शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

स्वागतार्ह निर्णय

By admin | Updated: September 1, 2016 05:13 IST

केंद्र सरकारने २०२० पर्यंत देशातील आयआयटींमधील (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) विद्यार्थ्यांची संख्या एक लाख करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने २०२० पर्यंत देशातील आयआयटींमधील (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) विद्यार्थ्यांची संख्या एक लाख करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या तिथे ७२ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात व पुढील वर्षापासून दरवर्षी दहा हजार जागा वाढविण्यात येणार आहेत. सरकारच्या या निर्णयाने आपल्या मुलांना या प्रतिष्ठित संस्थांमधून शिक्षण देण्याचे स्वप्न बघणाऱ्या महत्त्वाकांक्षी पालकांना निश्चितच आनंद होईल. देशाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता अशा जागा वाढविणे क्रमप्राप्तच आहे. पण आज उच्च तंत्रज्ञान शिक्षणाला ज्या आजारांनी विळखा घातला आहे तो बघता केवळ एका मोठ्या वर्गाला संतुष्ट करण्यासाठी तर हा निर्णय घेतला नसावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जगभरात नावाजलेल्या आयआयटींमधील शिक्षणाचा दर्जा घसरण्याची भीती व्यक्त होत आहे. आयआयटी म्हणजे बुद्धिवंतांची खाण समजली जाते. ही प्रतिष्ठा कुठल्याही परिस्थितीत कमी होता कामा नये. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी संशोधनाच्या क्षेत्रात काम करावे या अनुषंगानेही काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आहेत. बी.टेक.च्या एक हजार गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. पदवी मिळाल्यावर त्यांनी नोकरी करण्याऐवजी संशोधन क्षेत्रात काम करावे हा त्यामागील हेतू आहे. आयआयटीतून बाहेर पडणाऱ्या बव्हंशी विद्यार्थ्यांचा कल अभियांत्रिकीकडे कमी असल्याचे गेल्या काही वर्षात निदर्शनास आले आहे. ही तक्रार दूर करण्यासाठी प्रवेशापूर्वी त्यांची अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट यापुढे घेतली जाणार असून सरकारचा हा निर्णय अगदी योग्यच आहे. देशाच्या विकासासाठी आवश्यक तंत्रज्ञानाची निर्मिती व्हावी व या क्षेत्रात आत्मनिर्भरता असावी हा या संस्थेमागील दृष्टिकोन आहे. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी व तेवढीच निराशाजनक आहे. आज या संस्था केवळ अमेरिकन सॉफ्टवेअर कंपन्यांना स्वस्तात प्रोफेशनल्सचा पुरवठा करीत आहेत. अथवा आयएएसच्या रूपात देशाला मोठ्या प्रमाणात नोकरशहा देत आहेत. ज्यांचे तंत्रज्ञान विकासात तीळमात्रही योगदान नसते. खरे सांगायचे तर आयआयटी आपल्या मुख्य उद्देशापासून केव्हाच भरकटली आहे आणि याची कुणाला चिंता असू नये, हे देशाचे दुर्दैव आहे. मध्यम वर्गीय लोक आयआयटीला लाखोंचे पॅकेज देणारा कारखाना समजतात. या संस्थांमधून उत्तीर्ण होणारे बहुतांश विद्यार्थी आयआयएममधून एमबीए किंवा आयएएस होताना दिसतात. दुसरीकडे अभियांत्रिकीच्या अनेक शाखांमध्ये अभियंत्यांचा तुटवडा पडला आहे. थोडक्यात बहुतेकांना कॉम्प्युटर सायन्स घेऊन अमेरिकेला जायचे आहे. देशाच्या गरजेशी त्यांना काही देणेघेणे नाही. अशात नवीन आयआयटी उघडण्याचा सरकारचा निर्णय आयआयटीच्या ब्रॅण्डला तडा जाणारा ठरु नये.