शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

व्हीआयपी थकबाकीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:17 IST

मालमत्ता कर आणि पाणीपट्टी हे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत असतात. हे दोन्ही स्रोत थांबले की त्या संस्थेचा विकास थांबतो. कर्जाच्या ओझ्यात कारभार करणा-या नागपूर महापालिकेचे दोन्ही उत्पन्नाचे स्रोत सध्या आटत चालले आहेत.

मालमत्ता कर आणि पाणीपट्टी हे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत असतात. हे दोन्ही स्रोत थांबले की त्या संस्थेचा विकास थांबतो. कर्जाच्या ओझ्यात कारभार करणा-या नागपूर महापालिकेचे दोन्ही उत्पन्नाचे स्रोत सध्या आटत चालले आहेत. याला जितकी महापालिका जबाबदार आहे तितकेच शहरातील व्हीआयपी थकबाकीदारही. नागपुरात दीड लाखांहून जास्त पाणीपट्टी थकबाकीदार आहेत. यात व्हीयआयपींची संख्या जास्त आहे. सामान्य माणसाने एक महिन्याचे बिल थकविले की त्याच्या घरच्या नळाचे कनेक्शन कापण्यास क्षणाचाही विलंब न लावणारी महापालिकेची यंत्रणा इथे का थांबते ? हा प्रश्न अजूनही कायम आहे. त्याचे उत्तर सा-यानांच माहिती आहे. कारण हे थकबाकीदार दुसरे कुणी नसून प्रशासनात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष महत्त्वाची भूमिका वठविणारी मंडळी आहे. नागपुरात पिण्याचे पाणी वितरणाचे खासगीकरण करण्यात आले. संबंधित कंपनीला महापालिका विविध स्रोतांच्या माध्यमातून पाणी पुरविते. या कंपनीकडे केवळ वितरण आणि वसुली या दोन जबाबदाºया आहेत. त्यामुळे पाणी नियमित असल्याने कंपनीचा भार आधीच कमी झालेला आहे. मात्र यामुळे महापालिकेच्या महसुली उत्पन्नात सातत्याने घट होत आहे. ती घट आठ वर्षांपासून सुरू आहे. आश्चर्याची बाब म्हणजे खासगी जोडण्यांसोबतच नियमांनुसार कामकाज करण्याचा दावा करणा-या पोलीस मुख्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय इतकेच काय तर मनपाच्या कार्यालयांचादेखील पाणीपट्टी थकबाकीदारांमध्ये समावेश आहे. शहरात १ लाख ६९ हजार २५० पाणीपट्टी थकबाकीदार आहेत. त्यापैकी ११७ थकबाकीदारांकडे लाखो रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. ज्यांच्याकडे लाखो रुपयांची थकबाकी आहे तिथे २४ बाय ७ योजनेअंतर्गत नियमित पाणीपुरवठा सुरु आहे. मात्र जे नियमित बिल भरतात त्यांची अजूनही पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. हे महापालिकेचे वास्तव आहे. मुळात समाजात ताठ मानेने वावरणा-या या मंडळींच्या घरचे नळ कनेक्शन तत्काळ कापण्यात यावे, अशी सामान्य माणसाची मागणी आहे. मात्र तसे होणार नाही. कारण व्हीआयपी कल्चरमध्ये सिस्टिम पोखरलेली आहे. एकीकडे महसूल घटल्याने प्रभागात विकासाची बोंब आहे. मालमत्ता कर भरला नाही म्हणून सामान्य माणसाच्या घराचा लिलाव करणारी ही मंडळी या व्हीआयपींच्या घरावर कधीही चालून का जात नाही. कायद्याचा आधार घेत त्यांचे अधिकार संपुष्टात का आणत नाही, हा जनसामान्यांचा प्रश्न अजूनही कायम आहे.