शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेब, काय हे?

By admin | Updated: April 20, 2017 02:38 IST

राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्यावर औरंगाबादेत भारिपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यांना आणि त्यांच्या पत्नी शिवगंगा यांनाही मारहाण केली गेली.

राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्यावर औरंगाबादेत भारिपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यांना आणि त्यांच्या पत्नी शिवगंगा यांनाही मारहाण केली गेली. मुंबईच्या दादर भागातील आंबेडकर भवनाच्या बाबतीत गायकवाड यांनी घेतलेल्या भूमिकेचा राग मनात धरून त्यांना ही मारहाण केली गेली. गायकवाड यांनी आंबेडकर भवनच्या बाबतीत जे काही केले ते चूक की बरोबर हा वादाचा आणि चर्चेचा विषय असला तरी त्यांना मारहाण करणे ही कृती अत्यंत खालच्या पातळीवरची आहे. गायकवाड यांच्यावर राग होताच, तो कुठे ना कुठे व्यक्त होणारच होता, अशी जी प्रतिक्रिया भारिपचे नेते प्रा. अविनाश डोळस यांनी दिली, तीदेखील तेवढीच चुकीची आहे. गायकवाड यांचे म्हणणे पटले नसेल तर ते कसे चुकीचे आहे, माहिती आयुक्तांना अशा भूमिका घेता येतात का, असे प्रश्न उपस्थित करून प्रा. डोळस आणि त्यांच्या पक्षाला सनदशीर मार्ग अवलंबता आले असते. पण तसे न करता आमच्या विरुद्ध जाल तर फोडून काढू म्हणणे ही तालिबानी वृत्ती झाली. समतेचा आणि शिक्षणाचा पाया घालणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना डोळस आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेली कृती कशी मान्य होणार? आज जर बाबासाहेब असते तर ते या सगळ्यावर कसे वागले असते, त्यांची प्रतिक्रिया काय घडली असती? याचे उत्तरही प्रा. डोळसांनी द्यायला हवे. एरव्ही टीकाटिप्पणी करताना पुढे असणारे पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या सगळ्या प्रकाराबद्दल बाळगलेले मौन हेही अक्षम्य आहे. आज आंबेडकरी जनतेला शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांचे जीवनमान उंचावणे, त्यांच्यासाठी उच्च आणि परदेशी शिक्षणासाठीचे वातावरण गावागावांत तयार करण्याची गरज असताना ते काहीही न करता अशी मारहाण करत जर कार्यकर्ते फिरू लागले तर त्यातून समाजाची घोर उपेक्षा होईल त्याचे काय? बाबासाहेबांनी ‘शिका आणि संघटित व्हा’ असा नारा दिला. मिळालेली विद्या समाजाच्या भल्यासाठी वापरावी हे त्यांना अभिप्रेत होते. ‘विद्या विनयेन शोभते’ असेही एक वचन आहे. ज्याच्याजवळ विद्या असते, ज्ञान असते तो कायम नम्र असतो असा त्याचा सरळ अर्थ. पण या कृतीने तो अर्थदेखील निरर्थक ठरला आहे. बाबासाहेबांनाही या कृतीचा पश्चाताप झाला असता. प्रकाश आंबेडकरांना काय वाटले, ते मात्र अजूनही समजलेले नाही..!