शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

अनुपम्य सुखसोहळा

By admin | Updated: June 15, 2017 04:24 IST

पालखी सोहळा उद्यापासून देहू आणि आळंदी येथून प्रस्थान करीत आहे. लाखो वैष्णवांचा मेळा भरणार असून, भक्तीचा मळा फुलणार आहे.

- विजय बाविस्करपालखी सोहळा उद्यापासून देहू आणि आळंदी येथून प्रस्थान करीत आहे. लाखो वैष्णवांचा मेळा भरणार असून, भक्तीचा मळा फुलणार आहे. दरवर्षी पावसाबरोबरच मराठी मनाला वेध लागतात ते वारीचे. ग्यानबा-तुकोबांच्या गजरात चालणाऱ्या या वारीने भागवत धर्माची पताका फडकवत ठेवली आहे. संत ज्ञानेश्वर-तुकारामांसह अनेक संतांनी भागवतधर्माचा प्रचार आणि प्रसार केला. संत नामदेवांनी तर पंजाबपर्यंत जाऊन ही पताका रोवली. वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म आहे. ही वारीपरंपरा आपल्या सर्व संतांनी तब्बल सात शतकांपासून जतन केली आहे. तिची धुरा आता सामान्य वारकऱ्यांनी खांद्यावर घेतली आहे. इतकी वर्षे अखंडपणे चालणारी वारी हा एक चमत्कारच आहे. ही सामाजिक अभिसरणाची श्रेष्ठ प्रक्रिया आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या ओढीने चालणाऱ्या आषाढी एकादशीच्या या वारीत विठ्ठलनामाचा गजर असतो, भक्तिरसाचा अलौकिक बहर असतो. या भावगंगेत संतांनी लिहिलेले अभंग जसे असतात तसे लोकसहभागातून जन्माला आलेली कवने, ओव्याही असतात. वारकरी संप्रदाय, भागवत संप्रदायाच्या भक्तगणांसाठी आषाढीची वारी म्हणजे विठ्ठलभक्तीचा परमोच्च बिंंदू असतो. लाखो वारकरी विठुरायाच्या ओढीने पंढरीकडे धाव घेतात. खांद्यावर भगवी पताका घेऊन टाळ-मृदंगाच्या गजरात वैष्णवांची पाउले पडू लागतात. भागवतधर्माच्या एकात्मतेची पताका खांद्यावर मिरवली जाते. सदाचाराचा संगम होतो. भक्तीची पेठ उभी राहते आणि पंढरीच्या वाळवंटात एकचि टाळी होते. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या अनुभूतीचा, संत तुकोबारायाच्या भक्तिभावाचा, नामदेवरायांच्या आर्ततेचा, एकनाथ, जनाबाई, निळोबा, चोखोबा, सावतामाळी, बहिणाई, कान्होपात्रा, सेना, नरहरी आदी संतांचा आत्मानुभव अभिव्यक्त होतो. वारी हा एक उत्कट अनुभव आहे. वारीत नुसते चालायचे नाही तर नामसाधना आहे, अभ्यास आहे, संवाद आहे, सत्संग आहे. या सगळ्यांची मिळून वारी होते. वारीने समाज एकसंध केला, जगण्याला आत्मबळ दिले. या नव्या सामर्थ्यातून महाराष्ट्र घडला. अठरापगड जातीतील संत भागवतधर्माच्या पताकेखाली एकत्र आले आणि ‘स्व’ला विसरून हरिनामाचा गजर करू लागले. हा वैष्णवांचा मेळा आहे. तो जातीकुलादिकांच्या वृथा अभिमानापलीकडे गेलेला आहे. या साऱ्यांना परमात्म्याची ओढ असते. त्यापुढे त्यांना इतर कसलीही आठवण नसते. परमानंद द्यावा आणि घ्यावा असा त्यांचा शुद्ध भाव असतो. विठ्ठलभक्ती या एकाच श्वासात प्रत्येकजण रंगलेला असतो. संतांनी दिलेले हे विचारबीज वारकऱ्यांच्या मनात रुजलेले आहे. श्रेष्ठता जातीवर नसून प्रामाणिक कर्मभक्तीत आहे, हे संतांनी पटवून दिले. समाजाला डोळस बनविले. कीर्तन-प्रवचनांतून लोकमनात रुजवले. ज्या गावाला जायचे तो परमात्मा आनंदस्वरूप आहे. ज्या वाटेने जायचे आहे त्या वाटेवरही आनंदच पेरलेला आहे. म्हणूनच पंढरीच्या वारीला आनंदसोहळा मानले जाते. त्या वाटेने चालणारा प्रत्येक वारकरी जणू आनंदाची ओवी असतो.‘आनंदाचे डोही आनंद तरंग। आनंदचि अंग आनंदाचे॥ असे म्हणणारे तुकोबाराय याला अनुपम्य सुखसोहळा मानतात तर ज्ञानोबा माउली भक्तिवैराग्य कथनाने वारकऱ्यांना, अष्टांगयोगाच्या निरूपणाने योग्यांना आणि व्यावहारिक दृष्टांताच्या माध्यमातून प्रापंचिकांना अमृततत्त्वाचा स्पर्र्श घडवून जातात. असा हा पालखी सोहळा १६ व १७ जूनला देहू आणि आळंदी येथून प्रस्थान करीत आहे. लाखो वैष्णवांचा मेळा पुन्हा एकदा जमणार आहे. त्यांच्याविषयी तुकोबाराय म्हणतात, गोपीचंदन उटी तुळशीच्यामाळा, हार मिरविती गळा। टाळ मृदुंग घाई पुष्पवर्षाव, अनुपम्य सुखसोहळा रे।।नामाचा गजर करीत जेव्हा वारकरी रस्त्यावरून चालतो तेव्हा प्रसन्नता, सात्त्विकता, भक्तिरसाचा तो मूर्तिमंत आदर्श असतो. वारी आपल्या महाराष्ट्राचं सांस्कृतिक संचित आहे. शतकानुशतके चालत आलेली वारी आजच्या पिढीसाठीही कुतूहलाचा विषय आहे. वारीतून मिळणारी आत्मिक ऊर्जा काय असते हे अनुभवावेसे वाटते. त्यामुळे तरुणाईही उत्स्फूर्तपणे वारीशी जोडली जात आहे. दरवर्षी ‘पाउले चालती पंढरीची वाट’ म्हणत टाळ, मृदुंग, दिंड्या, पताका यांच्या सहवासात वारकरी भक्तिरसानंदात न्हाऊन निघण्यासाठी सज्ज झाला आहे. आपणही होऊयात !