शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाट किंवा नंदूरबारसारखं अतिदुर्गम आदिवासी क्षेत्र म्हणजे गोरखपूर नव्हे तर काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:06 IST

सामान्यत: मेळघाट किंवा नंदूरबारसारख्या अतिदुर्गम आदिवासी क्षेत्रात पुरेशा आरोग्य सुविधा नसल्याने बालकांचे मृत्यू ओढवतात. परंतु नाशिकसारख्या उत्तर महाराष्ट्राचे मुख्यालय असलेल्या ठिकाणी जिल्हा शासकीय रुग्णालयात एकाच महिन्यात ५५ अर्भकांचा मृत्यू होणे ही धक्कादायक बाब मानली पाहिजे.

सामान्यत: मेळघाट किंवा नंदूरबारसारख्या अतिदुर्गम आदिवासी क्षेत्रात पुरेशा आरोग्य सुविधा नसल्याने बालकांचे मृत्यू ओढवतात. परंतु नाशिकसारख्या उत्तर महाराष्ट्राचे मुख्यालय असलेल्या ठिकाणी जिल्हा शासकीय रुग्णालयात एकाच महिन्यात ५५ अर्भकांचा मृत्यू होणे ही धक्कादायक बाब मानली पाहिजे. राज्य शासनाने ग्रामीण भागात गरोदर मातांपासून नवजात शिशूंपर्यंत जननी सुरक्षा, पोषण आहारासह अन्य अनेक योजना राबविल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात आरोग्य यंत्रणेची काय स्थिती आहे, हे नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील अव्यवस्थेवरून उघड झाले आहे. मुंबई, पुण्यासोबतच्या सुवर्णत्रिकोणातील हा जिल्हा होय. मात्र, येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील बालकांच्या अतिदक्षता विभागात इन्क्युबेटरची संख्या अपुरी पडत असून, एकेका पेटीत चार- चार बालके ठेवली जातात. या शिशूंसाठी प्राणवायू पुरवठ्याची व्यवस्था नाही. इतकेच नव्हे तर नवजात शिशूंसाठी संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनाही पुरेशा नसल्याने सदरचा दुर्दैवी प्रकार घडल्याचे उघड झाले आहे. आता आरोग्यमंत्र्यांनी थेट रुग्णालयास भेट देऊन परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक योजना मांडल्या असल्या तरी मूळ प्रश्न वेगळा आहे. राज्यातील ग्रामीण भागात असलेल्या सरकारी रुग्णालयांची अवस्था बिकट आहे. डॉक्टर आहेत तर उपचाराची साधने नाहीत. दोन्ही असेल तर रुग्णसेवेसाठी वैद्यकीय अधिका-यांची तयारी नाही. त्यामुळे बालकाच्या जन्मानंतर काही उपचाराची गरज भासली की थेट जिल्हा रुग्णालयाकडे पाठविले जाते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयांवरच ताण पडतो. अर्थात, नाशिकच्या प्रकरणात जिल्हा सामान्य रुग्णालयातही ग्रामीण रुग्णालयापेक्षा वेगळी स्थिती नाही, हे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे. त्यामुळे त्यावर सरकार काय व्यवस्था करणार हे महत्त्वाचे आहे. गोरखपूरसारख्या घटनेशी नाशिकची तुलना करू नये, असे मुख्यमंत्री म्हणत असले तरी शाब्दिक बचावातून काय साध्य होणार? तेव्हा राज्यातील आरोग्य यंत्रणेवरील खर्च, तेथील सुविधा आणि रुग्णसेवेचे व्रत पार पाडण्याची मानसिकता या सा-यावरच भर देणे गरजेचे आहे.