शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

काय गंमतच आहे ना राव..

By admin | Updated: May 23, 2016 03:48 IST

काय गंमतच आहे ना... मुंबई महापालिका निवडणुका जवळ येऊ लागल्या तसे उगाचच शिवसेना भाजपाविषयी भलत्या सलत्या गोष्टी सांगणे सुरू झाले... कधी रस्त्यावरचे खड्डे काढतात

काय गंमतच आहे ना... मुंबई महापालिका निवडणुका जवळ येऊ लागल्या तसे उगाचच शिवसेना भाजपाविषयी भलत्या सलत्या गोष्टी सांगणे सुरू झाले... कधी रस्त्यावरचे खड्डे काढतात, तर कधी कचऱ्याचा विषय काढून विनाकारण भाजपा सेनेला बदनाम करण्याची गंमत का करावी वाटते कोणास ठाऊक... आता रस्त्यांवर खड्डे पडले म्हणून कोणी बोलले तर त्यात भाजपाने राजकारण आणले म्हणतात, कचरा गोळा करणाऱ्या कंपन्यांमध्ये भाजपा नेत्यांची पार्टनरशिप आहे का असे शिवसेनेने विचारले की भाजपाला कसे अडचणीत आणले म्हणतात... सगळी गंमतच चालूये... हे मीडियावाले पण कायम निगेटिव्ह विचार करत राहतात, अशा गोष्टींकडे गंमत म्हणून पाहताच येत नाही त्यांना... कायम आपले टोचणी देत राहतात... बिचारे आशिष शेलार, महापालिका जिंकण्याच्या जिद्दीने मैदानात उतरले, पालिकेचा कारभार कसा भोंगळपणे सुरू आहे असे सांगत त्यांनी काही उदाहरणे दिली; त्याचे कौतुक करायचे दिले सोडून... उलट भाजपा महापालिकेच्या सत्तेत सहभागी आहे याची त्यांना आठवण करून देतात... चिमटे काढायची एक संधी सोडत नाहीत हे मीडियावाले... लगेच गंमत करतात... आम्ही सत्तेत नाही असे कधी म्हणाले का शेलार..? पण चांगले झाले ते आमच्यामुळे आणि चुकीच्या गोष्टी केल्या त्या शिवसेनेने असे जर का शेलार गमतीने म्हणत असतील तर त्याला एवढं गांभीर्याने घ्यायचं कारण नाही... पण लगेच गंमत झाली, गंमत झाली म्हणून मीडियावाल्यांचा हात तोंडावर जातो... एवढी मेहनत करून शेलारांनी तयारी केलीय, वॉर्डनिहाय सगळा अभ्यास पूर्ण केलाय, जातीपातीची, आपलीतुपली मतं किती, माणसं किती याचाही अभ्यास त्या पुस्तकात करून ठेवलाय, दस्तुरखुद्द अमित शहांनी देखील ‘गंमतच आहे’ असे म्हणत त्या पुस्तकाचं कौतुक तावडेंच्या घरी केलं म्हणतात. एवढी तयारी झालेली असताना उगाच शिवसेनेसोबत लढायचे कशाला? असा विचार जर का गंभीरपणे पुढे आला तर त्यातही हे मीडियावाले गंमत शोधतात... गंभीरपणे काही घेतच नाहीत राव कोणी? या पुस्तकाच्या आधारेच सगळ्याच्या सगळ्या जागा लढायची तयारी केली म्हणून शिवसेनेच्या विरोधात बोलायला नको का? पण लगेच तुम्ही लोक आम्हाला हिणवता आणि गंमत करून मोकळे होता... वांद्रेचा साहेब, त्यांचा मेहुणा आणि पीए हे पालिकेच्या भ्रष्टाचाराचे खरे सूत्रधार आहेत असं भाजपा खासदारानी गमतीनं काय म्हणून टाकलं तर लगेच मुखपत्रातून भाजपा खासदाराबद्दल भलतंसलतं छापण्याची गंमत केली ना शिवसेनेने... पब्लिक भाजपाच्या पाठीशी आहे असे जर शेलारांना वाटत असेल तर सेनेला एवढी भीती वाटायची गरज नाही... आता आसामात कमळ फुललं त्याचा आनंद साजरा केला तर, बऱ्याच काळाने पाळणा हलला की आनंद होणारच, अशी कुचकट भाषा का वापरावी वांद्रेच्या साहेबांनी...आता शेलारांकडे मुखपत्र नाही म्हणून ही अशी कुचकट बोलणी बरोबर आहेत का? जर का त्यांच्याकडेही मुखपत्र असते तर गंमतच गंमत झाली असती... एक बाण इकडून आला की एक कमळ तिकडून आले असते... गंमतच गंमत आली असती... वांद्रेच्या रहिवाशांनी देखील मग गंमत म्हणून जमलेल्या कमळ आणि बाणांची दुकानं काढली असती... राज्यात काही चुकीचं घडलं की शिवसेना सरकारला फटके मारायचे सोडत नाही आणि महापालिकेत काही घडलं की भाजपावाले वांद्रेच्या साहेबांना सोडत नाहीत... दोघे आपापसात गंमत गंमत खेळतात... अगदी नुरा कुस्तीसारखी... पण त्याचं एवढं भांडवल का केलं जातं कोणास ठाऊक..?मुख्यमंत्री पण भारी. मुंबईचा काही विषय नेला की मला त्यात आणू नका, शेलारांना ठरवू द्या असे सांगतात... गृहखाते त्यांच्याकडे आहे. भाजपाची एकहाती सत्ता पालिकेत येणे अशक्य आहे असा रिपोर्ट तर त्यांना कोणीतरी दिला आणि त्यामुळे शेलारांचा पत्ता परस्पर कटत असेल तर बरे अशी त्यांची आणि वांद्रेच्या साहेबांची चर्चा झाल्याची माहिती रावसाहेब दानवे कोणाला तरी देत होते म्हणे... गंमतच आहे सगळी... - अतुल कुलकर्णी