शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादाच्या मोहिमेला मतदारांचा अनुकूल कौल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 04:52 IST

भारतीय नागरिकांच्या जीवनातील महत्त्वाच्या व रोजच्या व्यवहारातील अडचणी व समस्या यांबाबत २०१४ च्या निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करता न आल्याने, त्यातील एकाही विषयाला मोदी व भाजपने हात घातला नाही.

नोटाबंदी व जीएसटीची चुकीची अंमलबजावणी, यामुळे उद्ध्वस्त झालेले छोटे व मध्यम व्यावसायिक, दिसामासाने ढासळत चाललेली अर्थव्यवस्था, ४५ वर्षांतील सर्वात मोठी बेकारी, शेजारील देशांच्या अंतर्गत कारभारात अनावश्यक हस्तक्षेप केल्याने ओढावलेला त्यांचा रोष, महागाईचे रौद्ररूप, पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरात सतत होणारी वाढ, शेती व शेतकऱ्यांच्या समस्या या पार्श्वभूमीवर १७व्या लोकसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीतील प्रचाराची पातळी फारच खाली आल्याची तथाकथित विचारवंत, विश्लेषक आणि प्रसार माध्यमांनी बरीच चिंता व्यक्त केलेली आहे. तथापि, ही पातळी कुणामुळे खाली आली, सुरुवात कोणी केली, याबद्दल बोलायला कोणीही तयार नाही. अशा रितीने प्रचाराची पातळी खाली आणण्याचे नि:संशय श्रेय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जाते, हे सर्वांना माहीत असूनही कोणी त्याबद्दल बोलायला तयार नाही. प्रचारसभांमध्ये जाहीरपणे आपली जात सांगणे, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना दमदाटी करणे, सरकारचे सर्वांगीण अपयश दर्शविणारी अधिकृत संस्थांची आकडेवारी दडपून ठेवणे, अशा अनेक मार्गांनी निवडणूक प्रचारातील मुख्य मुद्दे चर्चेलाच येऊ नयेत, अशी खबरदारी मोदी व शाह या जोडगोळीने घेतली.

भारतीय नागरिकांच्या जीवनातील महत्त्वाच्या व रोजच्या व्यवहारातील अडचणी व समस्या यांबाबत २०१४च्या निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करता न आल्याने,े त्यातील एकाही विषयाला मोदी व भाजपने हात घातला नाही. आपल्या तथाकथित यशस्वी योजनांचे ढोल ते पिटत राहिले, पण जागृत पत्रकारांनी त्या दाव्यांचा फोलपणा उघड करण्यात जराही कसूर सोडली नाही. त्यामुळे एका मर्यादेनंतर अतिराष्ट्रवाद, धार्मिकता आणि जातीनिष्ठा अशा विषयांचा आश्रय त्यांना घ्यावा लागला. धर्म आणि राजकारण यांची बेमालूम मिसळ त्यांनी केली. आपले यश जे मान्य करणार नाहीत किंवा आपले म्हणणे जे मान्य करणारच नाहीत, त्यांना देशद्रोही ठरविण्यापर्यंत मोदी व भाजपची मजल गेली. जोडीला अजय बिस्त, प्रज्ञा सिंह, संबित पात्रा अशी पात्रे होतीच. या सर्वांनी मिळून निवडणुकांचा प्रचार देशभक्त विरुद्ध देशद्रोही, हिंदू विरुद्ध मुसलमान आणि जाती-जातींमधील भेदाभेद इथपर्यंत नेऊन पोहोचविला. राष्ट्रवाद, धर्मवाद आणि जातिवाद यांच्या दुष्टचक्रात अडकलेल्या या मोहिमेला मतदारांनी अनुकूल कौल दिल्याचे दिसले.

काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यातील न्याय योजना, सर्व जातीधर्मांचा सामावेश, राष्ट्रीय सुरक्षितता, धार्मिक सलोखा आणि केंद्र-राज्ये यांच्यात सलोख्याचे व सहकार्याचे संबंध राखणे यावर भर दिला. तथापि, काँग्रेसच्या या जबाबदार व देश आणि लोकहिताच्या प्रचार मोहिमेचा या निवडणुकीत मतदारांवर फारसा परिणाम झालेला दिसला नाही.- डॉ. रत्नाकर महाजन(काँग्रेस प्रवक्ते)