शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

पाणीकपातीचे राजकारणच !

By admin | Updated: December 19, 2015 03:45 IST

मराठवाड्यासाठी पाणी सोडावे लागल्याच्या कारणातून उद्भवलेल्या रोषाला राज्याचे जलसंपदामंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन व भाजपाच्या स्थानिक आमदारांना

- किरण अग्रवाल

मराठवाड्यासाठी पाणी सोडावे लागल्याच्या कारणातून उद्भवलेल्या रोषाला राज्याचे जलसंपदामंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन व भाजपाच्या स्थानिक आमदारांना सामोरे जावे लागल्याची घटना ताजी असताना आता नाशकातील पाणीकपातीचा मुद्दा संवेदनशील बनला आहे. यात पाण्याची चिंता व नागरिकांच्या अडचणी राहिल्या बाजूला, पण परस्परांवर कुरघोडी करत एकमेकाना असंवेदनशील ठरविण्याचे जे राजकारण सुुरू आहे ते केवळ विदारकच नव्हे तर मतलबीपणाचेही ठरणारे आहे.‘स्मार्ट सिटी’ योजनेतील सहभागाबाबत पाठवावयाच्या प्रस्तावाप्रकरणी नाशिक महापालिकेतही जी भवती न् भवती घडून आली, त्यामागे राजकारणच राहिल्याचे एव्हाना लपून राहिले नाही. अटी-शर्ती टाकून का होईना, तो प्रस्ताव पाठविला गेल्यानंतर आता पाणीकपातीचा मुद्दा उफाळून आला आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने सर्वत्रच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यात जिल्ह्यातील धरणातून मराठवाड्याला पाणी सोडावे लागल्याच्या विषयात राजकारण शिरले. सत्तेत सोबती असलेल्या खुद्द शिवसेना आमदाराच्याच पुढाकाराने भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला गेला. पालकमंत्र्यांची गाडी अडवून त्यांना सर्वपक्षीय कार्यकर्ते व शेतकऱ्यांतर्फे घेराव घातला गेला, तर नाशकातील भाजपा आमदारांच्या घरासमोर घंटानाद केला गेला. यानंतर धरणातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन, नाशकात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला गेला असताना, तसे करण्याची आवश्यकता नसल्याचे पत्र पालकमंत्र्यांनी पाठविले व हे पत्र महासभेत वाचून दाखवा म्हणून भाजपा आमदारांनी आग्रह धरल्याचेही पाहावयास मिळाले. यातून कुणाचे ऐकावे, महापालिका महासभेचे की शासन म्हणून पालकमंत्र्यांचे, अशा पेचात प्रशासन पडले हा भाग वेगळा; परंतु ‘यांनी निर्णय घेतला म्हणून त्यांनी पाणी पेटवायचे आणि त्यांनी काही कळविले की यांनी नकारात्मकता दाखवायची’, असे राजकारण सुरू झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले. लोकभावनांची कदर आम्हालाच कशी आहे, हे दाखवून देण्याचा क्षुल्लक प्रयत्न यामागे असल्याचे लपून राहिले नाही.मुळात, नाशकात एकवेळ पाणीपुरवठ्याची कपात केली गेली असताना पुन्हा आठवड्यातून एक दिवस ‘ड्राय डे’ पाळण्याची गरज नाही असे जेव्हा पालकमंत्री सुचवतात तेव्हा त्यामागे त्यांनी काही अभ्यास केला असेल, हे उघडच आहे. परंतु त्यांच्या या भूमिकेला काटशह देत, आता तुम्हीच महापालिकेत बसून पाणीपुरवठ्याचे नियोजन करून दाखवा म्हणून आव्हानाची भाषा केली गेली. अर्थात असे करण्यामागे खरेच धरणातील पाणीसाठ्याची कमतरता असेल तर आता अगदी अलीकडे खुद्द प्रशासनातर्फे १५ वरून ३० टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतला गेल्यावर सत्ताधारी मनसेसह शिवसेना आदि सर्वपक्षीय गटनेत्यांनी खळखळ करण्याचे कारण नव्हते. पण नव्याने करावयाच्या वाढीव पाणीकपातीचा विषय महासभेपुढे न आणता परस्पर पुढे आल्याने त्यावर सर्वांनीच हल्लाबोल केला. वस्तुत: महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीचा हवाला देत हा वाढीव पाणीकपातीचा विषय पुढे करण्यात आला होता. परंतु अधिकारावरूनच प्रश्न उपस्थित झाल्याने अखेर महापालिका आयुक्तांवर घूमजाव करण्याची वेळ आली. पाण्यासारख्या जीवन-मरणाशी निगडित विषयावर पालिका प्रशासनाने परस्पर असे करावे, ही यातील गंभीर बाब आहे. विशेषत: खुद्द महासभेने यापूर्वी पाणीकपातीसाठी पुढाकार घेतला असताना तिला त्यावेळी थांबवून आता वाढीव कपात रेटण्याचा प्रयत्न झाल्यानेच सत्ताधाऱ्यांसह अन्य पक्षीयांनी विरोधाची भूमिका घेतली. यात कुठे व कशा कपातीने पाणीबचत साधता येईल, या मूलभूत मुद्द्याकडे मात्र सर्वांचेच दुर्लक्ष होते आहे व ते अधिक शोचनीय आहे.