शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

भारतीय रुपयाचे मूल्य का कमी होते?; जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 02:48 IST

गेल्या काही दिवसांपासून भारतीय रुपयाची आंतरराष्ट्रीय किंमत सतत कमी होत आहे आणि गेल्या सहा दिवसांत डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत तब्बल २.५० रुपयांनी घसरली आहे.

- सोपान पांढरीपांडे(वाणिज्य संपादक, लोकमत)गेल्या काही दिवसांपासून भारतीय रुपयाची आंतरराष्ट्रीय किंमत सतत कमी होत आहे आणि गेल्या सहा दिवसांत डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत तब्बल २.५० रुपयांनी घसरली आहे. बुधवारी शेअर बाजार बंद झाला तेव्हा रुपयाची किंमत एक डॉलरला रु. ७१.७२ होती. ही आजवरची सर्वात कमी किंमत आहे.किंमत कमी का होते आहे?रुपयाच्या या घसरगुंडीला प्रामुख्याने अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार युद्ध व त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत आलेली अस्थिरता, सोन्याचे कमी होत जाणारे भाव, कच्च्या तेलाचे वाढणारे भाव ही आंतरराष्ट्रीय कारणे आहेत. याचबरोबर देशातील अर्थव्यवस्थेतील मंदी, विदेशी गुंतवणूकदारांनी भारतातून गुंतवणूक काढून घेणे, भारताच्या विदेश व्यापारातील वाढती तूट व महागाई ही आंतरदेशीय कारणे आहेत.व्यापार युद्ध : अमेरिकेने चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचे धोरण स्वीकारल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता आली आहे. सोन्याचे भाव सतत घसरत आहेत. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात सोने १३६२ डॉलर्स प्रति औंस (२८.३४ ग्रॅम) होते, ते आज ११९५ डॉलर्सवर आले आहेत. सोन्यातील गुंतवणूक त्यामुळे डॉलर विनिमय व्यापारात वळली आहे. परिणामी इतर चलनांच्या किमती कमी होत आहेत. त्यात रुपयाही आहे.कच्च्या तेलाच्या किमतीकच्च्या तेलाचे भाव आॅर्गनायझेशन आॅफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज (ओपेक) ठरवत असते. गेल्या वर्षी कच्चे तेल ६४ ते ६५ डॉलर्स प्रति बॅरल होते, ते बुधवारी ७८ डॉलर्सवर गेले आहे. भविष्यात ते १०० डॉलर्सवर जाण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या दरवाढीमुळे पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे भारतात महागाईचा दर गेल्या एक वर्षात ४.१ टक्क्यांवरून ५.६ टक्क्यांवर गेला आह़ेविदेश व्यापारातील तूटदेशाच्या चलनाची आंतरराष्ट्रीय किंमत ठरविण्यामध्ये त्या देशाच्या विदेश व्यापारातील तूट वा आधिक्य महत्त्वाचे असते. २०१७-१८ या वर्षात भारताची एकूण निर्यात ९.८० टक्क्यांनी वाढून ३०२.८४ अब्ज डॉलर्स होती तर आयात चक्क २० टक्क्यांनी वाढून ४५९.६७ अब्ज डॉलर्स झाली. त्यामुळे विदेश व्यापारातील तूट १५६.८३ अब्ज डॉलर्सवर गेली. भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न साधारणत: २.२५ खर्व (ट्रिलियन) डॉलर्स आहे. त्याच्या २.९० टक्के ही तूट आहे. रुपयांमध्ये बोलायचे झाले तर ही तूट तब्बल सहा लाख कोटींच्या घरात आहे.विदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढलीविदेशी गुंतवणूकदार (फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स-एफपीआय) शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. या गुंतवणूकदारांनी एप्रिल ते जून २०१८ या तिमाहीत साधारणत: ६१००० कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली. मात्र अमेरिकन गुंतवणूकदार व अर्थतज्ज्ञ निक पोल्सन्स यांनी मुंबई शेअर बाजार (३८०१८.३१) व एनएसई निफ्टी (११४७६.९५) अशा सुदृढ स्थितीत असल्याने भारताने फारशी काळजी करण्याची गरज नसल्याचे भाकित केले आहे. ते खरे ठरते काय की रुपया आणखी गडगडतो ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाbusinessव्यवसाय