शहरं
Join us  
Trending Stories
1
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
2
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
3
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
4
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
5
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
6
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
7
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
8
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
9
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
10
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
11
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
12
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
13
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
14
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
15
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
16
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
17
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
18
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
19
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
20
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा

वर्ष संपतं म्हणजे काय?

By admin | Updated: December 27, 2015 01:44 IST

एखादं वर्ष संपतं, तेव्हा अनेक गोष्टी संपतात आणि सुरूही होतात... माणसं आणि संस्थांच्या जीवनात प्रचंड उलथापालथ होते. कुणाला उत्साह वाटेल, अशा प्रकारचे अनुभव येतात तर कुणाच्या बाबतीमध्ये

दांडपट्टा : दीपक पवार

एखादं वर्ष संपतं, तेव्हा अनेक गोष्टी संपतात आणि सुरूही होतात... माणसं आणि संस्थांच्या जीवनात प्रचंड उलथापालथ होते. कुणाला उत्साह वाटेल, अशा प्रकारचे अनुभव येतात तर कुणाच्या बाबतीमध्ये सबंध वर्षच नैराश्यानं व्यापलेलं असतं. दर वर्षाच्या सुरुवातीला अनेक नवीन डायरी आणून वर्षभरात आपण काय करणार आहोत, याच्याबद्दलचे संकल्प करत असतात. जवळपास वर्षाच्या मध्यातच यातले बरेचसे संकल्प अव्यवहार्य होते किंवा आपल्या प्रयत्नांच्या अभावामुळे ते तसे झाले आहेत, हे ज्याने त्याने मनातल्या मनात मान्य केलेले असते. त्यामुळे प्रत्येक वर्ष हे संकल्प आणि त्यांच्या अपुऱ्या पूर्तीचे वर्ष असते, हे मान्य करायला काही हरकत नाही.गेल्या वर्षभरात पंतप्रधान मोदी अनेक देश फिरून आले. मात्र, जग मोठं असल्यामुळे सगळं जग काही त्यांचं अद्याप फिरून झालं नाही. त्यांच्या बाजूने विचार करायचा, तर द्विराष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय संबंध मजबूत करण्यासाठी त्यांना हे करणं भागच होतं. त्यांच्या विरोधकांच्या दृष्टीने विचार करायचा, तर देशाला पहिलाच अनिवासी पंतप्रधान मिळाला आहे. त्यांच्या सरकारने ‘अच्छे दिन’ आणण्याचं जे आश्वसन दिलं होतं, ते तुरीच्या डाळीचा भाव आणि देशातलं एकूण असहिष्णू वातावरण यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. राज्यातल्या सरकारचा विचार करता, युतीतल्या मुख्य पक्षांची तोंडं एकमेकांच्या विरोधात दिसतात. विरोधात असताना वेगळा विदर्भ पाहिजे, असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना संयुक्त महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद स्वीकारताना मनाची टोचणी लागत नाही, पण मुख्यमंत्र्यांच्या छुप्या पाठिंब्याने श्रीहरी अणे विदर्भाचं वेगळं राज्य पाहिजे, असं म्हणतात. या प्रकारचं थोतांड देशाच्या इतर कुठल्या राज्यात स्वीकारलं जाईल, असं वाटत नाही.गेल्या वर्षभरात मुंबईत अनेक खटले लढवले गेले, पण त्यात सलमान खानच्या खटल्यात लोकांचे अधिक लक्ष लागले. अपेक्षेप्रमाणे सलमान निर्दोष सुटला. कायदा विकत घेता येतो आणि श्रीमंतांना तर ते सहज शक्य असतं, याबद्दलचा लोकांचा विश्वास त्यामुळे पुन्हा पक्का झाला. समाज माध्यमांमध्ये याबद्दल खूप तिखट लिहून येत असलं, तरी त्यातून सलमान किंवा न्यायव्यवस्थेला फार काही फरक पडेल असं नाही. यासाठी व्यवस्थाच अधिक सक्षम करण्याची गरज आहे. त्यासाठी लागणारी इच्छाशक्ती आपल्याकडे पुरेशी दिसत नाही. दरम्यानच्या काळात जणू काही सहलीला गेला असावा, अशा पद्धतीने संजय दत्त पॅरोल आणि फर्लोची रजा घेत राहिला. त्याचवेळी आपण हजारो कच्च्या कैद्यांच्या व्यथा-वेदनांबद्दल वर्तमानपत्रांमध्ये अनुत्पादक चर्चा करत राहिलो. त्यातून काहीही हाती लागलं नाही. त्यामुळे जनमताचा रेटा म्हणजे काय आणि तो असतो का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रथेप्रमाणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्राबाहेर झालं आणि त्यानंतर अंदमानातच विश्व साहित्य संमेलन झालं. घुमानच्या साहित्य संमेलनात सदानंद मोरे यांनी आपलं सगळं भाषण संत काळापुरतं मर्यादित ठेवून समकालीन प्रश्नांना हात लावावा लागणार नाही, याची काळजी घेतली. शेषराव मोरे यांनी त्यांच्या दुटप्पीपणाबद्दल त्यांना झोडपून काढलं. एकूणात ज्येष्ठ नागरिकांनी चालवलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलांनी आपले इव्हेंट सादर केले. आता ते नव्या माणसांकडे पैसे मागायला जातील. गेल्या वर्षभरात शेअर बाजार अनेकदा वर-खाली आला. शेअर बाजार वर जाण्याचा नरेंद्र मोदींच्या असण्याशी संबंध जोडला गेला आहे. त्यामुळे अगदी आम आदमी पार्टीला दिल्लीत यश मिळलं, तेव्हा शेअर बाजारावर परिणाम झाला होता. समाज माध्यमांवर नरेंद्र मोदींच्या भक्तांनी आणि विरोधकांनी परस्परांविरुद्ध तलवारी उपसल्या आहेत. त्याचा परिणाम अगदी रोजच्या रोज प्रसारमाध्यमांमध्ये दिसतो आहे. या प्रक्रियेमध्ये उथळ, सवंग चर्चा आणि चारित्र्यहनन या गोष्टी नित्यनेमाने होत आहेत. एकूण चर्चेचा स्तर इतका खाली गेला आहे की, लोकांना अनेकदा वृत्तवाहिन्यांवरच्या चर्चा नकोशा वाटतात. या परिस्थितीत संवादाच्या शक्यता कमी-कमी होत जातात. काळ बदलतो, तसा माणसं आणि व्यवस्था बदलतात. या व्यवस्थांच्या पोटात नव्या बदलांच्या शक्यता आहेत. त्यामुळे व्यवस्था सतत आतून हादरताना दिसते आहे.