शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

‘विराट’ नेतृत्व

By admin | Updated: January 25, 2017 01:07 IST

कसोटी मालिकेत इंग्लंडला एकतर्फी धूळ चारल्यानंतर तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतही भारताने क्रिकेटच्या या जन्मदात्याला नमवून निर्विवाद वर्चस्व मिळवले.

कसोटी मालिकेत इंग्लंडला एकतर्फी धूळ चारल्यानंतर तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतही भारताने क्रिकेटच्या या जन्मदात्याला नमवून निर्विवाद वर्चस्व मिळवले. मुळात ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ४-० अशी बाजी मारल्यानंतर एकदिवसीय मालिकेत २-० अशा आघाडीनंतर भारताला इंग्लंडला क्लीन स्वीप देण्याची संधी मिळाली होती. मात्र अखेरच्या थरारक सामन्यात मोक्याच्या वेळी चुका झाल्याने इंग्लंडला यंदाच्या भारत दौऱ्यात पहिला विजय मिळवण्यात यश आले. सध्या या मालिकेत भारताची युवा नेतृत्वाखाली ‘विराट’ घोडदौड सुरू आहे. आपल्या अनपेक्षित निर्णयाने क्रि केटविश्वाला नेहमी चकीत करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का दिला. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या काही दिवसआधीच त्याने मर्यादित षटकांच्या भारतीय संघाचे नेतृत्व सोडण्याची घोषणा केली. यामुळे कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या गळ्यात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील संघाचे कर्णधारपदाची माळ पडली. कर्णधार जेव्हा आपल्या खेळाडूंवर विश्वास दाखवतो तेव्हा निश्चित त्या संघाची कामगिरी वरचढ होते. विशेष म्हणजे, हेच गुण धोनी आणि कोहली यांच्यामध्ये आहेत. कोहलीच्या आक्रमक नेतृत्वामुळे संघातील खेळाडूंमध्येही आत्मविश्वास मिळाला आणि हेच केदार जाधव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा यांसारख्या खेळाडूंच्या कामगिरीतून दिसून येते. एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत भारतीय संघाची आक्र मकता इंग्लंडवर जबरदस्त भारी पडली. अंतिम सामन्यातही भारताने बेडरपणे खेळ करताना इंग्लंडला जेरीस आणले. परंतु, डेथ ओव्हरमधील माफक चुका भारतीयांना महागात पडली. नाहीतर, एकदिवसीय मालिकेत साहेबांचा क्लीन स्वीप निश्चित होता. आता, हीच चूक सुधारण्याचा प्रयत्न करताना भारताची ‘विराट सेना’ सज्ज झाली आहे. २६ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी इंग्लंड संघ टी-२० स्पेशालिस्ट असल्याने पुन्हा एकदा काटे की टक्कर पाहायला मिळेल, हे नक्की.