शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

‘विराट’ नेतृत्व

By admin | Updated: January 25, 2017 01:07 IST

कसोटी मालिकेत इंग्लंडला एकतर्फी धूळ चारल्यानंतर तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतही भारताने क्रिकेटच्या या जन्मदात्याला नमवून निर्विवाद वर्चस्व मिळवले.

कसोटी मालिकेत इंग्लंडला एकतर्फी धूळ चारल्यानंतर तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतही भारताने क्रिकेटच्या या जन्मदात्याला नमवून निर्विवाद वर्चस्व मिळवले. मुळात ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ४-० अशी बाजी मारल्यानंतर एकदिवसीय मालिकेत २-० अशा आघाडीनंतर भारताला इंग्लंडला क्लीन स्वीप देण्याची संधी मिळाली होती. मात्र अखेरच्या थरारक सामन्यात मोक्याच्या वेळी चुका झाल्याने इंग्लंडला यंदाच्या भारत दौऱ्यात पहिला विजय मिळवण्यात यश आले. सध्या या मालिकेत भारताची युवा नेतृत्वाखाली ‘विराट’ घोडदौड सुरू आहे. आपल्या अनपेक्षित निर्णयाने क्रि केटविश्वाला नेहमी चकीत करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का दिला. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या काही दिवसआधीच त्याने मर्यादित षटकांच्या भारतीय संघाचे नेतृत्व सोडण्याची घोषणा केली. यामुळे कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या गळ्यात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील संघाचे कर्णधारपदाची माळ पडली. कर्णधार जेव्हा आपल्या खेळाडूंवर विश्वास दाखवतो तेव्हा निश्चित त्या संघाची कामगिरी वरचढ होते. विशेष म्हणजे, हेच गुण धोनी आणि कोहली यांच्यामध्ये आहेत. कोहलीच्या आक्रमक नेतृत्वामुळे संघातील खेळाडूंमध्येही आत्मविश्वास मिळाला आणि हेच केदार जाधव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा यांसारख्या खेळाडूंच्या कामगिरीतून दिसून येते. एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत भारतीय संघाची आक्र मकता इंग्लंडवर जबरदस्त भारी पडली. अंतिम सामन्यातही भारताने बेडरपणे खेळ करताना इंग्लंडला जेरीस आणले. परंतु, डेथ ओव्हरमधील माफक चुका भारतीयांना महागात पडली. नाहीतर, एकदिवसीय मालिकेत साहेबांचा क्लीन स्वीप निश्चित होता. आता, हीच चूक सुधारण्याचा प्रयत्न करताना भारताची ‘विराट सेना’ सज्ज झाली आहे. २६ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी इंग्लंड संघ टी-२० स्पेशालिस्ट असल्याने पुन्हा एकदा काटे की टक्कर पाहायला मिळेल, हे नक्की.