शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

इडापिडा टळो... सत्तेचा सोपान हाती घेऊन बसलेल्यांची जबाबदारी वाढतेय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2023 10:23 IST

नव्या समाजरचनेत स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाला महत्त्व आल्याने साऱ्या समाजाच्या कल्याणाचा विचार मागे पडतो आहे का, अशी शंका घेण्यासारखी परिस्थिती आहे.

‘इडापिडा टळो, बळीचे राज्य येवो’  असे म्हणत आपण बळीराजाचे हजारो वर्षांपासून आजही स्मरण करतो आहोत. अशा सर्वगुणसंपन्न राजाची दिवाळीत घराघरांत पूजा व्हावी आणि आपली मूळ भारतीय संस्कृती उजळावी, अशी अपेक्षा करत असतो. विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृतीत जीवसृष्टीच्या साथीने जगण्याची संकल्पना खूप मौल्यवान आहे. अपेक्षा, संकल्पना आणि संस्कृती ही नेहमीच आदर्शवत मूल्यांवरच पुढे जात राहते. तिला छेद देणाऱ्या घटना-घडामोडींचा कोणी गर्व करीत नाही. हीच मनोधारणा असते. अशा परंपरेच्या पार्श्वभूमीवर आपला परिवार, गाव-शहर, राज्य-देश ते जगाच्या कक्षा जिथपर्यंत व्यापल्या आहेत, तेथे मानवी कल्याणाच्या मूल्यांचे संवर्धन होण्यासाठी नवे काही घडते आहे, की काही बिघडते आहे, याचा विचार करण्याची दिवाळी ही एक मोठी संधी असते. कारण माणूस नेहमी अपेक्षित यशाच्या-आशेच्या प्रतीक्षेत जगत असतो. मात्र, नव्या समाजरचनेत स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाला महत्त्व आल्याने साऱ्या समाजाच्या कल्याणाचा विचार मागे पडतो आहे का, अशी शंका घेण्यासारखी परिस्थिती आहे.

महाराष्ट्रातील विविध आंदोलने पाहा. त्यावर समाजमंथन नकारात्मक होते आहे, याची चिंता वाटते. बिहारने जातनिहाय जनगणना केल्यानंतर तेरा कोटी जनतेचे जीवनमान काळाच्या कसोटीवर तपासले, तर किती दुर्बल आहे, याची राज्यकर्त्यांना, विचारवंतांना आणि नियोजनकारांना चिंता पडावी, असे हे उघडेनागडे वास्तव आहे. मणिपूरच्या अवस्थेवर गेली सहा महिने आरोप- प्रत्यारोप करीत राहिलो. मात्र, मणिपुरी जनतेच्या हालअपेष्टा संपत नाहीत. परस्परातील विश्वासाच्या नात्याला तडे गेले आहेत. त्याला जोडण्यासाठी कोणी पुढे येताना दिसत नाही. देशाच्या विविध प्रदेशांना बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसतो आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि सिक्कीममध्ये आपण हे पाहिले. मध्य भारतात कमी झालेल्या पावसाने कृषी संस्कृतीतील दोन्ही हंगाम वाया गेल्यात जमा आहेत. या साऱ्याचा परिणाम माणूस मोठ्या संख्येने स्थलांतरित होऊन दोन वेळच्या अन्नाची तजवीज करतो आहे. अशा धडपडीतूनही बळीराजाचे स्मरण करून समाजधुरीणांनी काही सकारात्मक निर्णय घ्यावेत, अशी प्रार्थना आपण दिवाळीनिमित्त करीत असतो. 

महाराष्ट्राला तर सुमारे हजार वर्षांची संतांची परंपरा आहे. संतांनी समाजातील व्यंगांवर वार केले. अपप्रवृत्तीचा तिरस्कार करून माणसांचा व्यवहार अधिक चांगला व्हावा, अशी अपेक्षा करीत समाजाचे प्रबोधन केले, याचा अर्थ संतांना सारे व्यंग किंवा अपप्रवृत्तीच दिसत होती, असा आक्षेप घेऊ शकत नाही. आपली जबाबदारी, कर्तव्ये आणि व्यवहार नीट करणे यात नावीन्य नाही. याउलट अपप्रवृत्तीवर वार करून समाजासमोरच्या आव्हानांना सामोरे जाण्याचे कार्य करणाऱ्याला युगप्रवर्तक म्हणतात, तसे होताना दिसत नाही. आजूबाजूचे वर्तमान अस्वस्थ करणारे आहे. परंपरेप्रमाणे उपेक्षित वर्ग आणि महिला आजही अत्याचाराच्या शिकार होताना दिसतात. उत्पन्नाची साधने नसणारे अधिकच गर्तेत जात आहेत. त्यांना आधार देणाऱ्या धोरणांची अपेक्षा आहे. ऊन, वारा, पाऊस, पाणी ते जीवसृष्टीचे संवर्धन ते नवे विकास कार्य करताना सर्वांना बरोबर घेण्याची गरज अधिकच अधोरेखित होत आहे. यासाठी बळीराजाची प्रार्थना करावी आणि दिवाळीनिमित्त सदिच्छा व्यक्त केली गेली पाहिजे. 

या साऱ्यासाठी सत्तेचा सोपान हाती घेऊन बसलेल्यांची जबाबदारी वाढते आहे. समान मूल्यांच्या आग्रहाने राज्यव्यवस्थेची रचना केली आहे. त्यांनी जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव ठेवली पाहिजे. विविध राज्यांत सरकार आणि राज्यपालांचा संघर्ष चांगला नाही. संसदेच्या नैतिकता समितीचा व्यवहार आणि चौकशीचा फार्स योग्य नाही. निवडणुका चालू आहेत, त्यातील पैशांचा, जातीपातींचा वापर फारच चिंताजनक आहे. महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या काही जागा रिक्त आहेत. त्याला तीन वर्षे झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांना पक्षाघात व्हावा, अशी अवस्था आहे. शेती आणि आरक्षणासाठी आत्महत्या चालू आहेत. अशा अंध:कारात जगण्याची सवय करून घेण्याऐवजी त्यातून नवा मार्ग शोधणारा संकल्प दिवाळीनिमित्त करायला हवा आहे. सण-समारंभ, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम हे त्यासाठी एक उत्तम व्यासपीठ असते. आपल्या जीवनातील इडापिडा टळून जावो आणि मूल्यसंवर्धन करणारे बळीराजाचे राज्य येवो, अशी अपेक्षा करूया!

टॅग्स :Diwaliदिवाळी 2023