शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

अधिवेशनाने काय दिले?

By admin | Updated: April 13, 2015 03:18 IST

फडणवीस सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले. ताळमेळ नसणारे विस्कळीत विरोधक आणि आपण काहीही करू शकतो असा निर्माण झालेला सत्ताधाऱ्यांचा गैरसमज

 अतुल कुलकर्णी -

फडणवीस सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले. ताळमेळ नसणारे विस्कळीत विरोधक आणि आपण काहीही करू शकतो असा निर्माण झालेला सत्ताधाऱ्यांचा गैरसमज यातच हे अधिवेशन संपले. चार महिन्यांत निर्माण झालेले प्रश्न मांडण्यात विरोधक अपयशी आणि महत्त्वाच्या प्रश्नांना बगल देण्यात सत्ताधारी यशस्वी ठरले.१० टक्के टोलमाफी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २००० हजार कोटींच्या मदतीची आणि अनधिकृत घरांना अधिकृत करण्याच्या घोषणेव्यतिरिक्त फार काही हाती लागले नाही. विरोधकांनी अनेक विषयांना स्वत:हून बगल दिली. साखरेच्या प्रश्नावर विरोधक एकत्र आले. ज्यांचे कारखाने आहेत त्यांनी राज्यातला ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे असे सांगत स्वत:च्या कारखान्यांची कैफीयत मांडून टाकली. सरतेशेवटी सरकारने इथेनॉलवरील बंदी उठवण्याचा निर्णय सभागृहात जाहीर केला खरा, पण त्याचा आदेश अद्याप निघालेला नाही. गेल्या पंधरा वर्षांतल्या प्रत्येक अधिवेशनात त्यावेळी विरोधात असणाऱ्या भाजपा-शिवसेनेने गृहखात्यावर चर्चा केली नाही, असे एकही अधिवेशन नाही. यावेळी विरोधात असणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीने ही परंपरा मोडीत काढली. राज्यात कायदा सुव्यवस्था उत्तम असल्याचे प्रमाणपत्र देत विरोधकांनी विधानसभेत गृहखात्यावर चर्चाच केली नाही. गृह खात्यावरील मागण्यांचा विषय होता त्यावेळी सभागृहात गदारोळ झाला. त्यामुळे त्यादिवशी चर्चा झाली नाही. सरकारला गृहखात्यावर चर्चा करायची नव्हती म्हणून सरकारने गोंधळ घडवून आणला असा आरोप विरोधकांनी केला. मात्र अंतिम आठवडा प्रस्ताव हे विरोधकांचे हत्त्यार असताना, त्यातदेखील गृह खात्यावरील चर्चा मागण्याची हिंमत विरोधकांनी केली नाही. मुख्यमंत्री गृह खात्याचे प्रमुख आहेत. त्यांना या विषयावर चर्चा नको होती आणि विरोधकांनी त्यांची इच्छा मान्य केल्याची चर्चा विधानभवनात रंगली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांना अशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले तेव्हा ते म्हणाले, कोणी काय बोलावे यावर आपण काय बोलणार? मात्र, तुम्ही गृह खात्यावर चर्चा का मागितली नाही या प्रश्नावर त्यांच्याकडे उत्तर नव्हते. विधानसभेत चर्चा झाली नाही हे खरे... एवढीच त्यांची प्रतिक्रिया होती. या सगळ्या प्रकारामुळे गोविंद पानसरेंचे खुनी कोण, त्यांचे पुढे काय झाले, दाभोलकरांच्या हत्त्येचा तपास नेमका कोठे अडकला आहे, नागपूरच्या कारागृहातून पाच कैदी पळून कसे गेले, भरदिवसा नागपुरात खून का पडू लागले, या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आता पुढच्या अधिवेशनापर्यंत तरी कोणी विचारणार नाही.नाही म्हणता विधान परिषदेत मात्र संख्येने जास्त असणाऱ्या विरोधकांनी जोरदार बॅटिंग केली. नागपूरच्या कायदा सुव्यवस्थेचा विषय असो किंवा अधिवेशन चालू असताना सरकारने काढलेला अध्यादेश असो, विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सुनील तटकरे यांनी अनेक विषय लावून धरले. सरकारला अडचणीत आणण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहातील कामकाजाच्या दर्जाविषयी आपण समाधानी नाही, असे जाहीरपणे सांगून व्यक्त केलेली नाराजी चिंता निर्माण करणारी आहे. केळकर समितीच्या अहवालावर चर्चा करताना सदस्यांनी अहवाल कचऱ्याच्या पेटीत टाका, तो थुंकण्याच्या लायकीचा नाही अशी विधाने करून या चिंतेत भर टाकण्याचेच काम केले. केळकर हे जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांच्या सोबत ज्यांनी काम केले ती सगळी मंडळी आपापल्या क्षेत्रातली अभ्यासू आणि वैचारिक पाया भक्कम असणारी आहेत. अहवालावर टीका करण्याचा अधिकार सदस्यांना नक्कीच आहे. मात्र, एखादी चूक दाखवताना तिथे बरोबर काय पाहिजे हेदेखील त्यांना सांगता आले पाहिजे. पण त्यासाठी जी भाषा वापरली गेली त्यातून भविष्यात पुन्हा विचार करणारी मंडळी सरकारला सल्ले देण्याच्या फंदात पडणार नाहीत आणि पर्यायाने राज्याचेच नुकसान होईल, एवढे तरी लक्षात ठेवून वागायला हवे की नको हा अर्थात ज्याचा त्याचा प्रश्न...