शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

ऐतिहासिक काय?

By admin | Updated: August 29, 2016 02:18 IST

सांप्रतचा काळ अत्यंत वेगवान झाला असल्याचे सांगतात. कदाचित त्याचाच परिणाम म्हणून की काय, पूर्वीच्या काळी दशका-शतकातून एखाद्या वेळीच इतिहास घडणे वा एखादी ऐतिहासिक घटना घडून

सांप्रतचा काळ अत्यंत वेगवान झाला असल्याचे सांगतात. कदाचित त्याचाच परिणाम म्हणून की काय, पूर्वीच्या काळी दशका-शतकातून एखाद्या वेळीच इतिहास घडणे वा एखादी ऐतिहासिक घटना घडून येणे वगैरे जे होत असे, ते हल्ली वारंवार घडू लागले आहे. प्रसंगी एकाच आठवड्यात दोनचार ऐतिहासिक घटना घडून येतात व तसे निर्णय वा निवाडे जाहीरही केले जातात. हाजीअलीच्या दर्ग्यातील महिलांच्या प्रवेशासंबंधीचा तथाकथिच ऐतिहासिक निवाडा हे त्याचे ताजे उदाहरण. देशाच्या राज्यघटनेनुसार देशातील सर्व नागरिकांमध्ये समानता आहे आणि कोणत्याही दोन नागरिकांमध्ये भेदभाव करण्यास मनाई आहे. परंतु प्रत्यक्षात असा भेदभाव केला जात आला आहे व आजही केला जात आहे. अशा भेदभावाचा अलीकडच्या काळातील सर्वाधिक गाजावाजा होत असलेला विषय म्हणजे धार्मिक स्थळांमध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यात केला जाणारा भेदभाव. एखाद्या धार्मिक स्थळी आम्ही जाऊ किंवा जाणारदेखील नाही पण तिथे जाण्यासाठी केवळ महिला म्हणून आम्हाला अटकाव केला जाणार असेल तर आम्ही तो कायदेशीर मार्गांनी झुगारुन देण्याचा प्रयत्न करु अशी भूमिका काही महिला आणि त्यांच्या संघटनांनी घेतली. ती योग्यच आहे. भेदभावरहित समाज राज्यघटनेलाच अभिप्रेत असल्याने या भूमिकेचे कोणीही समर्थनच करील. मुंबई उच्च न्यायालयानेदेखील ते केले आणि आधी अहमदनगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूर येथील आणि त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरातील भेदभाव मोडीत काढणारा निवाडा जाहीर केला. तेव्हां त्याचे वर्णन ‘ऐतिहासिक’ असे केले गेले. पाठोपाठ मुंबईच्या भर समुद्रात असलेल्या हाजीअलीच्या दर्ग्यातील आणि खरे तर तेथील मजार म्हणजे समाधीच्या दर्शनासाठी जाण्यास महिलांवर असलेल्या बंदीचा विषय मुंबई उच्च न्यायालयासमोर नेण्यात आला. याच कालावधीत केरळातील सबरीमला देवस्थानात रजस्वला महिलांवर असलेल्या पाबंदीवरील विषय सर्वोच्च न्यायालयासमोर विचाराधीन होता. तो आजही तसाच आहे. ही धार्मिक स्थळे विभिन्न धर्मांशी संबंधित असली तरी विषय मात्र एकच व तोदेखील राज्यघटनेतील विशिष्ट तरतुदींशी संबंधित. त्यामुळे सबरीमलाच्या निर्णयाच्या आधीन हाजीअलीचा निर्णय ठेवण्याची उच्च न्यायालयाची सुरुवातीची भूमिका होती. पण त्या घोळात न पडता न्यायालयाने या दर्ग्यातील मजार महिलांच्या इबादतसाठी खुली करण्याचा निवाडा जाहीर केला व त्याचेही वर्णन पुन्हा ऐतिहासिक असेच केले गेले. तथापि न्यायालयाने स्वत:च या निर्णयास सहा आठवड्यांची स्थगिती दिली असून आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाईल व तिथे ही स्थागिती कायम होईल. त्यानंतर भविष्यात कधी तरी दोन्ही देवस्थानांविषयीचा सर्वोच्च निवाडा जाहीर होईल तेव्हां त्याला ऐतिहासिक म्हणायचे की आणखी काही असा प्रश्न उभा राहू शकेल. मुळात शिंगणापूर असो, हाजीअली असो की सबरीमला असो, राज्यघटनेतील संबंधित तरतुदी जर स्वच्छ, स्पष्ट आणि नि:संदिग्ध आहेत तर मग न्यायालयीन घोळ घातला जातो, ते कशासाठी? त्याचे एकमात्र कारण म्हणजे, धार्मिक बाबींमध्ये पडण्याचे टाळण्याचीच सरकार आणि न्यायालये यांची भूमिका असते व प्रसंगी न्यायालयाने एखादी भूमिका घेतलीही जरी, तरी तिचे कसे धिंडवडे काढले जातात हे दहीहंडी प्रकरणात दिसून आलेच आहे.