शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

‘युनो’त दादरी

By admin | Updated: October 6, 2015 04:11 IST

गेल्या सोमवारी रात्री राजधानी दिल्लीनजीकच्या दादरी येथे जे काही घडले ते केवळ भयानकच नव्हे तर मानवतेला काळीमा फासणारेही होते. ईखलाक नावाच्या एका मुस्लिम गृहस्थाच्या

गेल्या सोमवारी रात्री राजधानी दिल्लीनजीकच्या दादरी येथे जे काही घडले ते केवळ भयानकच नव्हे तर मानवतेला काळीमा फासणारेही होते. ईखलाक नावाच्या एका मुस्लिम गृहस्थाच्या घरात गोमांस भक्षण केले गेल्याचे एका हिन्दु देवालयाच्या ध्वनिक्षेपकावरुन जाहीर केले जाते आणि भली मोठी झुंड ईखलाकच्या घरावर हल्ला करुन त्याला ठार मारते व त्याच्या मुलाला जबर जखमी करते, ही घटना साधी नाही. गोमांस भक्षणास विरोध करणाऱ्या आणि म्हणूनच कदाचित संघ-भाजपा यांचा आशीर्वाद लाभलेल्या निवडक उन्मादी लोकांचे हे कृत्य असावे, असे गृहीत धरायला सकृतदर्शनी तरी वाव आहे. पण ज्यात सरळसरळ मानवतेच्या विरोधातली भूमिका आणि त्यातून घडलेला गंभीर स्वरुपाचा मनुष्यवधाचा गुन्हा दिसून येतो आहे, तिथे राजकीय पक्ष जी साठमारी करीत आहेत, ती केवळ उबगवाणी आहे. दादरी गाव उत्तर प्रदेश राज्यात मोडत असल्याने घडल्या प्रकाराची दखल घेणे मुख्यमंत्री या नात्याने अखिलेश यादव यांचे कर्तव्यच होते. ते कर्तव्य बजावण्यासाठी त्यांनी जी पावले उचलली आहेत, त्यांना भाजपाविरोधी राजकारण म्हणून यादव यांच्यावर टीका करणे हा भाजपाचा कांगावखोरपणा झाला. देशाचे गृहमंत्री राजनाथसिंह यांनीही, घडला तो प्रकार दुर्दैवी होता परंतु त्याचे राजकियीकरण होता कामा नये, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ईखलाकच्या घरातील शिजवलेले मास प्रयोगशाळेत पाठविण्याच्या अखिलेश यांच्या निर्णयावर भाजपाने जे आकांडतांडव सुरु केले आहे ते करण्याचे खरे तर काही कारण नाही. तथापि असा अगोचरपणा करण्यातही पुन्हा भाजपाची मक्तेदारी नाही. उत्तर प्रदेशचे एक बोलभांड मंत्री आझम खान यांनी दादरी प्रकरण थेट युनोत उपस्थित करण्याच्या दृष्टीने पत्रव्यवहार सुरु केला असून त्यांनी स्वत:च तसे जाहीर केले आहे. त्याशिवाय त्यांनी पंतप्रधानांना उद्देशून एक अत्यंत उपरोधिक पत्रदेखील लिहिले आहे. पंतप्रधानांनी संपूर्ण देशभर गोमांस बंदी लागू करावी. पंचतारांकित हॉटेल्समधील जेवणाच्या मेन्यूमधून गोमांस हद्दपार करण्याचे आदेश जारी करावेत यासारख्या सूचना त्यांनी केल्या आहेत. एकीकडे राजकीय पक्ष दादरी प्रकरण आणि मांसभक्षण या संदर्भात आपापल्या परीने राजकारण करीत असताना सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी विद्यार्थ्याच्या पुढ्यात बोलताना गोमांसभक्षणाचे समर्थन केले आणि त्यापायी संबंधित विद्यार्थी चवताळून उठले. कोणी काय खावे आणि काय खाऊ नये हा एरवी सामान्य विषय जर देशाची राजनीती ढवळून काढण्यास निमित्त ठरत असेल आणि युनोसारख्या संघटनेला त्यात ओढले जात असेल तर मोठे अवघडच आहे.