शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
4
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
5
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
6
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
7
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
8
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
9
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
10
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
11
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
12
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
13
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
14
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
15
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
16
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
17
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
18
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
19
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
20
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?

खान्देशचे वीर चंदू आणि निशा

By admin | Updated: January 27, 2017 23:43 IST

खान्देशासाठी हा पंधरवडा आनंददायी घटनांनी भरलेला होता. चार महिन्यांपासून पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या चंदू चव्हाण या जवानाची सुटका झाली आणि...

खान्देशासाठी हा पंधरवडा आनंददायी घटनांनी भरलेला होता. चार महिन्यांपासून पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या चंदू चव्हाण या जवानाची सुटका झाली आणि भडगावच्या निशा पाटीलला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. चंदू चव्हाण आणि निशा पाटील हे शूरवीर खान्देशातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनले आहे. जल्लोष, आनंदोत्सवासोबत समाजमाध्यमांवर दोघांच्या कर्तृत्वाच्या गाथा गायल्या जात आहेत. चंदू चव्हाण हा जळगाव जिल्ह्यातील सामनेर येथील मूळ रहिवासी. आईवडिलांचे निधन झाल्याने आजी-आजोबांनी चंदू आणि त्याच्या भावंडांना आजोळी म्हणजे धुळे जिल्ह्यातील बोरविहिर येथे नेले. चंदूचा मोठा भाऊ भूषण सैन्यात गेला. त्यापाठोपाठ चंदू हादेखील राष्ट्रीय रायफल्सच्या ३७ व्या बटालियनमध्ये सहभागी झाला. सप्टेंबर २०१६ मध्ये लष्कराने पाकव्याप्त काश्मिरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर चंदू चव्हाण अनावधानाने सीमा रेषा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेला. लष्कराने प्रथम ही माहिती जाहीर केली. सर्जिकल स्ट्राईकचा जल्लोष देशभर साजरा होत असताना खान्देशात मात्र चंदूच्या बातमीने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. चंदूच्या कुटुंबियांवर तर आभाळ कोसळले. या घटनेचा धक्का बसून आजीचे निधन झाले. गर्भवती असलेल्या बहिणीला ही बातमी कळू दिली नाही. तिने इंदूरला गोंडस बाळाला जन्म दिला. चव्हाण कुटुंबात लागोपाठ घडणाऱ्या सुख-दु:खाच्या या घटनांनी सारेच चक्रावले. चंदू आल्याशिवाय आजीचे अस्थिविसर्जन करायचे नाही, हा कुटुंबियांनी निर्णय घेतला. दसरा-दिवाळीही अंधारात गेली. परंतु सर्व जातीधर्माची मंडळी धीरोदात्तपणे चव्हाण कुटुंबियांसोबत राहिली. सह्याची मोहिम, निवेदने याद्वारे केंद्र सरकारकडे गाऱ्हाणे मांडत राहिले.धुळ्याचे खासदार डॉ.सुभाष भामरे यांच्याकडे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्रिपद असल्याने चव्हाण कुटुंबिय आणि खान्देशी जनतेच्या आशा कायम होत्या. त्यांनी संरक्षण व परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने पाकिस्तानशी संपर्क व संवाद कायम ठेवला. चंदू चव्हाण पाकिस्तानात नसल्याचा दावा करणाऱ्या तेथील सरकारने १३ आॅक्टोबर रोजी चंदू ताब्यात असल्याचे मान्य केले. हा मोठा दिलासा होता. सर्जिकल स्ट्राईकमुळे खवळलेल्या पाकिस्तानला हस्तांतरण नियम आणि जिनिव्हा कराराची आठवण अधूनमधून करुन देण्यात येत होती. या सततच्या पाठपुराव्याला यश मिळत होते. १५ दिवसांपूर्वी डॉ.भामरे यांनी चंदू चव्हाणची लवकरच सुटका होईल, अशी ग्वाही दिली आणि तसेच घडले. चंदूची सुटका झाली. मात्र पाकिस्तानने सुटका करतानाही खोडसाळपणा केला. वरिष्ठांकडून वाईट वागणूक मिळत असल्याने तो पाकिस्तानला शरण आला, त्याला परत जाण्यासाठी मन वळविले, हा पाकिस्तानचा कांगावा हास्यास्पद आहे. अलिकडे लष्कराच्या दोन जवानांनी अन्यायाला समाजमाध्यमाद्वारे वाट करुन दिली असताना चंदूसारखा जवान सीमा ओलांडून जीव धोक्यात घालेल हे अशक्य वाटते. पाकिस्तानला नियमाचे बंधन होतेच, परंतु नियम पाळत असताना आगळीक करण्याचा मूळ स्वभाव सोडला नाही, हे पुन्हा दिसून आले. लष्कराकडून चौकशीची औपचारिकता पूर्ण करुन चंदू लवकर बोरविहीरला परत येईल, अशी आस कुटुंबियांना लागली आहे. किमान आजीच्या अस्थिविसर्जनासाठी एक दिवस पाठवा, असे आर्जव कुटुंबियांनी डॉ.सुभाष भामरे यांच्याकडे केले आहे. भडगावच्या निशा पाटीलचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते बालशौर्य पुरस्कार देऊन झालेला गौरव हा खान्देशवासीयांना आपलाच गौरव झाल्यासारखा वाटला. गेल्यावर्षी मुक्ताईनगरच्या निलेश भिल या मुलाने असेच शौर्य गाजवत पुरस्कार मिळविला होता. त्यापाठोपाठ निशाचा गौरव झाला. त्याने बुडणाऱ्या बालकाला वाचविले होते. तर निशाने े पेटत्या घरातून एका चिमुकलीचा जीव वाचविला होता. चंदू चव्हाण, निलेश भिल, निशा पाटील अशा शूरवीरांच्या गाथा खान्देशची मान उंचावणाऱ्या आहेत. युवापिढीसाठी मागदर्शक अशाच आहेत. - मिलिंद कुलकर्णी