शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

पाकिस्तानातल्या स्री पत्रकार ‘ऑनर किलिंग’च्या बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 00:15 IST

नोव्हेंबर महिन्यात लाहोर येथे ‘एन्टी क्राइम’ नावाच्या वर्तमानपत्राचा मालक दिलावर अलीने त्याची आधीची पत्नी आणि पत्रकार आरुज इक्बाल (२७) ची हत्या केली होती.

शाहीना शाहीन ही २५ वर्षांची तरुण पत्रकार. पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांतातली. तिचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. बलुचिस्तानच्या तुरबाट शहरात गेल्या शनिवारी शाहीनाची हत्या तिच्या नवऱ्याने केली. घराण्याच्या तथाकथित ‘प्रतिष्ठेच्या’ नावाखाली ही हत्या (आॅनर किलिंग) करण्यात आल्याची शक्यता आहे. बलुचिस्तान व पाकिस्तानच्या इतर भागात आॅनर किलिंगची अमानवीय प्रथा अजूनही मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहेपाकिस्तान टीव्हीच्या सकाळच्या बलोची भाषेतील ‘बोलन’ नावाच्या कार्यक्रमाची शाहीन अँकर होती. ‘झगहर’ नावांच्या नियतकालिकाची ती संपादिका होती. महिलांच्या प्रश्नांवर स्पष्ट भूमिका घ्यायची. प्रसिद्ध चित्रकारदेखील होती.

पाच महिन्यांपूर्वीच नवाबजादा मेहराब गुचकीशी शाहीनचा निकाह झाला होता. नवºयापेक्षा शाहीना बलुचिस्तानात अधिक प्रसिद्ध होती. पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेत आपल्यापेक्षा पत्नीचं अधिक प्रसिद्ध असणं बºयाचदा ‘गुन्हा’ ठरतो. या कारणावरून शाहीनाची हत्या करण्यात आल्याचा वहीम आहे. आपल्याच घरी तीन गोळ्या घालून नवºयाने शाहीनाची हत्या केली व त्यानंतर तो स्वत:च्या वाहनातून शाहीनाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. हॉस्पिटलमध्ये शाहीनाला ठेवलं आणि तो पळून गेला. तिथे शाहीनाचा मृत्यू झाला. या घटनेने पाकिस्तानच्या पत्रकारांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे. पाकिस्तान फेडरल युनियन आॅफ जर्नालिस्टस या संघटनेने शाहीनच्या हत्येची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे.

नोव्हेंबर महिन्यात लाहोर येथे ‘एन्टी क्राइम’ नावाच्या वर्तमानपत्राचा मालक दिलावर अलीने त्याची आधीची पत्नी आणि पत्रकार आरुज इक्बाल (२७) ची हत्या केली होती. आरुजनी काम करता कामा नये, असा दिलावरचा हट्ट होता; पण आरुज पत्रकारितेचा व्यवसाय सोडण्यास तयार नव्हती. ती स्वत: नवीन नियतकालिक सुरू करण्याच्या प्रयत्नात होती. हे सहन न झाल्यामुळे दिलावरने तिची हत्या केली.आधीच पाकिस्तानात काम करणाºया महिलांची संख्या अत्यल्प आहे. ‘फ्रीडम नेटवर्क’ नावाच्या संघटनेचा २०१८ सालचा अहवाल सांगतो, की पाकिस्तानातील माध्यमांमध्ये काम करणºया महिलांचं प्रमाण पाच टक्क्यांहून कमी आहे. अशी अवस्था असताना आता पाकिस्तानातील स्री माध्यमकर्मींना आता या सरंजामी मानसिकतेची शिकार व्हावी लागणं अत्यंत दुर्दैवी आहे.

पाकिस्तानच्या मानवी हक्क आयोगाच्या आकडेवारीनुसार पाकिस्तानात दरवर्षी अंदाजे एक हजार जणांची ‘आॅनर किलिंग’च्या नावाने हत्या केली जाते. साहजिकच त्यात महिलांची संख्या अधिक असते. २०१६ मध्ये समाजमाध्यमातील स्टार कंदील बलोचची हत्या तिच्या भावाने इतरांच्या मदतीने केली होती. कंदीलच्या भावाला जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने दिली आहे.

बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वा आणि ग्रामीण सिंधमध्ये ही क्रूर प्रथा आजही अस्तित्वात आहे. आपल्याकडेदेखील हरयाणा व उत्तर प्रदेशच्या काही भागात आॅनर किलिंगच्या घटना घडत असतात. महाराष्ट्रातही ही प्रकरणे दुर्दैवाने नवी राहिलेली नाहीत.आॅनर किलिंगला सरंजामी व्यवस्थेत ‘प्रतिष्ठा’ मिळते, हे दुर्दैव आहे. एखाद्या मुलीने स्वत:च्या इच्छेप्रमाणे लग्न करायचा निर्णय घेतला तर तिला किंवा तिच्या जोडीदाराला किंवा दोघांना मारून टाकण्याची क्रूर प्रथा २१ व्या शतकातदेखील अस्तित्वात आहे, ही चिंतेची बाब आहे.त्याच्याकडे घराण्याची ‘प्रतिष्ठा’ म्हणून पाहिले जाते आणि त्यामुळे बहुतेक खटल्यात आरोपी सुटतात कारण साक्षी द्यायला कोणी पुढे येत नाही.

बलुचिस्तान हा पाकिस्तानातला सर्वात मोठा आणि सर्वात कमी लोकसंख्या असलेला प्रांत. खनिजे, तेल यांनी समृद्ध. त्याचा फायदा स्थानिक बलोच लोकांना मिळत नाही. बलुचिस्तान श्रीमंत आहे पण बलोची गरीब. शिक्षणाचं प्रमाणदेखील येथे कमी आहे. बहुचर्चित ग्वादर बंदर याच प्रांतात आहे.

सरंजामी मानसिकतेने वेढलेल्या पाकिस्तानातील महिला संघटनांसमोर आॅनर किलिंगचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच भयावह रूप घेताना दिसतो आहे. आधीच विविध समस्यांनी वेढलेल्या आपल्या शेजारी देशासाठी हे वर्तमान अणखीच भयंकर म्हणायचे!