शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

भारतीय रुपयाचे मूल्य का कमी होते?; जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 02:48 IST

गेल्या काही दिवसांपासून भारतीय रुपयाची आंतरराष्ट्रीय किंमत सतत कमी होत आहे आणि गेल्या सहा दिवसांत डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत तब्बल २.५० रुपयांनी घसरली आहे.

- सोपान पांढरीपांडे(वाणिज्य संपादक, लोकमत)गेल्या काही दिवसांपासून भारतीय रुपयाची आंतरराष्ट्रीय किंमत सतत कमी होत आहे आणि गेल्या सहा दिवसांत डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत तब्बल २.५० रुपयांनी घसरली आहे. बुधवारी शेअर बाजार बंद झाला तेव्हा रुपयाची किंमत एक डॉलरला रु. ७१.७२ होती. ही आजवरची सर्वात कमी किंमत आहे.किंमत कमी का होते आहे?रुपयाच्या या घसरगुंडीला प्रामुख्याने अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार युद्ध व त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत आलेली अस्थिरता, सोन्याचे कमी होत जाणारे भाव, कच्च्या तेलाचे वाढणारे भाव ही आंतरराष्ट्रीय कारणे आहेत. याचबरोबर देशातील अर्थव्यवस्थेतील मंदी, विदेशी गुंतवणूकदारांनी भारतातून गुंतवणूक काढून घेणे, भारताच्या विदेश व्यापारातील वाढती तूट व महागाई ही आंतरदेशीय कारणे आहेत.व्यापार युद्ध : अमेरिकेने चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचे धोरण स्वीकारल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता आली आहे. सोन्याचे भाव सतत घसरत आहेत. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात सोने १३६२ डॉलर्स प्रति औंस (२८.३४ ग्रॅम) होते, ते आज ११९५ डॉलर्सवर आले आहेत. सोन्यातील गुंतवणूक त्यामुळे डॉलर विनिमय व्यापारात वळली आहे. परिणामी इतर चलनांच्या किमती कमी होत आहेत. त्यात रुपयाही आहे.कच्च्या तेलाच्या किमतीकच्च्या तेलाचे भाव आॅर्गनायझेशन आॅफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज (ओपेक) ठरवत असते. गेल्या वर्षी कच्चे तेल ६४ ते ६५ डॉलर्स प्रति बॅरल होते, ते बुधवारी ७८ डॉलर्सवर गेले आहे. भविष्यात ते १०० डॉलर्सवर जाण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या दरवाढीमुळे पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे भारतात महागाईचा दर गेल्या एक वर्षात ४.१ टक्क्यांवरून ५.६ टक्क्यांवर गेला आह़ेविदेश व्यापारातील तूटदेशाच्या चलनाची आंतरराष्ट्रीय किंमत ठरविण्यामध्ये त्या देशाच्या विदेश व्यापारातील तूट वा आधिक्य महत्त्वाचे असते. २०१७-१८ या वर्षात भारताची एकूण निर्यात ९.८० टक्क्यांनी वाढून ३०२.८४ अब्ज डॉलर्स होती तर आयात चक्क २० टक्क्यांनी वाढून ४५९.६७ अब्ज डॉलर्स झाली. त्यामुळे विदेश व्यापारातील तूट १५६.८३ अब्ज डॉलर्सवर गेली. भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न साधारणत: २.२५ खर्व (ट्रिलियन) डॉलर्स आहे. त्याच्या २.९० टक्के ही तूट आहे. रुपयांमध्ये बोलायचे झाले तर ही तूट तब्बल सहा लाख कोटींच्या घरात आहे.विदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढलीविदेशी गुंतवणूकदार (फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स-एफपीआय) शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. या गुंतवणूकदारांनी एप्रिल ते जून २०१८ या तिमाहीत साधारणत: ६१००० कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली. मात्र अमेरिकन गुंतवणूकदार व अर्थतज्ज्ञ निक पोल्सन्स यांनी मुंबई शेअर बाजार (३८०१८.३१) व एनएसई निफ्टी (११४७६.९५) अशा सुदृढ स्थितीत असल्याने भारताने फारशी काळजी करण्याची गरज नसल्याचे भाकित केले आहे. ते खरे ठरते काय की रुपया आणखी गडगडतो ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाbusinessव्यवसाय