शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामविकासाचा ‘विखे’ पॅटर्न

By admin | Updated: January 5, 2017 02:08 IST

सत्तेत असो वा नसो. बाळासाहेब विखे यांच्याभोवती सतत माणसांची गर्दी होती. विरोधकांसोबत त्यांचा स्वकियांनाही दरारा होता. मुख्यमंत्री होण्याची सर्व क्षमता या नेत्यात होती.

सत्तेत असो वा नसो. बाळासाहेब विखे यांच्याभोवती सतत माणसांची गर्दी होती. विरोधकांसोबत त्यांचा स्वकियांनाही दरारा होता. मुख्यमंत्री होण्याची सर्व क्षमता या नेत्यात होती. पण, कॉंग्रेसच्या दरबारी राजकारणात त्यांना संधी मिळाली नाही. विखेही त्यासाठी झुकले नाहीत. माजी केंद्रीय मंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांचे नुकतेच निधन झाले. सत्तेत असो वा नसो काही माणसांभोवती सतत गर्दी असते, दरारा असतो, ते भाग्य व वलय बाळासाहेब विखे यांना लाभले होते. ते पस्तीस वर्षांहून अधिक काळ खासदार होते. आमदारकीची निवडणूक त्यांनी कधीही लढवली नाही. जिल्हा परिषद उपाध्यक्ष ते खासदार असा त्यांचा प्रवास होता. त्यांच्या खासदारकीचा असा की लोक त्यांना खासदार नसतानाही ‘खासदार साहेब’ म्हणूनच संबोधत. ग्रामीण अर्थव्यवस्थेचे अचूक नाडीनिदान करणारा नेता हीच खरी त्यांची ठळक ओळख सांगता येईल. प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना काढणारे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांचे बाळासाहेब हे वारसदार. पण, बाळासाहेबांनी सहकारासोबतच राजकारणात व शिक्षण क्षेत्रात उत्तुंग झेप घेतली. लोणी येथे पहिले खासगी तंत्रनिकेतन उभारुन ग्रामीण महाराष्ट्रात खासगी शिक्षणाचा पाया त्यांनी घातला. या ‘प्रवरा मॉडेल’ मुळे खेड्यापाड्यातील मुलांनाही वैद्यकीय शिक्षण व अभियांत्रिकीची दारे खुली झाली. पुढे हा पॅटर्न राज्यभर गेला. इतरांनी त्याचे अनुकरण केले. राज्यातील या शैक्षणिक क्रांतीचे श्रेय बाळासाहेबांना द्यावे लागेल. ते स्वत: पदवीधर नव्हते. पण, ग्रामीण महाराष्ट्राला आधुनिक शिक्षण मिळावे ही तळमळ होती. संसदेसोबतच त्यांनी आपले गाव कधी सोडले नाही. ‘स्मार्ट ग्राम’ संकल्पनेचा जन्म अलीकडे झाला. पण तत्पूर्वीच ग्रामीण भागाला उर्जितावस्था आणण्यासाठी विखे पाटलांनी ती पावले उचलली होती. पाणी परिषद व नदी जोड प्रकल्पाची मांडणी करुन त्यांनी पाण्याच्या उपलब्धतेसाठी सरकारला काही पर्याय सुचविले. ग्रामीण विकास व आदिवासींबाबत संशोधनासाठी प्रवरा परिसरात खास काही संस्थांची निर्मिती केली. शेतकऱ्यांपर्यंत ज्ञान पोहोचावे यासाठी कम्युनिटी रेडिओ काढला. संत तुकारामांवरचे नाणे काढले. साहित्यिकांसाठी पुरस्कार सुरु केले. अभ्यासवर्ग काढले. सर्व क्षेत्रात त्यांनी चौफेर मुशाफिरी केली. बाळासाहेब दीर्घकाळ संसदेत राहिले. पण, कॉंग्रेसने त्यांना साधे मंत्रिपदही दिले नाही. त्यासाठी त्यांना काही काळ शिवसेनेत जावे लागले. कॉंग्रेसमध्ये राजीव गांधींच्या विरोधात दबावगट काढणारे नेते असा शिक्का त्यांच्यावर मारला गेला. शंकरराव चव्हाण यांनी जी महाराष्ट्र समाजवादी कॉंग्रेस काढली. त्या कॉंग्रेसचे विखे अध्यक्ष होते. चव्हाण वगळता कॉंग्रेसमध्ये त्यांनी कुणाचे फारसे ऐकले नाही. शरद पवार व त्यांचे कधीच पटले नाही. पवारांना त्यांनी जाहीरपणे अनेकदा विरोध केला. १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने त्यांचे तिकीट कापले. त्यावेळी अहमदनगर मतदारसंघात कॉंग्रेसच्या यशवंतराव गडाख यांच्या विरोधात विखेंनी अपक्ष निवडणूक लढवली. ते पराभूत झाले. मात्र, या निवडणुकीत गडाख व पवारांनी केलेल्या आरोपांवरुन विखे न्यायालयात गेले. ही निवडणूक उच्च न्यायालयाने रद्द केली. या निकालाने शरद पवार निवडणुकीतून सहा वर्षे अपात्र होण्याची वेळ आली होती. पण, सर्वोच्च न्यायालयात त्यांना दिलासा मिळाला. हा खटला तेव्हा देशात गाजला. संस्मरणीय झाला. नगर जिल्ह्याच्या राजकारणात ‘विखे पाटील’ हाच एक पक्ष होता. गावोगाव त्यांचे सर्वपक्षीय समर्थक होते. त्यांना त्यांनी जपले. या जोरावर त्यांचा स्वपक्षात व विरोधकांतही दबदबा होता. हवामानाच्या अंदाजासारखाच ‘विखे पाटलांची भूमिका काय?’ हा अंदाज नेते घ्यायचे. प्रस्थापित व नात्यागोत्याच्या राजकारणाला त्यांनी शह दिला. सहकारी कारखाना काढताना पद्मश्री विखे म्हणायचे, ‘पोट भरलेल्याला घास भरविण्यात काय मतलब आहे? उपाश्याला तुकडा दिला तर तो खरा सहकार’. बाळासाहेबांचे राजकारण काहीसे असेच होते. - सुधीर लंके