शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

व्हीआयपी थकबाकीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:17 IST

मालमत्ता कर आणि पाणीपट्टी हे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत असतात. हे दोन्ही स्रोत थांबले की त्या संस्थेचा विकास थांबतो. कर्जाच्या ओझ्यात कारभार करणा-या नागपूर महापालिकेचे दोन्ही उत्पन्नाचे स्रोत सध्या आटत चालले आहेत.

मालमत्ता कर आणि पाणीपट्टी हे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत असतात. हे दोन्ही स्रोत थांबले की त्या संस्थेचा विकास थांबतो. कर्जाच्या ओझ्यात कारभार करणा-या नागपूर महापालिकेचे दोन्ही उत्पन्नाचे स्रोत सध्या आटत चालले आहेत. याला जितकी महापालिका जबाबदार आहे तितकेच शहरातील व्हीआयपी थकबाकीदारही. नागपुरात दीड लाखांहून जास्त पाणीपट्टी थकबाकीदार आहेत. यात व्हीयआयपींची संख्या जास्त आहे. सामान्य माणसाने एक महिन्याचे बिल थकविले की त्याच्या घरच्या नळाचे कनेक्शन कापण्यास क्षणाचाही विलंब न लावणारी महापालिकेची यंत्रणा इथे का थांबते ? हा प्रश्न अजूनही कायम आहे. त्याचे उत्तर सा-यानांच माहिती आहे. कारण हे थकबाकीदार दुसरे कुणी नसून प्रशासनात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष महत्त्वाची भूमिका वठविणारी मंडळी आहे. नागपुरात पिण्याचे पाणी वितरणाचे खासगीकरण करण्यात आले. संबंधित कंपनीला महापालिका विविध स्रोतांच्या माध्यमातून पाणी पुरविते. या कंपनीकडे केवळ वितरण आणि वसुली या दोन जबाबदाºया आहेत. त्यामुळे पाणी नियमित असल्याने कंपनीचा भार आधीच कमी झालेला आहे. मात्र यामुळे महापालिकेच्या महसुली उत्पन्नात सातत्याने घट होत आहे. ती घट आठ वर्षांपासून सुरू आहे. आश्चर्याची बाब म्हणजे खासगी जोडण्यांसोबतच नियमांनुसार कामकाज करण्याचा दावा करणा-या पोलीस मुख्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय इतकेच काय तर मनपाच्या कार्यालयांचादेखील पाणीपट्टी थकबाकीदारांमध्ये समावेश आहे. शहरात १ लाख ६९ हजार २५० पाणीपट्टी थकबाकीदार आहेत. त्यापैकी ११७ थकबाकीदारांकडे लाखो रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. ज्यांच्याकडे लाखो रुपयांची थकबाकी आहे तिथे २४ बाय ७ योजनेअंतर्गत नियमित पाणीपुरवठा सुरु आहे. मात्र जे नियमित बिल भरतात त्यांची अजूनही पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. हे महापालिकेचे वास्तव आहे. मुळात समाजात ताठ मानेने वावरणा-या या मंडळींच्या घरचे नळ कनेक्शन तत्काळ कापण्यात यावे, अशी सामान्य माणसाची मागणी आहे. मात्र तसे होणार नाही. कारण व्हीआयपी कल्चरमध्ये सिस्टिम पोखरलेली आहे. एकीकडे महसूल घटल्याने प्रभागात विकासाची बोंब आहे. मालमत्ता कर भरला नाही म्हणून सामान्य माणसाच्या घराचा लिलाव करणारी ही मंडळी या व्हीआयपींच्या घरावर कधीही चालून का जात नाही. कायद्याचा आधार घेत त्यांचे अधिकार संपुष्टात का आणत नाही, हा जनसामान्यांचा प्रश्न अजूनही कायम आहे.