शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

आम्ही घाणेरडे !

By admin | Updated: June 6, 2017 04:25 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ताग्रहणाच्या दिवसापासूनच स्वच्छतेवर भर देणे सुरू केले असले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ताग्रहणाच्या दिवसापासूनच स्वच्छतेवर भर देणे सुरू केले असले तरी, त्यांच्या मनातील स्वच्छ भारत काही प्रत्यक्षात साकार होताना दिसत नाही. भारत सरकारचे ग्राहक व्यवहार सचिव जे. पी. मीणा यांनी जी खंत व्यक्त केली, ती एक प्रकारे मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाचे अपयश अधोरेखित करणारीच म्हणावी लागेल. शहरे स्वच्छ राखणे ही केवळ स्वच्छता कर्मचाऱ्यांचीच जबाबदारी नव्हे, तर १.२ अब्ज ग्राहकांनीही आपली जबाबदारी ओळखायला हवी, असे मीणा म्हणाले. त्यांचा रोख होता तो कोणत्याही शहरात इतस्तत: पडून असलेल्या फास्ट फूड पॅकेट्सकडे ! मीणा जे बोलले ते अगदी खरे आहे. संपूर्ण जगात आम्हा भारतीयांना घाणेरडे लोक म्हणून ओळखले जाते. ही प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केवळ मोदी सरकारनेच नव्हे, तर आधीच्या सरकारांनीही आपापल्या परीने केला; मात्र दुर्दैवाने एकविसाव्या शतकात प्रवेश केल्यानंतरही आपली प्रतिमा बदललेली नाही, हे दुर्दैवी असले तरी वास्तव आहे. आमच्या अस्वच्छ गावांचा, शहरांचा संबंध अनेकदा गरिबीशी जोडला जातो. त्याचप्रमाणे आमच्या वाईट सवयींचा संबंधही शिक्षणाच्या अभावाशी जोडला जातो. थोडा अंतर्मुख होऊन विचार केल्यास हे संबंध कसे बादरायण आहेत, हे सहज लक्षात येते. जगात असे अनेक देश आहेत, जे भारतापेक्षाही गरीब आहेत; मात्र स्वच्छतेच्या संदर्भात ते भारताच्या किती तरी पुढे आहेत. फार लांब कशाला, आमच्या अगदी निकट असलेला श्रीलंका हेच त्याचे उत्तम उदाहरण आहे. राहता राहिला प्रश्न वाईट सवयींचा संबंध शिक्षणाच्या अभावाशी जोडण्याचा, तर असा काहीही संबंध नसतो, हे नुकतेच तेजस या नव्या आधुनिक रेल्वेगाडीने प्रवास केलेल्या आमच्या बांधवांनी सप्रमाण सिद्ध केले आहेच ! महागडे भाडे असलेल्या या गाडीने प्रवास करणारे लोक निश्चितच अशिक्षित नव्हते. या सुशिक्षित प्रवाशांनी मनोरंजनासाठीच्या एलईडी स्क्रीनची चोरी करण्याचा प्रयत्न केला, ते जमले नाही तेव्हा त्या स्क्रीनची तोडफोड केली आणि वातानुकूलित असलेल्या गाडीत घाणीचे आणि दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण केले ! आमच्या देशातील अनेक ‘पॉश’ म्हणविल्या जाणाऱ्या सुखवस्तू वसाहतींमध्ये झकपकपणा केवळ बंगल्यांच्या किंवा सोसायट्यांच्या आवारांच्या आतच दिसतो. बाहेर रस्त्यांच्या किनारी किंवा सर्व्हिस गल्ल्यांमध्ये मात्र कचऱ्याचे ढीग दिसतातच! मीणा यांनी म्हटल्याप्रमाणे फास्ट फूड पॅकेट्सचा कचरा वाढतच चालला आहे आणि त्यामध्ये मोठा वाटा सुशिक्षित मध्यमवर्गीय व सुखवस्तू कुटुंबाचाच असतो. थोडक्यात, स्वच्छतेच्या अभावाचा गरिबी किंवा शैक्षणिक अहर्तेशी काहीही संबंध नसून, मानसिकतेशीच आहे. आपली वस्ती, आपले गाव किंवा शहर, आपल्या सार्वजनिक मालमत्ता या आपल्या घराप्रमाणेच स्वच्छ राखण्याची जबाबदारी आपलीच आहे, ही मानसिकता जोवर रुजत नाही, तोवर स्वच्छतेचे स्वप्न साकारणे नाही !