शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
3
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
4
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
5
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
6
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
7
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
8
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
9
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
10
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
11
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
12
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
13
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
14
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
15
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
16
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
17
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
18
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
19
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
20
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार

मेळघाट किंवा नंदूरबारसारखं अतिदुर्गम आदिवासी क्षेत्र म्हणजे गोरखपूर नव्हे तर काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:06 IST

सामान्यत: मेळघाट किंवा नंदूरबारसारख्या अतिदुर्गम आदिवासी क्षेत्रात पुरेशा आरोग्य सुविधा नसल्याने बालकांचे मृत्यू ओढवतात. परंतु नाशिकसारख्या उत्तर महाराष्ट्राचे मुख्यालय असलेल्या ठिकाणी जिल्हा शासकीय रुग्णालयात एकाच महिन्यात ५५ अर्भकांचा मृत्यू होणे ही धक्कादायक बाब मानली पाहिजे.

सामान्यत: मेळघाट किंवा नंदूरबारसारख्या अतिदुर्गम आदिवासी क्षेत्रात पुरेशा आरोग्य सुविधा नसल्याने बालकांचे मृत्यू ओढवतात. परंतु नाशिकसारख्या उत्तर महाराष्ट्राचे मुख्यालय असलेल्या ठिकाणी जिल्हा शासकीय रुग्णालयात एकाच महिन्यात ५५ अर्भकांचा मृत्यू होणे ही धक्कादायक बाब मानली पाहिजे. राज्य शासनाने ग्रामीण भागात गरोदर मातांपासून नवजात शिशूंपर्यंत जननी सुरक्षा, पोषण आहारासह अन्य अनेक योजना राबविल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात आरोग्य यंत्रणेची काय स्थिती आहे, हे नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील अव्यवस्थेवरून उघड झाले आहे. मुंबई, पुण्यासोबतच्या सुवर्णत्रिकोणातील हा जिल्हा होय. मात्र, येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील बालकांच्या अतिदक्षता विभागात इन्क्युबेटरची संख्या अपुरी पडत असून, एकेका पेटीत चार- चार बालके ठेवली जातात. या शिशूंसाठी प्राणवायू पुरवठ्याची व्यवस्था नाही. इतकेच नव्हे तर नवजात शिशूंसाठी संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनाही पुरेशा नसल्याने सदरचा दुर्दैवी प्रकार घडल्याचे उघड झाले आहे. आता आरोग्यमंत्र्यांनी थेट रुग्णालयास भेट देऊन परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक योजना मांडल्या असल्या तरी मूळ प्रश्न वेगळा आहे. राज्यातील ग्रामीण भागात असलेल्या सरकारी रुग्णालयांची अवस्था बिकट आहे. डॉक्टर आहेत तर उपचाराची साधने नाहीत. दोन्ही असेल तर रुग्णसेवेसाठी वैद्यकीय अधिका-यांची तयारी नाही. त्यामुळे बालकाच्या जन्मानंतर काही उपचाराची गरज भासली की थेट जिल्हा रुग्णालयाकडे पाठविले जाते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयांवरच ताण पडतो. अर्थात, नाशिकच्या प्रकरणात जिल्हा सामान्य रुग्णालयातही ग्रामीण रुग्णालयापेक्षा वेगळी स्थिती नाही, हे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे. त्यामुळे त्यावर सरकार काय व्यवस्था करणार हे महत्त्वाचे आहे. गोरखपूरसारख्या घटनेशी नाशिकची तुलना करू नये, असे मुख्यमंत्री म्हणत असले तरी शाब्दिक बचावातून काय साध्य होणार? तेव्हा राज्यातील आरोग्य यंत्रणेवरील खर्च, तेथील सुविधा आणि रुग्णसेवेचे व्रत पार पाडण्याची मानसिकता या सा-यावरच भर देणे गरजेचे आहे.