शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
3
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
4
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
5
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
6
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
7
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
9
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
10
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
11
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
12
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
13
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
14
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
15
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

स्वागतार्ह शिफारसी

By admin | Updated: June 21, 2016 01:57 IST

देशाचे नवे शैक्षणिक धोरण निश्चित करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या टी. एस. आर. सुब्रह्मण्यम समितीचा अहवाल सरकारकडे सादर झाला असून, विद्यमान शैक्षणिक धोरणातील

देशाचे नवे शैक्षणिक धोरण निश्चित करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या टी. एस. आर. सुब्रह्मण्यम समितीचा अहवाल सरकारकडे सादर झाला असून, विद्यमान शैक्षणिक धोरणातील अनेक त्रुटींवर समितीने बोट ठेवले आहे आणि त्या दूर करण्यासाठी उपाययोजनाही सुचविल्या आहेत. समितीच्या काही शिफारसी, प्रथमदर्शनी तरी शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी सक्षम भासत आहेत. विद्यमान शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण संपेपर्यंत स्वत:च्या आवडीचे क्षेत्र निवडण्याची मुभाच देत नाही. वस्तुत: आठवी-नववीत पोहोचेपर्यंत, विद्यार्थ्याचा कल, आवड, आकलन क्षमता इत्यादी बाबी पुरेशा स्पष्ट झालेल्या असतात. काहींची आकलन शक्ती विज्ञान शाखेकडे वळण्यासाठी पुरेशी नसल्याचे, किंवा त्या शाखेकडे त्यांचा कल नसल्याचे स्पष्ट होऊनही, त्यांना माध्यमिक शाळेत गणित व विज्ञान हे विषय बळजबरीने शिकावे लागतात. समितीने त्याला पायबंद घालण्याची शिफारस केली आहे. ती मान्य झाल्यास, ज्या विद्यार्थ्यांना पुढे उच्च श्रेणीचे गणित वा विज्ञान विषयांचा अंतर्भाव असलेल्या अभ्यासक्रमांकडे वळायचेच नाही, त्यांना शालांत परीक्षेत निम्न श्रेणीचे गणित व विज्ञान हे विषय निवडता येतील. या दोन विषयांची आवड नसलेल्या अनेक प्रतिभावंत विद्यार्थ्यांचे भविष्य कोमेजून टाकण्याचे काम, सध्याच्या गणित व विज्ञान अनिवार्य करणाऱ्या शैक्षणिक धोरणाने केले आहे. इयत्ता बारावीनंतर विभिन्न व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी नाना प्रकारच्या प्रवेश परीक्षा देण्याची गरज संपुष्टात आणणारी स्वागतार्ह शिफारसही समितीने केली आहे. बारावीनंतर राष्ट्रीय स्तरावर एकच प्रवेश परीक्षा असावी, असे समितीचे मत आहे. नुकत्याच गाजलेल्या ‘नीट’ गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, या शिफारसीचे महत्त्व ठसठशीतपणे अधोरेखित होते. इयत्ता आठवीपर्यंत विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच त्यांना पुढील इयत्तेत ढकलण्याच्या चर्चेलाही समितीने ना म्हटले आहे. ‘ढकलगाडी’ केवळ इयत्ता पाचवीपर्यंतच ठेवून, तेथून पुढे परीक्षा घ्याव्यात; मात्र अपयशी विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष पुरवून, त्यांना वर्ष वाया न घालवता पुढील इयत्तेत प्रवेश करता येण्यासाठी दोन अतिरिक्त संधी देण्याचे सूतोवाच समितीने केले आहे. शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधार करण्यासाठी ही शिफारस अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्याचबरोबर इयत्ता पाचवीपर्यंत मातृभाषेतून शिक्षण, भारतीय शिक्षण सेवा (आयईएस) सुरू करणे, बी. एड्. अभ्यासक्रम दोनऐवजी चार वर्षांचा करणे, शिक्षक भरतीसाठी शिक्षक प्रवेश परीक्षा (टीईटी) अनिवार्य करणे, दहावी व बारावीच्या ‘आॅन डिमांड’ परीक्षा सुरू करणे, जगातील सर्वोत्कृष्ट २०० विद्यापीठांना देशात ‘कॅम्पस’ सुरू करण्याची परवानगी देणे, इत्यादी महत्त्वपूर्ण शिफारसीही समितीने केल्या आहेत. शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून, देशातील शिक्षण प्रणाली आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्याच्या स्वप्नास या शिफारसींमुळे कितपत पंख लाभतात, याचे उत्तर मात्र काळच देऊ शकेल.