शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

स्वयंसेवींवर वरवंटा

By admin | Updated: January 3, 2017 00:19 IST

केंद्रातील मोदी सरकारने देशातील तब्बल २० हजार स्वयंसेवी संस्थांवर बंदी घालून वरवंटा फिरवण्याची जी कारवाई केली आहे, ती योग्य की त्यामेग सूडबुद्धी आहे हाच चर्चेचा विषय बनला आहे

केंद्रातील मोदी सरकारने देशातील तब्बल २० हजार स्वयंसेवी संस्थांवर बंदी घालून वरवंटा फिरवण्याची जी कारवाई केली आहे, ती योग्य की त्यामेग सूडबुद्धी आहे हाच चर्चेचा विषय बनला आहे. समाज उभारणीत स्वयंसेवी संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे. अनेक समाजाभिमुख योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनीच केले आहे. पण गेल्या १०-१५ वर्षांपासून या परंपरेला ग्रहण लागले, हे सुद्धा तेवढेच खरे. विशेषत: खासगी क्षेत्रांनी समाजसेवेत रस घेतला आणि एनजीओंकडे मोठ्या प्रमाणात पैशाचा ओघ सुरू झाला तेव्हापासून नि:स्वार्थ समाजसेवेची संकल्पना एका अर्थी मोडीतच निघाली. या काळात एनजीओंचे जे मशरुम वाढले त्याची दखल सुप्रीम कोर्टालाही घ्यावी लागली. आज मितीस देशात ज्या ३० लाख स्वयंसेवी संस्था आहेत, त्यापैकी केवळ १३ हजार अधिकृत असल्याचे शासनाचे म्हणणे आहे. सोबतच काही संस्था देशहिताविरुद्ध कार्य करीत असल्याचा गंभीर आरोपही शासनाने केला आहे. हे काही प्रमाणात सत्य असेलही. याशिवाय खासगी क्षेत्राकडून मिळणाऱ्या भरमसाठ निधीमुळे अनेक संस्थांनी स्वत:ची भरभराट करून घेतली हे सुद्धा मान्य. पण याचा अर्थ सरसकट सर्वच एनजीओंना एकाच तराजूत मोजणेही बरे नव्हे. यापूर्वीच्या सरकारने एनजीओंची लाखोंची उलाढाल बघता त्यांच्यावर नियंत्रणाकरिता वेळोवेळी पावले उचलली आहेत. त्यांना मिळणाऱ्या विदेशी निधीची नोंद शासनदरबारी करणे आवश्यक केले. पण त्यांच्यावर बंदीची कारवाई कधी केली नाही आणि हा यावरील पर्यायही नाही. या देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटीच्या वर पोहोचली आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा भार पेलताना समाजातील विविध घटकांचा सहभागही महत्त्वाचा आहेच. हे लक्षात घेऊन शासनाने सर्वच एनजीओंना एकाच माळेचे मणी समजून चिरडून टाकण्यापेक्षा त्यांच्यावर देखरेख ठेवणारी सक्षम यंत्रणा तयार करावी. जेणे करून प्रामाणिकपणे लोकहिताचे कार्य करणाऱ्या संस्थांना त्यांची जबाबदारी निश्चिंतपणे पार पाडता येईल.