शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
5
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
6
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
7
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
8
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
9
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
10
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
11
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
12
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
13
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
14
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
15
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
16
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
18
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
19
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
20
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका

मोलाचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2017 02:29 IST

तिहेरी तलाक, निकाह हलाला आणि बहुपत्नीत्व या मुस्लिमांमध्ये रूढ असलेल्या प्रथांची घटनात्मक वैधता पडताळण्याचे कार्य सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठातर्फे केले

तिहेरी तलाक, निकाह हलाला आणि बहुपत्नीत्व या मुस्लिमांमध्ये रूढ असलेल्या प्रथांची घटनात्मक वैधता पडताळण्याचे कार्य सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठातर्फे केले जात आहे. या अनुषंगाने मुस्लीम समाजातील या प्रथांवर सखोल चर्चा सुरू असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित या वादावर आतातरी कायमस्वरूपी तोडगा निघेल, अशी आशा व्यक्त होत आहे. या परंपरांबद्दल भिन्नभिन्न मतप्रवाह समोर येत असतानाच उपराष्ट्रपती डॉ. हमिद अन्सारी यांच्या पत्नी सलमा अन्सारी यांनी केलेले वक्तव्य मुस्लीम महिलांना विचार करण्यास बाध्य करणारे आणि अत्यंत मौलिक आहे. पती तीन वेळा तलाक उच्चारून पत्नीला सोडचिठ्ठी देऊ शकत नाही. अशा तलाकला कुराणात कुठेही आधार नाही. तेव्हा मुस्लीम महिलांनी मौलानांच्या सांगण्यावर आंधळेपणाने विश्वास न ठेवता स्वत: कुराण वाचून तलाकचे वास्तवित तत्त्व समजून घ्यावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे. मूळ अरबी भाषेतील कुराण वाचा आणि आत्मचिंतन करा. म्हणजे कुणीही तुमची दिशाभूल करू शकणार नाही, असेही त्यांनी सांगितले आहे. त्याचे कारण असे की, अशा रूढी परंपरांचा पगडा एवढा घट्ट असतो की केवळ न्यायालयाच्या निकालाने तो सैल होत नाही. त्यासाठी मुळात गरज असते ती मानसिकता बदलण्याची. महिलांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणाऱ्या, त्यांच्या आत्मसन्माला ठेच पोहोचविणाऱ्या अशा अनेक रूढी परंपरा केवळ मुस्लीमच नव्हे तर अन्य धर्मातही अस्तित्वात आहेत. धार्मिक ग्रंथांमधील वचनांचा अर्थ लावणे ही गेली कित्येक शतके पुरुषांचीच मक्तेदारी राहिली आहे. पुरुषाला केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या सोयीनुसार त्याचे अन्वयार्थ काढले गेले. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. धर्ममार्तंड सांगतील ते स्वीकारण्याचा काळ केव्हाच मागे पडला आहे. सामाजिक परिवर्तन आणि न्यायासाठी झालेल्या अनेक ऐतिहासिक चळवळींमध्ये मुस्लीम स्त्रियांनी सक्रिय सहभाग आणि वेळप्रसंगी पुढाकार घेतल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. मौखिक तलाक घटनाबाह्य आणि मुस्लीम महिलांवर अन्याय करणारी क्रुर प्रथा असल्याचा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने यापूर्वीच दिला आहे. लवकरच सर्वोच्च न्यायालयाचाही निकाल येईल. पण खरी गरज आहे ती मुस्लीम महिलांमध्ये अधिक जागरूकता निर्माण होण्याची.