शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याऐवजी वाहतो पैसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 02:51 IST

वर्षभर उठलेला जलयुक्तचा कोलाहल आणि पाण्यासाठी उन्हातान्हात पायपीट करणारी सामान्य माणसं याच मराठवाड्यात आणि यावर्षी सर्वाधिक उसाचे क्षेत्र असणारा हाच मराठवाडा

वर्षभर उठलेला जलयुक्तचा कोलाहल आणि पाण्यासाठी उन्हातान्हात पायपीट करणारी सामान्य माणसं याच मराठवाड्यात आणि यावर्षी सर्वाधिक उसाचे क्षेत्र असणारा हाच मराठवाडा. असे परस्पर विरोधाभासाचे चित्र फक्त येथेच दिसू शकते. मराठवाड्यात जलयुक्त शिवाराची कामे झाली तर पाणी गेले कुठे? या शिवाराच्या नावाखाली निधी जिरला का? असे प्रश्न पडतात. उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना अगोदरच बकाल असलेली खेडी आणखीच उदासवाणी वाटतात. टँकरची वाट पाहणारे नागरिक आणि भांड्याच्या रांगा हे गावोगावचे चित्र आहे. विशेष म्हणजे हे वर्षानुवर्षे पाहायला मिळते. पूर्वी जलयुक्त शिवार नव्हते तरी हेच चित्र होते.अर्धा मराठवाडा आज पाणीटंचाईला तोंड देतो आणि ही परिस्थिती आता सवयीची बनली आहे. उन्हाळ्यात पाणी नाही अशी खूणगाठ सर्वांनीच बांधलेली असते. आठ जिल्ह्यांतील ७६ पैकी ३२ तालुक्यांना या टंचाईचा फटका बसलेला दिसतो. विशेष म्हणजे रेल्वे मार्गावरील औरंगाबाद, जालना, परभणी आणि नांदेड या चार जिल्ह्यांमध्ये ही गंभीर स्थिती आहे.औरंगाबादची परिस्थिती तुलनेने वाईट म्हणावी लागेल. पावसाचा हमखास भाग सोयगाव तालुका समजला जातो. यावर्षी सर्वात भीषण अवस्था तेथेच आहे. अजिंठा लेणी असलेल्या फर्दापूरमध्ये पाणी हाच मोठा प्रश्न आहे. विशेष म्हणजे येथे ना पाणीपुरवठा योजना, ना टँकर. या गावाची जनता वाऱ्यावर. हे वाणगीदाखल उदाहरण. सिल्लोड, कन्नड, वैजापूर, गंगापूर, पैठण हे तालुके पाणीटंचाईने गांजले आहेत. मराठवाड्यातील ८५०० गावांपैकी ५११ गावे पाण्यासाठी केवळ टँकरवर अवलंबून आहेत. दहा लाख लोकांना टँकरशिवाय पर्याय नाही.उन्हाची तीव्रता पाहता एका आठवड्यात ७० गावे वाढली आणि अजून मे संपायचा आहे. जूनमध्ये पावसाचे भाकीत असले तरी तो आला तेव्हा खरे मानायचे. ६५० टँकरद्वारे यांना पाणीपुरवठा केला जातो. पाण्याचा हा खर्च ६८ कोटी रुपयांचा आहे. गेल्या पाच वर्षांतील टंचाई परिस्थितीचा आढावा घेतला तर मराठवाड्यात ५५० कोटी रुपये खर्च झाले. ९०३७ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. या साडेपाचशे कोटी रुपयांत एखादी शाश्वत योजना उभी राहू शकली असती; परंतु एका अर्थाने मराठवाड्यातील टँकर लॉबी पोसण्यावर ती खर्च झाली. एवढे टँकर लावूनसुद्धा लोक तहानलेले आहेत. तर पाणी गेले कुठे हा प्रश्न पडतो. अनेक टँकर कागदावरच धावण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे या टँकर लॉबीत सगळ्याच पक्षांची मंडळी असल्याने ‘सर्व पक्षभाव’ येथे कसोशीने पाळला जातो. येथे पक्षीय मतभेद, संघर्ष बाजूला ठेवलेले दिसतात. औरंगाबाद शहर तर पाणी असून तहानलेले. महानगरपालिकेची दिवाळखोरी एवढी, की पाणी असूनही ती ते देऊ शकत नाही. आता तर नागरिक पाण्यासाठी आंदोलन करीत आहेत; पण प्रशासन हतबल झालेले दिसते.एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे उसाचे क्षेत्र वाढले आहे. आश्चर्य म्हणजे कायम दुष्काळी असणाºया उस्मानाबाद जिल्ह्यात ते सर्वात जास्त. लातूर, बीड, उस्मानाबादेत परतीचा मान्सून बरसल्याने उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली. पुढच्या वर्षी उसाच्या गाळपाचा प्रश्न मराठवाड्यात असेल. त्यात ते निवडणुकीचे वर्ष असल्याने साखर कारखानदार नेत्यांची काळजी वाढली आहे.उन्हाळा म्हटला की, पुन्हा जलसंधारण आलेच. गावोगावी त्याचा गाजावाजा चालू असला तरी यामुळे किती गावे टँकरमुक्त झाली हा आकडा गुलदस्त्यातच आहे, तो कोणीही सांगत नाही. आंधळ्याच्या दळणासारखी ही गोष्ट आहे. पाण्याचा पैसा पाण्यासारखा वाहताना दिसतो; पण मुरतो कोठे हे रहस्य उलगडत नाही. कारण अर्धा मराठवाडा तहानलेला आहे.-सुधीर महाजन