शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

स्वयंसेवींवर वरवंटा

By admin | Updated: January 3, 2017 00:19 IST

केंद्रातील मोदी सरकारने देशातील तब्बल २० हजार स्वयंसेवी संस्थांवर बंदी घालून वरवंटा फिरवण्याची जी कारवाई केली आहे, ती योग्य की त्यामेग सूडबुद्धी आहे हाच चर्चेचा विषय बनला आहे

केंद्रातील मोदी सरकारने देशातील तब्बल २० हजार स्वयंसेवी संस्थांवर बंदी घालून वरवंटा फिरवण्याची जी कारवाई केली आहे, ती योग्य की त्यामेग सूडबुद्धी आहे हाच चर्चेचा विषय बनला आहे. समाज उभारणीत स्वयंसेवी संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे. अनेक समाजाभिमुख योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनीच केले आहे. पण गेल्या १०-१५ वर्षांपासून या परंपरेला ग्रहण लागले, हे सुद्धा तेवढेच खरे. विशेषत: खासगी क्षेत्रांनी समाजसेवेत रस घेतला आणि एनजीओंकडे मोठ्या प्रमाणात पैशाचा ओघ सुरू झाला तेव्हापासून नि:स्वार्थ समाजसेवेची संकल्पना एका अर्थी मोडीतच निघाली. या काळात एनजीओंचे जे मशरुम वाढले त्याची दखल सुप्रीम कोर्टालाही घ्यावी लागली. आज मितीस देशात ज्या ३० लाख स्वयंसेवी संस्था आहेत, त्यापैकी केवळ १३ हजार अधिकृत असल्याचे शासनाचे म्हणणे आहे. सोबतच काही संस्था देशहिताविरुद्ध कार्य करीत असल्याचा गंभीर आरोपही शासनाने केला आहे. हे काही प्रमाणात सत्य असेलही. याशिवाय खासगी क्षेत्राकडून मिळणाऱ्या भरमसाठ निधीमुळे अनेक संस्थांनी स्वत:ची भरभराट करून घेतली हे सुद्धा मान्य. पण याचा अर्थ सरसकट सर्वच एनजीओंना एकाच तराजूत मोजणेही बरे नव्हे. यापूर्वीच्या सरकारने एनजीओंची लाखोंची उलाढाल बघता त्यांच्यावर नियंत्रणाकरिता वेळोवेळी पावले उचलली आहेत. त्यांना मिळणाऱ्या विदेशी निधीची नोंद शासनदरबारी करणे आवश्यक केले. पण त्यांच्यावर बंदीची कारवाई कधी केली नाही आणि हा यावरील पर्यायही नाही. या देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटीच्या वर पोहोचली आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा भार पेलताना समाजातील विविध घटकांचा सहभागही महत्त्वाचा आहेच. हे लक्षात घेऊन शासनाने सर्वच एनजीओंना एकाच माळेचे मणी समजून चिरडून टाकण्यापेक्षा त्यांच्यावर देखरेख ठेवणारी सक्षम यंत्रणा तयार करावी. जेणे करून प्रामाणिकपणे लोकहिताचे कार्य करणाऱ्या संस्थांना त्यांची जबाबदारी निश्चिंतपणे पार पाडता येईल.