शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

स्वागतार्ह निर्णय

By admin | Updated: September 1, 2016 05:13 IST

केंद्र सरकारने २०२० पर्यंत देशातील आयआयटींमधील (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) विद्यार्थ्यांची संख्या एक लाख करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने २०२० पर्यंत देशातील आयआयटींमधील (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) विद्यार्थ्यांची संख्या एक लाख करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या तिथे ७२ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात व पुढील वर्षापासून दरवर्षी दहा हजार जागा वाढविण्यात येणार आहेत. सरकारच्या या निर्णयाने आपल्या मुलांना या प्रतिष्ठित संस्थांमधून शिक्षण देण्याचे स्वप्न बघणाऱ्या महत्त्वाकांक्षी पालकांना निश्चितच आनंद होईल. देशाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता अशा जागा वाढविणे क्रमप्राप्तच आहे. पण आज उच्च तंत्रज्ञान शिक्षणाला ज्या आजारांनी विळखा घातला आहे तो बघता केवळ एका मोठ्या वर्गाला संतुष्ट करण्यासाठी तर हा निर्णय घेतला नसावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जगभरात नावाजलेल्या आयआयटींमधील शिक्षणाचा दर्जा घसरण्याची भीती व्यक्त होत आहे. आयआयटी म्हणजे बुद्धिवंतांची खाण समजली जाते. ही प्रतिष्ठा कुठल्याही परिस्थितीत कमी होता कामा नये. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी संशोधनाच्या क्षेत्रात काम करावे या अनुषंगानेही काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आहेत. बी.टेक.च्या एक हजार गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. पदवी मिळाल्यावर त्यांनी नोकरी करण्याऐवजी संशोधन क्षेत्रात काम करावे हा त्यामागील हेतू आहे. आयआयटीतून बाहेर पडणाऱ्या बव्हंशी विद्यार्थ्यांचा कल अभियांत्रिकीकडे कमी असल्याचे गेल्या काही वर्षात निदर्शनास आले आहे. ही तक्रार दूर करण्यासाठी प्रवेशापूर्वी त्यांची अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट यापुढे घेतली जाणार असून सरकारचा हा निर्णय अगदी योग्यच आहे. देशाच्या विकासासाठी आवश्यक तंत्रज्ञानाची निर्मिती व्हावी व या क्षेत्रात आत्मनिर्भरता असावी हा या संस्थेमागील दृष्टिकोन आहे. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी व तेवढीच निराशाजनक आहे. आज या संस्था केवळ अमेरिकन सॉफ्टवेअर कंपन्यांना स्वस्तात प्रोफेशनल्सचा पुरवठा करीत आहेत. अथवा आयएएसच्या रूपात देशाला मोठ्या प्रमाणात नोकरशहा देत आहेत. ज्यांचे तंत्रज्ञान विकासात तीळमात्रही योगदान नसते. खरे सांगायचे तर आयआयटी आपल्या मुख्य उद्देशापासून केव्हाच भरकटली आहे आणि याची कुणाला चिंता असू नये, हे देशाचे दुर्दैव आहे. मध्यम वर्गीय लोक आयआयटीला लाखोंचे पॅकेज देणारा कारखाना समजतात. या संस्थांमधून उत्तीर्ण होणारे बहुतांश विद्यार्थी आयआयएममधून एमबीए किंवा आयएएस होताना दिसतात. दुसरीकडे अभियांत्रिकीच्या अनेक शाखांमध्ये अभियंत्यांचा तुटवडा पडला आहे. थोडक्यात बहुतेकांना कॉम्प्युटर सायन्स घेऊन अमेरिकेला जायचे आहे. देशाच्या गरजेशी त्यांना काही देणेघेणे नाही. अशात नवीन आयआयटी उघडण्याचा सरकारचा निर्णय आयआयटीच्या ब्रॅण्डला तडा जाणारा ठरु नये.