शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

शस्र की संप?

By admin | Updated: June 6, 2017 04:23 IST

संपूर्ण व्यवस्था शेतकऱ्याच्या जिवावर उठली असेल, त्याच्या मरणाची थट्टा होत असेल तर त्याने करावे तरी काय?

 

- गजानन जानभोरसंपूर्ण व्यवस्था शेतकऱ्याच्या जिवावर उठली असेल, त्याच्या मरणाची थट्टा होत असेल तर त्याने करावे तरी काय? नक्षलबारीच्या शेतमजुराप्रमाणे हातात शस्र घ्यावे की लोकशाही मार्गाने संप करावा? अवर्षण संपत नाही, आत्महत्या थांबत नाही, पांढऱ्या फटफटीत कपाळावरील वेदना तशाच कायम, राजकारणी सांत्वनासाठी येतात आणि नातेवाईक पंगतीला बसतात. काही सहृदय माणसे मदत घेऊन वांझोट्या अनुकंपेने येतात व नंतर तेसुद्धा बे‘नाम’ होऊन जातात. त्याच्या संघर्षात कुणीच सोबतीला राहत नाही. तो धड निषेधही करू शकत नाही, राज्यकर्त्यांचे आसन गदागदा हलविण्याचे त्राणही त्याच्यात शिल्लक राहत नाही. मग त्याला कुणी ‘साले’ म्हणतो, तर कुणी चालता हो. तो दाद मागायला मंत्रालयात गेला की त्याचे तोंड फोडले जाते. किमान देशाच्या राजधानीत तरी न्याय मिळेल, या भाबड्या आशेने तो पंतप्रधानांच्या घराजवळ अर्धनग्न बसून राहतो. त्याला भेटण्यासाठी पंतप्रधानांकडे वेळ नसतो. पण तेच पंतप्रधान बर्लिनला प्रियंका चोप्राला आवर्जून भेटतात. देशाचे कृषिमंत्री संसदेत त्याच्या आत्महत्येला प्रेमप्रकरणांचे कारण देतात. सरकारी अधिकारी तो व्यसनाधीन असल्याचे सांगतात. ‘जाणतेराजे’ सत्तेवर असताना शेतशिवारापेक्षा आयपीएलमध्ये जास्त रमतात. त्यांचे पुतणे लघुशंकेतून सिंचनाचे नवे तंत्र शोधून काढतात. चारही बाजूने त्याची अशी उपेक्षा होत असेल, संपूर्ण व्यवस्था त्याच्या जिवावर उठली असेल तर त्याने करावे तरी काय? नक्षलबारीच्या शेतमजुराप्रमाणे हातात शस्र घ्यावे की लोकशाही मार्गाने संप करावा? ४७ वर्षांपूर्वीची गोष्ट. स्थळ : पश्चिम बंगालमधील नक्षलबारी. न्यायालयाचा आदेश घेऊन शेतमजूर विगल किसन आपली बळकावलेली शेतजमीन परत घेण्यासाठी सावकाराकडे गेला. त्याला जमीन परत मिळाली नाही. उलट सावकाराच्या गुंडांनी मारहाण केली. संतापलेल्या विगलने हातात कुऱ्हाड घेतली आणि सावकाराला ठार केले. ती विद्रोहाची पहिली ठिणगी. पुढे त्या ठिणगीचे रूपांतर नक्षल चळवळीत झाले. आज ही चळवळ भरकटली, देशद्रोेही झाली. पण, ज्या प्रश्नातून विगल किसनने या चळवळीला जन्म दिला ते अजूनही संपलेले नाहीत, उलट अधिक दाहक झाले. परवाच्या संपात रस्त्यावर दिसलेला आक्रोश राज्यकर्त्यांना म्हणूनच दुर्लक्षित नाही करता येणार. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगासाठी उतावीळ असलेले सरकार आपल्या प्रश्नांबद्दल एवढे उदासीन का असते? हीच शेतकऱ्यांच्या मनातील वेदना आहे. या संपातून राजकीय स्वार्थ साधू पाहणारी माणसे प्रामाणिक नाहीत. या करंट्यांनी सत्तेत असताना शेतकऱ्यांच्या मरणाचा भाव करून राजकारणाच्या बाजारातील आपली किंमत सतत वाढवून घेतली. त्याच्या मरणाची थट्टा केली. त्यामुळे त्यांचे मनसुबे शेतकऱ्यांनी ओळखायला हवेत. या संपाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणणे एवढेच विरोधकांचे ईप्सित होते. खेदाची बाब ही की फडणवीसांनीही या आंदोलनातील मूळ प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी विरोधी पक्षांवर टीका केली. काँग्रेस-राकाँला नेमके हेच हवे होते. त्यातून फडणवीस सरकारला नेमके साध्य काय करायचे होते? काँग्रेस-राकाँ नेत्यांचे ढोंग उघडकीस आणायचे होते की आंदोलनाची दिशा बदलवायची होती? यातून काहीच साध्य होणारे नाही. अशा मुत्सद्देगिरीतून काही तत्कालिक गोष्टी पदरात पडतात; पण त्याचवेळी आंदोलनातील धग अधिक तीव्र होत असते. पक्षवाढीसाठी लोकांशी संवाद साधण्यासाठी सध्या घरोघरी फिरत असलेल्या काही वाचाळ भाजपा नेत्यांमुळे संपाला आपसूक दारूगोळा मिळत गेला. या बोलघेवड्या सालेदारांना फडणवीसांनी वेळीच वेसण घातले असते तर ही वेळ आली नसती.या संपातून शेतकऱ्यांनीही अंतर्मुख व्हावे. हा खरंच संप होता की रास्ता रोको? हा काहीसा कडवट प्रश्न. पण बळीराजाच्या हितासाठी तो कुणीतरी विचारायला हवा. संप म्हणजे सत्याग्रह! दुधाच्या गाड्या अडवून, जाळपोळ करून सत्याग्रह होत नाही. उलट मूळ प्रश्न कायम राहतात आणि आंदोलनाचे वाटोळे होते. शेतकऱ्याने ताठर होत हातावर हात बांधून बांधावर बसून राहावे, ‘आम्ही आमच्यापुरते पेरू, आम्हीच खाऊ, तुम्हाला देणार नाही आणि विकणारही नाही.’ राज्यकर्त्यांना वठणीवर आणण्याचा हाच खरा मार्ग आहे. बळीराजाला पिढ्यान्पिढ्याच्या दुष्टचक्रातून तो काढणाराही आहे. वर्तमान संपाचा तोच अर्थबोधही आहे.