शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

भारतीय रुपयाचे मूल्य का कमी होते?; जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 02:48 IST

गेल्या काही दिवसांपासून भारतीय रुपयाची आंतरराष्ट्रीय किंमत सतत कमी होत आहे आणि गेल्या सहा दिवसांत डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत तब्बल २.५० रुपयांनी घसरली आहे.

- सोपान पांढरीपांडे(वाणिज्य संपादक, लोकमत)गेल्या काही दिवसांपासून भारतीय रुपयाची आंतरराष्ट्रीय किंमत सतत कमी होत आहे आणि गेल्या सहा दिवसांत डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत तब्बल २.५० रुपयांनी घसरली आहे. बुधवारी शेअर बाजार बंद झाला तेव्हा रुपयाची किंमत एक डॉलरला रु. ७१.७२ होती. ही आजवरची सर्वात कमी किंमत आहे.किंमत कमी का होते आहे?रुपयाच्या या घसरगुंडीला प्रामुख्याने अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार युद्ध व त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत आलेली अस्थिरता, सोन्याचे कमी होत जाणारे भाव, कच्च्या तेलाचे वाढणारे भाव ही आंतरराष्ट्रीय कारणे आहेत. याचबरोबर देशातील अर्थव्यवस्थेतील मंदी, विदेशी गुंतवणूकदारांनी भारतातून गुंतवणूक काढून घेणे, भारताच्या विदेश व्यापारातील वाढती तूट व महागाई ही आंतरदेशीय कारणे आहेत.व्यापार युद्ध : अमेरिकेने चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचे धोरण स्वीकारल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता आली आहे. सोन्याचे भाव सतत घसरत आहेत. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात सोने १३६२ डॉलर्स प्रति औंस (२८.३४ ग्रॅम) होते, ते आज ११९५ डॉलर्सवर आले आहेत. सोन्यातील गुंतवणूक त्यामुळे डॉलर विनिमय व्यापारात वळली आहे. परिणामी इतर चलनांच्या किमती कमी होत आहेत. त्यात रुपयाही आहे.कच्च्या तेलाच्या किमतीकच्च्या तेलाचे भाव आॅर्गनायझेशन आॅफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज (ओपेक) ठरवत असते. गेल्या वर्षी कच्चे तेल ६४ ते ६५ डॉलर्स प्रति बॅरल होते, ते बुधवारी ७८ डॉलर्सवर गेले आहे. भविष्यात ते १०० डॉलर्सवर जाण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या दरवाढीमुळे पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे भारतात महागाईचा दर गेल्या एक वर्षात ४.१ टक्क्यांवरून ५.६ टक्क्यांवर गेला आह़ेविदेश व्यापारातील तूटदेशाच्या चलनाची आंतरराष्ट्रीय किंमत ठरविण्यामध्ये त्या देशाच्या विदेश व्यापारातील तूट वा आधिक्य महत्त्वाचे असते. २०१७-१८ या वर्षात भारताची एकूण निर्यात ९.८० टक्क्यांनी वाढून ३०२.८४ अब्ज डॉलर्स होती तर आयात चक्क २० टक्क्यांनी वाढून ४५९.६७ अब्ज डॉलर्स झाली. त्यामुळे विदेश व्यापारातील तूट १५६.८३ अब्ज डॉलर्सवर गेली. भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न साधारणत: २.२५ खर्व (ट्रिलियन) डॉलर्स आहे. त्याच्या २.९० टक्के ही तूट आहे. रुपयांमध्ये बोलायचे झाले तर ही तूट तब्बल सहा लाख कोटींच्या घरात आहे.विदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढलीविदेशी गुंतवणूकदार (फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स-एफपीआय) शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. या गुंतवणूकदारांनी एप्रिल ते जून २०१८ या तिमाहीत साधारणत: ६१००० कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली. मात्र अमेरिकन गुंतवणूकदार व अर्थतज्ज्ञ निक पोल्सन्स यांनी मुंबई शेअर बाजार (३८०१८.३१) व एनएसई निफ्टी (११४७६.९५) अशा सुदृढ स्थितीत असल्याने भारताने फारशी काळजी करण्याची गरज नसल्याचे भाकित केले आहे. ते खरे ठरते काय की रुपया आणखी गडगडतो ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाbusinessव्यवसाय