शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

राष्ट्रवादाच्या मोहिमेला मतदारांचा अनुकूल कौल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 04:52 IST

भारतीय नागरिकांच्या जीवनातील महत्त्वाच्या व रोजच्या व्यवहारातील अडचणी व समस्या यांबाबत २०१४ च्या निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करता न आल्याने, त्यातील एकाही विषयाला मोदी व भाजपने हात घातला नाही.

नोटाबंदी व जीएसटीची चुकीची अंमलबजावणी, यामुळे उद्ध्वस्त झालेले छोटे व मध्यम व्यावसायिक, दिसामासाने ढासळत चाललेली अर्थव्यवस्था, ४५ वर्षांतील सर्वात मोठी बेकारी, शेजारील देशांच्या अंतर्गत कारभारात अनावश्यक हस्तक्षेप केल्याने ओढावलेला त्यांचा रोष, महागाईचे रौद्ररूप, पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरात सतत होणारी वाढ, शेती व शेतकऱ्यांच्या समस्या या पार्श्वभूमीवर १७व्या लोकसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीतील प्रचाराची पातळी फारच खाली आल्याची तथाकथित विचारवंत, विश्लेषक आणि प्रसार माध्यमांनी बरीच चिंता व्यक्त केलेली आहे. तथापि, ही पातळी कुणामुळे खाली आली, सुरुवात कोणी केली, याबद्दल बोलायला कोणीही तयार नाही. अशा रितीने प्रचाराची पातळी खाली आणण्याचे नि:संशय श्रेय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जाते, हे सर्वांना माहीत असूनही कोणी त्याबद्दल बोलायला तयार नाही. प्रचारसभांमध्ये जाहीरपणे आपली जात सांगणे, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना दमदाटी करणे, सरकारचे सर्वांगीण अपयश दर्शविणारी अधिकृत संस्थांची आकडेवारी दडपून ठेवणे, अशा अनेक मार्गांनी निवडणूक प्रचारातील मुख्य मुद्दे चर्चेलाच येऊ नयेत, अशी खबरदारी मोदी व शाह या जोडगोळीने घेतली.

भारतीय नागरिकांच्या जीवनातील महत्त्वाच्या व रोजच्या व्यवहारातील अडचणी व समस्या यांबाबत २०१४च्या निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करता न आल्याने,े त्यातील एकाही विषयाला मोदी व भाजपने हात घातला नाही. आपल्या तथाकथित यशस्वी योजनांचे ढोल ते पिटत राहिले, पण जागृत पत्रकारांनी त्या दाव्यांचा फोलपणा उघड करण्यात जराही कसूर सोडली नाही. त्यामुळे एका मर्यादेनंतर अतिराष्ट्रवाद, धार्मिकता आणि जातीनिष्ठा अशा विषयांचा आश्रय त्यांना घ्यावा लागला. धर्म आणि राजकारण यांची बेमालूम मिसळ त्यांनी केली. आपले यश जे मान्य करणार नाहीत किंवा आपले म्हणणे जे मान्य करणारच नाहीत, त्यांना देशद्रोही ठरविण्यापर्यंत मोदी व भाजपची मजल गेली. जोडीला अजय बिस्त, प्रज्ञा सिंह, संबित पात्रा अशी पात्रे होतीच. या सर्वांनी मिळून निवडणुकांचा प्रचार देशभक्त विरुद्ध देशद्रोही, हिंदू विरुद्ध मुसलमान आणि जाती-जातींमधील भेदाभेद इथपर्यंत नेऊन पोहोचविला. राष्ट्रवाद, धर्मवाद आणि जातिवाद यांच्या दुष्टचक्रात अडकलेल्या या मोहिमेला मतदारांनी अनुकूल कौल दिल्याचे दिसले.

काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यातील न्याय योजना, सर्व जातीधर्मांचा सामावेश, राष्ट्रीय सुरक्षितता, धार्मिक सलोखा आणि केंद्र-राज्ये यांच्यात सलोख्याचे व सहकार्याचे संबंध राखणे यावर भर दिला. तथापि, काँग्रेसच्या या जबाबदार व देश आणि लोकहिताच्या प्रचार मोहिमेचा या निवडणुकीत मतदारांवर फारसा परिणाम झालेला दिसला नाही.- डॉ. रत्नाकर महाजन(काँग्रेस प्रवक्ते)