शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक राजकारणात विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:35 IST

राजकारण ही एक कला आहे आणि ती तीन पायांवर उभी आहे. प्रशासनाचे विज्ञान, प्रशासकीय धोरणांना प्रभावित करणारे विज्ञान आणि प्रशासनावर नियंत्रण ठेवणारे विज्ञान.

- डॉ. एस.एस. मंठाराजकारण ही एक कला आहे आणि ती तीन पायांवर उभी आहे. प्रशासनाचे विज्ञान, प्रशासकीय धोरणांना प्रभावित करणारे विज्ञान आणि प्रशासनावर नियंत्रण ठेवणारे विज्ञान. जुन्या काळात राजकारण हे धनशक्ती आणि दंडशक्तीत गुंफले होते. पण आता ती परिस्थिती राहिली नाही. विज्ञानाने आपले जीवन इतके प्रभावित केले आहे की, कोणतेही काम जुन्या पद्धतीने होत नाही. पूर्वीच्या संयुक्त कुटुंबाची जागा स्मार्ट फोनने घेतली आहे. पूर्वीचे राजकारण हे घटनांवर आधारलेले होते. आज घटनांची जागा वरवरच्या विषयांनी घेतली आहे. त्यात होणारा विज्ञानाचा वापर हा अभ्यासाचा विषय होऊ शकतो.निवडणूक प्रचाराचेच उदाहरण घेऊ. कोणत्या संदर्भात प्रचार करायचा हे अगोदर ठरवावे लागते. तसेच निवडणूक जिंकण्यासाठी अंतिम उद्दिष्ट निश्चित करावे लागते. त्यानंतर राजकीय सल्लागारांची निवड करून तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा हे ठरविले जाते. २०० किंवा २००० वर्षांपूर्वीची राजकारणी व्यक्ती आजच्या युगात अवतरली तर आजही सामाजिक अशांतता हीच महत्त्वाची ठरते हे त्याला दिसून येईल. प्रत्येकालाच सत्तेवर यायचे असते आणि कुणी ना कुणी एकूण परिस्थितीविषयी नाराज असतो. राजकारणी लोक खासगी तसेच सरकारी प्रसार यंत्रणेचा वापर करून सत्ता मिळवायचा आणि मिळालेली सत्ता राखायचा प्रयत्न करीत असतो. त्याला विरोध करणारे वेळ पडते तेव्हा त्याच साधनांचा उपयोग करीत असतात. १५०० साली युरोपात जेव्हा क्रांती होत होती तेव्हा लोकांना माहिती देण्याचे काम छापखाने करीत होते. आज तेच काम टिष्ट्वटर, फेसबुक आणि ब्लॉगच्या माध्यमातून होत आहे.ई-मेलच्या माध्यमातून जगात कुठेही पटकन संपर्क साधणे सोपे झाले आहे. त्यामुळे जनता आणि नेते हे परस्परांच्या अधिक जवळ आले आहेत. हल्लीच्या राजकारणाचे एकूण सार या प्रकारचे आहे. पण आधुनिक राजकारणात जर विज्ञान- तंत्रज्ञानाचा वापर होत असेल तर तो गणिती पद्धतीने का केला जाऊ नये? तसे केले तर राजकीय पक्षांना विजयी होण्याची खात्री मिळू शकेल. निवडणुकीवर प्रभाव पाडू शकणाºया सर्व घटकांची बेरीज हा निवडणुकीत विजय मिळविण्याचा हेतू असतो. त्यासाठी प्रभाव पाडू शकणाºया घटकांना ओळखणे महत्त्वाचे असते. त्यासाठी राजकारणातील विविध घटक कशाप्रकारे काम करीत असतात याची माहिती असणे गरजेचे असते. निवडणूक प्रभावित करू शकणाºया घटकात जनता, मतदारसंघ, राजकारणी, निधी, पक्षाचे धोरण, मतदारसंघाचा हक्कदार आणि त्याला आव्हान देणारा या दोघांचीही माहिती, तंत्रज्ञानाची भूमिका आणि अज्ञात घटकांचा समावेश असतो. पण जेव्हा निवडणुकीस उभी असलेली व्यक्ती प्रभावी असते तेव्हा इतर घटकांची उपयोगिता मागे पडते. अशावेळी तंत्रज्ञानाचा वापरच प्रभावी ठरत असतो.या सर्व गोष्टींचा विचार केला तर राजकारणात करिअर करणारे आवश्यक असतात की राजकारणी तयार करता येतात? पूर्वीच्या काळी मूल्ये महत्त्वाची होती. ते दिवस आता संपले आहेत. उलट अचानक राजकारणात प्रवेश करणारी व्यक्तीच निवडली जाते. यासंदर्भात समांतर आदर्श चित्रपट सृष्टीतून मिळू शकतील. पूर्वी मध्यम वयाच्या अभिनेत्री आणि अभिनेतेही दर्शकांना आकर्षित करायचे. तरुण हिरो हिरॉईन हवेत हाच आजच्या चित्रपटांचा आणि टीव्ही सिरियल्सचा मंत्र आहे. त्यामुळे अभिनयाचे प्रशिक्षण देणाºया अनेक संस्था अस्तित्वात आल्या आहेत. राजकारणातही असा बदल घडून येऊ शकेल का? त्यासाठी उमदे व्यक्तिमत्त्व, लोकांशी संवाद साधण्याची कला, वक्तृत्व कला, तंत्रज्ञानाचा वापर करण्याची क्षमता, चालू घडामोडींचे व इतिहासाचे ज्ञान आणि कौटुंबिक पार्श्वभूमी यांची आवश्यकता राहील.माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आवश्यक ती माहिती आणि आकडेवारी मिळवून मते मिळविण्यासाठी आवश्यक अशी पार्श्वभूमी तयार करता येते. समाजातील कोणत्या घटकांवर लक्ष केंद्रित करायचे हे समजून घेण्याची राजकीय पक्षाला गरज असते. हे काम मूलतत्त्व शोधकांच्या मार्फत करण्यात येते. त्यानंतर प्रचाराची प्रक्रिया निश्चित करण्यात येते. तसेच प्रत्येक मतदारसंघातील मतदारांच्या स्वरूपावर तेथील प्रचाराची दिशा ठरविण्यात येते. निवडणूक प्रचारात ई-मेलचा आणि ब्लॉगचा वापर अत्यावश्यक झाला आहे. प्रचारासाठी राजकीय पक्ष हे सोशल मीडियावर अवलंबून राहू लागले आहेत. निवडणूक प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात साधनांची आवश्यकता असते. राजकीय पक्षांची प्रतिमा तयार करण्याचे काम मीडिया करीत असते. एकूणच निवडणुकीचे स्वरूप हे जास्तीत जास्त प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करीत असते. मोबाईलद्वारा केलेले अ‍ॅनालिसिस हेही महत्त्वाची भूमिका बजावीत असते. यात बदल घडवून आणणे हे प्रचाराने, राजकीय नेत्यामुळेच केवळ शक्य होत असते.तरुण राजकारण्यांना प्रचार मोहिमेचे बाळकडू देण्यासाठी फिल्म इन्स्टिट्यूटसारखी एखादी संस्था असणे आवश्यक झाले आहे. त्यात अभिनय, भावनोत्कटता, नाट्य आणि वक्तृत्वाची शिकवण दिली जावी. त्यात तरुणांना वयाच्या १५ व्या वर्षी प्रवेश देण्यात यावा म्हणजे मतदार होण्याचे १८ वर्षे हे वय पूर्ण होईपर्यंत तो चांगला उमेदवार बनू शकेल. त्यांची कल चाचणी घेण्यात आली तर कचरा बाजूला सारणे शक्य होईल. निवृत्त प्रशासकीय अधिकाºयांकडून त्यांना प्रशासनाचे धडे देण्यात यावेत. त्यानंतर त्याला पक्षाचे तत्त्वज्ञान आणि पक्षाचे धोरण यांचे ज्ञान देण्याचे काम पक्षाला करावे लागेल. अभिनेते हे राजकारणात उतरल्याची आणि राजकारण्यांनी चित्रपटात कामे केल्याची अनेक उदाहरणे आहेत. तेव्हा अभिनय, वक्तृत्व आणि भावनोत्कटता हे राजकारण्यांसाठी महत्त्वाचे आहेत. ज्या राजकीय नेत्यांच्या भाषणांना लोक गर्दी करतात त्यांनी जर प्रवेश फी ठेवली तर त्यांना पक्षासाठी निधी गोळा करता येईल आणि त्यातून सरकारच्या तिजोरीतही भर पडेल. टाईम्स फाऊन्डेशनने प्रशिक्षण घेऊन राजकारणात उतरणाºयांना क्रमवारी दिली तर ती प्राप्त करण्यासाठी राजकीय प्रशिक्षण देणाºया अनेक शाळा निर्माण होतील.सध्या तरी क्रिकेट, चित्रपट आणि राजकारण यांना बरे दिवस आले आहेत. त्यांच्या शाळा सुरू झाल्या तर प्रशिक्षकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्या शाळांना जोडून अनेक सहयोगी संस्था उभ्या होतील. त्यातूनच मॅनेजमेंट स्कूल्सचीही निर्मिती होईल. सरतेशेवटी राजकारण ही सुद्धा एक कला आहे आणि ती कुणालाही साध्य होण्यासारखी आहे. एकूणच राजकारण, नाट्य आणि तंत्रज्ञान यांची सध्या अतूट मैत्री झाली आहे हे मात्र खरे!(माजी चेअरमन, एआयसीटीई एडीजे. प्रोफेसर, एनआयएएस बंगळुरू)