेवा घेतानाच तुमच्याकडून टॅक्स घेतला जाणार आणि त्याची रक्कम विक्रेता थेट सरकारकडे जमा करणार. समजा, तुम्ही विदेश दौऱ्यावर निघाला आहात आणि त्यासाठी तुम्ही सर्व प्रकारचे बुकिंग किंवा तिथे गेल्यावर खरेदीसाठी क्रेडिट कार्डचा वापर केला तर त्यावर २० टक्के कर संकलित केला जाईल. म्हणजे १० लाख रुपये एकूण खर्च केला तर त्यावर तुम्हाला २ लाख रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. म्हणजेच परदेशवारीचा खर्च १० लाख रुपये येणार असेल तर तो १२ लाखांवर गेला. विशेष म्हणजे ही रक्कम नंतर आपण इन्कमटॅक्स रिटर्न फाइल करताना क्लेम करू शकतो. म्हणजे ही रक्कम आपण परतही मिळवू शकतो. बराच विरोध झाल्यानंतर सरकारने ‘टीसीएस’ कट न करण्याची मर्यादा ७ लाखांवर आणली आहे. म्हणजे वर्षभरात जर विदेश वारीवरील खर्च ७ लाखांपर्यंत मर्यादित राहिला तर त्यावर ‘टीसीएस’ कर गोळा केला जाणार नाही. डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या या मर्यादित स्वरूपाच्या खर्चासाठी केंद्र सरकारने ही स्पष्टता आणली आहे.

वर्षातून एखादी विदेशी ट्रीप करणाऱ्यांसाठी जरी हा दिलासा असला, तरी इतर अनेकांसाठी या मर्यादेने फारसा फरक पडणार नाही. कारण वार्षिक ७ लाख खर्च ही मर्यादा गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांसाठी अगदीच तोकडी आहे. विदेशातील खर्च, त्याचे बुकिंग हे अनेकदा याहीपेक्षा अधिक रकमेचे असते. त्यामुळे अनेक जणांवर अतिरिक्त खर्चाचा बोजा पडणार आहे. दुसरा अर्थ असा की, आपण विदेश वारीवर किती खर्च करतोय, यावर कर यंत्रणांची बारीक नजर आहे. यापुढेही राहणार आहे. विरोध झाल्याने सरकारने ७ लाखांच्या मर्यादेपर्यंत ‘टीसीएस’ कर संकलित न करण्याचा निर्णय तूर्त घेतला असला, तरी भविष्यात तो लागणार नाही, याची कोणतीही शाश्वती नाही. आता २० टक्के टीसीएस केल्याने विरोधाचा सूर होता, तो हळूहळू मावळेल तेव्हा १०-१२ टक्के अशा स्वरूपात पुन्हा सुरू केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

टीसीएस आकारून सरकार आणखी एक गोष्ट साध्य करीत आहे, ती म्हणजे सरकारच्या तिजोरीत पैसा राहील. समजा तुम्ही २ लाखांचा टीसीएस भरला तर तो क्लेम करण्यासाठी इन्कमटॅक्स रिटर्न फाइल करण्याची वाट बघावी लागेल. म्हणजे तोवर ही रक्कम सरकारकडे राहील. ती वापरताही येईल. शिवाय तुम्हाला ती क्लेम करताना विविध पुरावे द्यावे लागण्याची शक्यता आहे, तरच तुमची रक्कम परत मिळण्याची शक्यता अधिक. अन्यथा, ही रक्कम सरकार दरबारी जमा होईल आणि सरकारचे एकूण करसंकलन वाढेल. 

कर मिळविण्याची ही नामी शक्कल सरकारने लढविली आहे. विदेशात जाणाऱ्या श्रीमंतांवर याचा भार पडणार आहे. शिवाय उद्योगांना याचा काहीसा फटका बसणार आहे. दुसरीकडे सर्वसामान्यांना याचा फायदा होईल. कारण त्यांच्यावर याचा बोजा पडणार नाही. तूर्त हेच चांगले म्हणावे.pavan.deshpande@lokmat.com

टॅग्स :Taxकर