शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

भिंतीलाही कान असतात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 01:27 IST

लोहाणींच्या नेमणुकीने रेल्वे बोर्डात असंतोष-मध्यरात्री कट केल्याप्रमाणे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष म्हणून अश्विनी लोहाणी यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे रेल भवनात संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महिन्यात लागोपाठ दोन रेल्वे अपघात झाल्यामुळे बोर्डाचे अध्यक्ष के. मित्तल यांनी पदत्याग केल्यामुळे पंतप्रधान कार्यालयाने लोहाणी यांची नेमणूक केली. मित्तल यांच्या राजीनाम्यातून रेल्वे प्रशासन सावरण्यापूर्वीच ...

लोहाणींच्या नेमणुकीने रेल्वे बोर्डात असंतोष-मध्यरात्री कट केल्याप्रमाणे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष म्हणून अश्विनी लोहाणी यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे रेल भवनात संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महिन्यात लागोपाठ दोन रेल्वे अपघात झाल्यामुळे बोर्डाचे अध्यक्ष के. मित्तल यांनी पदत्याग केल्यामुळे पंतप्रधान कार्यालयाने लोहाणी यांची नेमणूक केली. मित्तल यांच्या राजीनाम्यातून रेल्वे प्रशासन सावरण्यापूर्वीच रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनीही राजीनामा दिला. पण लोहाणी यांना अध्यक्ष केल्यावर खूपच गहजब झाला. नियम आणि पद्धत यांचा विचार केला असता तर लोहाणी यांची नेमणूक होऊ शकली नसती.रेल्वेमध्ये मुख्य व्यवस्थापक म्हणून काम केले नसेल तर ती व्यक्ती बोर्डाची अध्यक्ष होऊ शकत नाही असे नियम सांगतात.ज्येष्ठता क्रमात लोहाणी हे दोन श्रेणी खाली असतानाही त्यांना सरळ अध्यक्ष करण्यात आले. याशिवाय अपमानास्पद बाब ही की बोर्डातील दोघा सक्षम आणि वरिष्ठ अधिकाºयांना डावलून लोहाणींना अध्यक्ष करण्यात आले. हे दोन अधिकारी रवींद्र गुप्ता आणि महंमद जमशेद पदत्याग करण्याच्या मानसिकतेत आले आहेत. अनेक गंभीर विषय सोडविण्याचा प्रयत्न रेल्वे विभागाकडून होत असताना हे नवे संकट उद्भवले आहे. लोहाणी हेही अनुभवी आणि तांत्रिक गोष्टींचे तज्ज्ञ आहेत. आय.टी.डी.सी.चे अध्यक्ष या नात्याने त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे पंतप्रधान कार्यालय प्रभावित झाले होते. त्यांच्या नव्या नेमणुकीमुळे आय.टी.डी.सी.तही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अशावेळी त्यांना एअर इंडियाचे चेअरमन करून त्यांना ‘बूस्ट’ मिळाला होता!नारायण राणेंना अमित शहांचा सल्ला-काँग्रेसचे असंतुष्ट नेते नारायण राणे यांना संयम पाळण्याचा सल्ला भाजपाच्या हायकमांडने दिला आहे. त्यांचा भाजपा प्रवेश होणारच आहे पण काही काळानंतर. दोन महिन्यापूर्वी नारायण राणे आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांची बैठक झाली. त्याचवेळी राणेंना भाजपात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. अन्य पक्षातील नेत्यांना खुल्या मनाने भाजपात प्रवेश देण्याचे अमित शहा यांचे धोरण आहे. पक्षात दाखल करून त्यांच्यात ‘बदल’ घडवून आणता येतो. कमी काळात भाजपाचा विस्तार करून लोकसभेच्या जागा जिंकण्याचा हा एकमेव मार्ग आहे असे शहा यांना वाटते. यापूर्वीचे अध्यक्ष अन्य पक्षातील नेत्यांना पक्षात घेण्याबाबत धीमे धोरण राबवीत होते. त्यांच्यापेक्षा शहा यांचे विचार वेगळे आहेत. प्रत्येक प्रभावशाली नेता भाजपामध्ये असावा असे शहा यांना वाटते. म्हणूनच त्यांनी राणेंना भाजपा प्रवेशाविषयी आश्वस्त केले आहे.इंडिया फाऊन्डेशनचे योगदान-संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, व्यापार मंत्री सुरेश प्रभू, हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा आणि परराष्टÑ विभागाचे राज्यमंत्री एम.जे. अकबर या सर्वात एकच साम्य आहे. ते प्रोफेशनल आहेत आणि अत्यंत यशस्वी ठरले आहेत. त्यांची प्रगती चकित करणारी आहे. निर्मला सीतारामन यांची प्रगती तर नेत्रदीपक म्हणावी लागेल. त्या सगळ्यांमध्ये एक धागा समान आहे तो म्हणजे भाजपाचे सरचिटणीस राम माधव यांनी स्थापन केलेल्या इंडिया फाऊन्डेशनचे ते महत्त्वाचे सदस्य आहेत. इंडिया फाऊन्डेशन नावाने ओळखले जाणारे थिंक टँक २०१४ मध्ये स्थापन करण्यात आले. त्यापूर्वी राम माधव हे अनेक वर्षे नरेंद्र मोदींसोबत गुजरातमध्ये काम करीत होते. समांतर सत्ता केंद्र अशी राम माधव यांची ओळख आहे. संघ आणि भाजपाशी संबंधित व्यक्तींनी यातºहेचे आठ थिंक टँक निर्माण केले आहेत. त्यापैकी इंडिया फाऊन्डेशन आणि विवेकानंद इंटरनॅशनल फाऊन्डेशन हे अधिक शक्तिशाली आहेत. त्यातूनच नरेंद्र मोदी यांना गुणवंत नेत्यांचा पुरवठा होत असतो. निर्मला सीतारामन यांची पदोन्नती अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यामुळे झाली असे बोलले जाते. पण त्यांच्या यशामागे राम माधव यांचाच हात असून प्रत्येक पातळीवर त्यांनीच सीतारामन यांना पुढे करण्याचा प्रयत्न केला आहे.जुन्या नोटांचे रहस्य गडद झाले-नोटाबंदीनंतर बँकेत जमा झालेल्या नोटांच्या गणतीनंतर रिझर्व्ह बँकेने रु.१५.४४ लाख कोटीच्या जमा झालेल्या नोटांपैकी रु.१५.२८ लाख कोटीच्या जुन्या नोटांची मोजणी पूर्ण झाली असून अंतिम आकडेवारी लवकरच कळविण्यात येईल असे रिझर्व्ह बँकेने जाहीर केले आहे. त्यामुळे जुन्या नोटांचे रहस्य अधिक गडद झाले आहे. रु.१६००० कोटीच्या नोटा रिझर्व्ह बँकेत जमा झालेल्या नाहीत हे त्यामुळे स्पष्ट झाले. याशिवाय नेपाळ राष्ट्रीय बँकेत आणि अन्य शेजारी राष्टÑात जमा झालेल्या नोटा वेगळ्या आहेत. हा आकडा रु.८००० कोटींच्या वर असावा. सहकारी बँकांकडील रु.७००० कोटीच्या नोटा रिझर्व्ह बँकेने अद्याप स्वीकारलेल्या नाहीत. याशिवाय अनिवासी भारतीयांनी रिझर्व्ह बँकांच्या शाखांसमोर आपल्या जवळील नोटा जमा करण्यासाठी रांगा लावल्या होत्या आणि त्या जमा करण्यासाठी सरकारने वारंवार नियमात मनमानी सुधारणा केल्या होत्या. याशिवाय आयकर विभाग, ई.डी., राज्यातील पोलीस दले यांना आपल्याकडील नोटा रिझर्व्ह बँकेत जमा करता आल्या नाहीत त्या वेगळ्याच. तेव्हा प्रत्यक्षात अधिक नोटा छापण्यात आल्या होत्या का या प्रश्नाचे उत्तर कुणापाशीच नाही. या सर्व नोटा बँकेत जमा करण्याची परवानगी देण्यात आली तर काय होईल, या कल्पनेने सरकार घाबरलेले आहे हे मात्र खरे!महागठबंधनमध्ये ममतांना केजरी हवे!१७ विरोधी पक्षांच्या महागठबंधनमध्ये आम आदमी पार्टीचा समावेश करावा असे ममता बॅनर्जींना वाटते. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल हे प्रभावशाली असल्याने ते महागठबंधनमध्ये हवे असे ममता बॅनर्जीचे म्हणणे आहे. पण ‘आप’ला महागठबंधनमध्ये स्थान राहणार नाही हे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. स्वप्नांचे सौदागर म्हणून अरविंद केजरीवाल यांचा लौकिक असल्यामुळे त्यांच्यापासून दूर राहा असा सल्ला काँग्रेसने ममता बॅनर्जींना दिला आहे. आपण कधीच राजकीय पक्ष स्थापन करणार नाही उलट आपल्या विजयासाठी काम करू असे सांगून केजरीवाल यांनी शीला दीक्षित यांची फसवणूक केली होती हे काँग्रेसने मान्य केले आहे. पण केजरीवालांना सोडायला ममता तयार नाहीत. कारण २०१९ च्या निवडणुकीत पंतप्रधान म्हणून ममता बँनर्जींच्या नावाचा पुरस्कार करण्याचे केजरीवाल यांनी अभिवचन दिले आहे म्हणतात!-हरीश गुप्ता‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर