शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

सैन्यदलाचा असा वापर दुर्दैवी..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 03:51 IST

सैन्यदलाशी संबंधित विषय फार संवेदनशीलतेने हाताळावे लागतात. मुंबईतील तीन रेल्वे पूल बांधण्यासाठी सैन्यदलाला बोलावून आम्ही त्यांचा वापर कधी, कसा करायचा यातील गांभीर्य घालवून बसलो आहोत.

सैन्यदलाशी संबंधित विषय फार संवेदनशीलतेने हाताळावे लागतात. मुंबईतील तीन रेल्वे पूल बांधण्यासाठी सैन्यदलाला बोलावून आम्ही त्यांचा वापर कधी, कसा करायचा यातील गांभीर्य घालवून बसलो आहोत. प्रश्न पूल कोणी बांधायचा हा नसून सैन्याचा वापर कुठे आणि कधी करावा हा आहे. हा विषय यामुळे ऐरणीवर आला आहे.मुंबईत एलफिस्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २३ जणांचे बळी गेल्यानंतर तो पूल सैन्यदलाकडून बांधून घेण्याचा निर्णय सरकारने घेतला. अवघ्या तीन महिन्यांत पूल तयार करण्याचे आश्वासन रक्षामंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले. पूल कोण बांधतो याहीपेक्षा जनतेला तीन महिन्यांत तो तयार करून मिळणार आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र या निर्णयामुळे चुकीचा पायंडा पडला आहे.हा पूल धोकादायक बनला आहे, तो तातडीने नवीन बांधला पाहिजे अशी मागणी अनेक वर्षे या पुलावरून जाणारे प्रवासी करत होते. एका प्रवाशाने तर तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना अनेकदा टष्ट्वीटही केल्याचे समोर आले. त्याचदिवशी प्रभू यांनी या पुलाच्या कामाला कितीतरी आधीच मंजुरी दिल्याचे स्पष्ट केले होते. त्यावेळी रेल्वे प्रशासन सुस्त झाल्याचे समोर आले. पुलाच्या दुरुस्तीसाठी तातडीने पावले उचलावीत असे तीन वर्षे अधिकाºयांना वाटले नाही. मात्र ज्या दिवशी २३ जणांचे जीव गेले त्याच दिवशी त्या पुलाची निविदा काढल्याचे सांगितले गेले. हे अक्षम्य दुर्लक्ष करणाºया रेल्वेच्या अधिकाºयावर कोणतीही कठोर कारवाई केली गेली नाही. उलट हा पूल सैन्यदलाकडून बांधून घेताना भाजपाने या विषयाचे राजकारण केले.सप्टेंबर महिन्यात पूल पडला. त्याचे काम जर एक महिन्याने सैन्याकडे देण्याचा निर्णय होत असेल तर त्याच एक महिन्यात अन्य यंत्रणांकडूनही हा पूल बांधता आला असता. पण तसे झाले नाही. रेल्वे दुर्घटनेनंतर बुलेट ट्रेनविषयी जनतेत निर्माण झालेला टोकाचा राग, असंतोष कसा घालवायचा याच्या चिंतनातून मिलिटरी कल्पना पुढे आणली गेली. आम्ही काहीतरी वेगळे करतो आहोत हे दाखविण्याचा अतिउत्साही प्रयत्न यातून झाला आहे.आपल्याकडे ‘मिलिटरीला बोलावले’ असे म्हटले की काहीतरी गंभीर घडले असे बोलले जाते. नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी सैन्यदलाला बोलावण्याची पद्धती आहे. लातूरच्या भूकंपात, गुजरातच्या पुरात सैन्यदल बोलावले गेले. येथे कोणतीही नैसर्गिक आपत्ती नव्हती. तर अधिकाºयांचे अक्षम्य दुर्लक्ष या घटनेला कारण होते. ज्या दिवशी हा पूल पडला होता त्याच्या दुसºयाच दिवशीच सैन्यदलाला बोलावून जर या पुलाचे काम सुरू केले असते तर सरकार या विषयावर खरोखरीच गंभीर आहे असे वाटले असते. पण तसे झाले नाही. महिन्यानंतर विचारपूर्वक केलेली ही राजकीय खेळी आहे.विरोध पूल बांधण्याला नाही, मात्र जर असे मिलिटरीला पूल बांधण्यासाठी बोलावले गेले तर उद्या छोट्या मोठ्या घटनांमध्येही सैन्यदलाला बोलावण्याची मागणी होऊ लागेल. ती नाही पुरवली तर त्यातून राजकीय आरोप प्रत्यारोप होतील. सैन्यदलाकडे कोणते विषय न्यायचे याचे तारतम्यही राखले गेले पाहिजे. आपल्याकडे अनेक अवघड बांधकामे कमी वेळेत करणाºया यंत्रणा असताना एक रेल्वेचा पूल आम्ही बांधू शकत नाही हे मान्य केल्यासारखे आहे. जो संदेश यातून गेला तो जास्त निराशाजनक आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई