शहरं
Join us  
Trending Stories
1
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
2
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
3
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
4
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
5
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
6
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
7
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
8
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
9
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?
10
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
11
'युक्रेनमधील शांततेसाठी भारतावर कर लावणे आवश्यक', ट्रम्प प्रशासनाचा न्यायालयात युक्तिवाद
12
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
13
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
14
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
15
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...
16
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
17
धक्कादायक! न्यायाधीशांनाच दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, जिवंत राहायचे असेल तर ५०० कोटी घेऊन जंगलात या
18
Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं
19
GST कपातीमुळे तुमचा खर्च किती वाचणार? घरखर्च, विमा आणि गाड्यांच्या दरांवरचा 'हा' मोठा फरक समजून घ्या!
20
Viral Video: ५ किलो बटाटे अन् ५ किलो समोसे... कोणती पिशवी जड? मुलीने दिलं भन्नाट उत्तर

बाबासाहेब, काय हे?

By admin | Updated: April 20, 2017 02:38 IST

राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्यावर औरंगाबादेत भारिपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यांना आणि त्यांच्या पत्नी शिवगंगा यांनाही मारहाण केली गेली.

राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्यावर औरंगाबादेत भारिपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यांना आणि त्यांच्या पत्नी शिवगंगा यांनाही मारहाण केली गेली. मुंबईच्या दादर भागातील आंबेडकर भवनाच्या बाबतीत गायकवाड यांनी घेतलेल्या भूमिकेचा राग मनात धरून त्यांना ही मारहाण केली गेली. गायकवाड यांनी आंबेडकर भवनच्या बाबतीत जे काही केले ते चूक की बरोबर हा वादाचा आणि चर्चेचा विषय असला तरी त्यांना मारहाण करणे ही कृती अत्यंत खालच्या पातळीवरची आहे. गायकवाड यांच्यावर राग होताच, तो कुठे ना कुठे व्यक्त होणारच होता, अशी जी प्रतिक्रिया भारिपचे नेते प्रा. अविनाश डोळस यांनी दिली, तीदेखील तेवढीच चुकीची आहे. गायकवाड यांचे म्हणणे पटले नसेल तर ते कसे चुकीचे आहे, माहिती आयुक्तांना अशा भूमिका घेता येतात का, असे प्रश्न उपस्थित करून प्रा. डोळस आणि त्यांच्या पक्षाला सनदशीर मार्ग अवलंबता आले असते. पण तसे न करता आमच्या विरुद्ध जाल तर फोडून काढू म्हणणे ही तालिबानी वृत्ती झाली. समतेचा आणि शिक्षणाचा पाया घालणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना डोळस आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेली कृती कशी मान्य होणार? आज जर बाबासाहेब असते तर ते या सगळ्यावर कसे वागले असते, त्यांची प्रतिक्रिया काय घडली असती? याचे उत्तरही प्रा. डोळसांनी द्यायला हवे. एरव्ही टीकाटिप्पणी करताना पुढे असणारे पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या सगळ्या प्रकाराबद्दल बाळगलेले मौन हेही अक्षम्य आहे. आज आंबेडकरी जनतेला शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांचे जीवनमान उंचावणे, त्यांच्यासाठी उच्च आणि परदेशी शिक्षणासाठीचे वातावरण गावागावांत तयार करण्याची गरज असताना ते काहीही न करता अशी मारहाण करत जर कार्यकर्ते फिरू लागले तर त्यातून समाजाची घोर उपेक्षा होईल त्याचे काय? बाबासाहेबांनी ‘शिका आणि संघटित व्हा’ असा नारा दिला. मिळालेली विद्या समाजाच्या भल्यासाठी वापरावी हे त्यांना अभिप्रेत होते. ‘विद्या विनयेन शोभते’ असेही एक वचन आहे. ज्याच्याजवळ विद्या असते, ज्ञान असते तो कायम नम्र असतो असा त्याचा सरळ अर्थ. पण या कृतीने तो अर्थदेखील निरर्थक ठरला आहे. बाबासाहेबांनाही या कृतीचा पश्चाताप झाला असता. प्रकाश आंबेडकरांना काय वाटले, ते मात्र अजूनही समजलेले नाही..!