शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
2
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
3
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
5
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
6
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
7
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
8
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
9
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
10
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
11
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
12
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
13
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
14
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
15
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
16
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
17
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
18
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
19
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
20
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”

व्हीआयपी कल्चर

By admin | Updated: June 20, 2017 00:40 IST

नरेंद्र मोदी सरकारने काही दिवसांपूर्वी सर्व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या गाड्यांवरील लाल, पिवळे, निळे दिवे काढण्याचा निर्णय अंमलात आणला.

नरेंद्र मोदी सरकारने काही दिवसांपूर्वी सर्व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या गाड्यांवरील लाल, पिवळे, निळे दिवे काढण्याचा निर्णय अंमलात आणला. त्यावेळी देशातील ‘व्हीआयपी कल्चर’ मोडीत काढण्याचा सरकारचा मानस असल्याचे आणि गाड्यांवरील दिवे काढून घेणे हा त्याचाच एक भाग असल्याचे मोठ्या अभिमानाने सांगण्यात आले होते. त्यामागचा सरकारचा हेतू प्रामाणिक असेलही; पण राजकीय नेत्यांच्या डोक्यात मात्र ‘व्हीआयपी कल्चर’ ठासून भरले असल्याचे नित्य सिद्ध होत आहे. त्याच मालिकेतील दोन प्रकार नुकतेच समोर आले. त्यामध्ये सामील असलेल्या नेत्यांपैकी एक तर मोदींच्या भारतीय जनता पक्षाचेच आहेत आणि दुसरे तेलुगू देसम या भाजपाच्या मित्र पक्षाचे आहेत. गुजरात विधानसभेचे सभापती आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते रमणलाल व्होरा यांनी केवळ त्यांना काका संबोधले म्हणून एका सुरक्षा रक्षकाच्या नोकरीवर गदा आणली. व्होरा तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या एजन्सीचे कंत्राटही संपुष्टात आणले. दुसऱ्या प्रकरणात विमानतळावर उशिरा पोहचले म्हणून बोर्डिंग पास नाकारण्यात आलेले तेलुगू देसमचे खासदार दिवाकर रेड्डी यांनी विमानतळ डोक्यावर घेतले. व्होरांनी ज्याचा रोजगार हिरावून घेतला त्या सुरक्षा रक्षकाची चूक एवढीच होती की, त्याने इस्पितळाच्या प्रवेशद्वारासमोर वाहन उभे केल्याबद्दल हटकले आणि तसे करताना व्होरा यांना काका संबोधले! जगातल्या सर्व भाषांप्रमाणे गुजराती भाषेतही काका हा शब्द आदरार्थीच आहे. बरे, व्होरा यांचे वयही काका संबोधल्यामुळे राग येण्याएवढे कमी नाही. याचाच अर्थ त्यांचा पारा काका संबोधल्यामुळे नव्हे, तर प्रवेशद्वारासमोर वाहन उभे न करू दिल्याने चढला असावा, हे स्पष्ट आहे. कदाचित व्होरा यांच्या वाहनावर लाल दिवा नसल्याने ते ‘व्हीआयपी’ असल्याचे सुरक्षा रक्षकाच्या ध्यानातच आले नसावे. तिकडे रेड्डी यांचे डोके फिरण्याचे कारण म्हणजे ते खासदार असूनही उशीर झाल्यामुळे त्यांना बोर्डिंग पास नाकारण्याचे पातक, रेड्डींच्या लेखी क्षुद्र असलेल्या एका कर्मचाऱ्याने केले! दोन्ही प्रकरणांमध्ये अहं दुखावल्यामुळेच पुढचे रामायण घडले हे उघड आहे. आपल्या देशात स्वातंत्र्यापासून रुजलेल्या ‘व्हीआयपी कल्चर’ने राजकीय नेत्यांचा अहं गोंजारण्याचेच काम केले. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवतो, किंवा रतन टाटा पुस्तक खरेदी करण्यासाठी रांगेत उभे राहतात, तेव्हा आपल्या देशातील सर्वसामान्यांना त्याचे कौतुक वाटते; पण आमच्या नेते मंडळीला बहुधा ते मूृर्ख वाटत असावेत. आम्ही कुणी तरी वेगळे आहोत, आम्हाला मानमरातब मिळायलाच हवा, इतरांनी आमच्या दबदब्याखाली दबायलाच हवे, ही मानसिकताच अशा प्रकरणांच्या मुळाशी असते. जोपर्यंत ही मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत केवळ वाहनांवरील दिवे काढल्याने काहीही होणार नाही!