शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

सुल्ली डील्स आणि बुलीबाई ॲपमागे कसले षडयंत्र आहे?

By shrimant maney | Updated: January 5, 2022 07:31 IST

अल्पसंख्याक समाजातील महिलांना लक्ष्य बनविणारे शेवटी कोण असणार? धार्मिक सौहार्द बिघडवून दंगली पेटविण्यासाठीच हे विष ओतले जात आहे.

- श्रीमंत माने,  कार्यकारी संपादक, लोकमत, नागपूरदेशवासीयांच्या नव्या वर्षाची सुरुवात मोबाईल ॲपवर मुस्लिम समाजातल्या सामाजिक कार्यकर्त्या, पत्रकार अशा स्पष्टवक्त्या, अन्याय-अत्याचार व चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठविणाऱ्या महिलांच्या सामूहिक चारित्र्यहननाच्या किळसवाण्या प्रकाराने झाली. या महिलांचे सोशल मीडियावरचे फोटो उचलून ते ॲपवर टाकायचे अन् त्यांचा लिलाव मांडायचा, सौदा करण्यासाठी आवाहन करायचे, असा हा विकृत प्रकार. जवळपास नव्वद महिलांच्या छायाचित्रांचा असा घृणास्पद वापर झाला. शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी, तसेच इतरांनी केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव तसेच पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर चक्रे फिरू लागली. हैदराबादच्या ६७ वर्षीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या खलिदा परवीन यांनी हरिद्वार येथे धर्मसंसद भरवून मुस्लिमांच्या कतलीचे आवाहन करणाऱ्या यती नरसिंहानंद सरस्वतींवर अलीकडेच जाहीर टीका केली होती. लगेच त्यांचे छायाचित्र मोबाईल ॲप्लिकेशनवर आले. तेव्हा त्यांनी पोलिसात तक्रार केली. हे दुसऱ्यांदा घडते आहे. गेल्या जुलै महिन्यात सुल्ली डील्स नावाच्या ॲपच्या माध्यमातून असेच घडले होते. त्याची दिल्लीत पोलिसांकडे तसेच महिला आयोगाकडे तक्रार झाली. पण, काहीही कारवाई झाली नाही. आता बुलीबाई ॲपबद्दल मुंबई पोलिसांचा सायबर क्राईम सेल प्रकरणाच्या मुळाशी जात असल्याचे पाहून महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना समन्स बजावून अब्रू झाकण्याचा प्रयत्न चालविला आहे.

इंटरनेट होस्टिंग व सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील गिटहब नावाच्या ओपन सोर्स प्लॅटफॉर्मचा वापर करून हे बुलीबाई ॲप तयार केले गेले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी सोमवारी बंगळुरूमधून एका अभियंत्याला, त्यानंतर उत्तराखंडमधून एका महिलेला अटक केली आहे. खरे तर ज्या पद्धतीने अल्पसंख्याक समाजातील महिलांना लक्ष्य बनविण्यात आले, ते पाहता, ते कोण असतील यासाठी फार डोके चालविण्याची गरज नव्हती. देशातील धार्मिक सौहार्द बिघडविण्यासाठी, धर्मा-धर्मांत भांडणे लावण्यासाठी, दंगली पेटविण्यासाठी जे विषारी वातावरण तयार केले जात आहे, त्याचाच हा परिणाम आहे. अन्यथा, उज्ज्वल करिअरची स्वप्ने बाळगणाऱ्या एखाद्या एकवीस वर्षांच्या तरुण अभियंत्याच्या मनात इतका द्वेष कसा काय असू शकतो किंवा एक महिला इतर धर्मातील महिलांबद्दल इतका विकृत विचार कसा काय करू शकते? हा सगळा अवतीभोवतीच्या प्रचंड विखारी वातावरणाचा परिणाम आहे. असा विखार, द्वेष महिलांना लक्ष्य बनवितो. यादवी व दंगलीत पहिले बळी महिला, मुले, वृद्ध अशा दुबळ्यांचेच जातात. दंगली पेटविणाऱ्यांच्या केसाला धक्का लागत नाही. 

या ॲप प्रकरणात तर महिलांचा असा चव्हाट्यावर बाजार मांडण्याच्या पलीकडे एखाद्या षडयंत्राचा वास येतो आहे. अगदी उघडपणे शीख व मुस्लिम समुदायांमध्ये वितुष्ट तयार करण्याचे, दंगली भडकविण्याचे प्रयत्न यात दिसतात. त्या ॲपचा बायोच बुलीबाई खालसा शीख फोर्स या नावाने होता, तर मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीने तीन दिवसांपूर्वी खालसा व्होटर असे खोटे नाव लावून घेतले होते. कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागून कायदे मागे घेत असल्याचे जाहीर केले. पंजाब विधानसभेची निवडणूक तोंडावर आहे. वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनात शीख समुदायाने त्याचे अस्तित्वच पणाला लावले होते. याचवेळी गुरू तेगबहादूर यांच्यापासून अनेक शीख गुरूंनी औरंगजेब व मुघलांशी कशी युद्धे लढली, याची आठवण सत्ताधाऱ्यांकडून उत्तर प्रदेश व इतर ठिकाणच्या प्रचारात वारंवार करून दिली जात आहे. या पृष्ठभूमीवर शीख विरुद्ध मुस्लिम असा वाद पेटविण्याचा प्रयत्न या बुलीबाई ॲपच्या माध्यमातून केला जात होता का, हे तपासण्याची गरज आहे. तसे असेल तर हा वर वर दिसतो तसा केवळ महिलांच्या अपमानाचा मुद्दा राहात नाही. तेव्हा, मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास चारदोघांच्या अटकेपुरता मर्यादित न ठेवता देशाची एकता व अखंडतेला नख लावणाऱ्या संभाव्य षडयंत्राच्या मुळाशी जाण्याची गरज आहे.