शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

स्वयंसेवींवर वरवंटा

By admin | Updated: January 3, 2017 00:19 IST

केंद्रातील मोदी सरकारने देशातील तब्बल २० हजार स्वयंसेवी संस्थांवर बंदी घालून वरवंटा फिरवण्याची जी कारवाई केली आहे, ती योग्य की त्यामेग सूडबुद्धी आहे हाच चर्चेचा विषय बनला आहे

केंद्रातील मोदी सरकारने देशातील तब्बल २० हजार स्वयंसेवी संस्थांवर बंदी घालून वरवंटा फिरवण्याची जी कारवाई केली आहे, ती योग्य की त्यामेग सूडबुद्धी आहे हाच चर्चेचा विषय बनला आहे. समाज उभारणीत स्वयंसेवी संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे. अनेक समाजाभिमुख योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनीच केले आहे. पण गेल्या १०-१५ वर्षांपासून या परंपरेला ग्रहण लागले, हे सुद्धा तेवढेच खरे. विशेषत: खासगी क्षेत्रांनी समाजसेवेत रस घेतला आणि एनजीओंकडे मोठ्या प्रमाणात पैशाचा ओघ सुरू झाला तेव्हापासून नि:स्वार्थ समाजसेवेची संकल्पना एका अर्थी मोडीतच निघाली. या काळात एनजीओंचे जे मशरुम वाढले त्याची दखल सुप्रीम कोर्टालाही घ्यावी लागली. आज मितीस देशात ज्या ३० लाख स्वयंसेवी संस्था आहेत, त्यापैकी केवळ १३ हजार अधिकृत असल्याचे शासनाचे म्हणणे आहे. सोबतच काही संस्था देशहिताविरुद्ध कार्य करीत असल्याचा गंभीर आरोपही शासनाने केला आहे. हे काही प्रमाणात सत्य असेलही. याशिवाय खासगी क्षेत्राकडून मिळणाऱ्या भरमसाठ निधीमुळे अनेक संस्थांनी स्वत:ची भरभराट करून घेतली हे सुद्धा मान्य. पण याचा अर्थ सरसकट सर्वच एनजीओंना एकाच तराजूत मोजणेही बरे नव्हे. यापूर्वीच्या सरकारने एनजीओंची लाखोंची उलाढाल बघता त्यांच्यावर नियंत्रणाकरिता वेळोवेळी पावले उचलली आहेत. त्यांना मिळणाऱ्या विदेशी निधीची नोंद शासनदरबारी करणे आवश्यक केले. पण त्यांच्यावर बंदीची कारवाई कधी केली नाही आणि हा यावरील पर्यायही नाही. या देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटीच्या वर पोहोचली आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा भार पेलताना समाजातील विविध घटकांचा सहभागही महत्त्वाचा आहेच. हे लक्षात घेऊन शासनाने सर्वच एनजीओंना एकाच माळेचे मणी समजून चिरडून टाकण्यापेक्षा त्यांच्यावर देखरेख ठेवणारी सक्षम यंत्रणा तयार करावी. जेणे करून प्रामाणिकपणे लोकहिताचे कार्य करणाऱ्या संस्थांना त्यांची जबाबदारी निश्चिंतपणे पार पाडता येईल.