शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

‘युनो’त दादरी

By admin | Updated: October 6, 2015 04:11 IST

गेल्या सोमवारी रात्री राजधानी दिल्लीनजीकच्या दादरी येथे जे काही घडले ते केवळ भयानकच नव्हे तर मानवतेला काळीमा फासणारेही होते. ईखलाक नावाच्या एका मुस्लिम गृहस्थाच्या

गेल्या सोमवारी रात्री राजधानी दिल्लीनजीकच्या दादरी येथे जे काही घडले ते केवळ भयानकच नव्हे तर मानवतेला काळीमा फासणारेही होते. ईखलाक नावाच्या एका मुस्लिम गृहस्थाच्या घरात गोमांस भक्षण केले गेल्याचे एका हिन्दु देवालयाच्या ध्वनिक्षेपकावरुन जाहीर केले जाते आणि भली मोठी झुंड ईखलाकच्या घरावर हल्ला करुन त्याला ठार मारते व त्याच्या मुलाला जबर जखमी करते, ही घटना साधी नाही. गोमांस भक्षणास विरोध करणाऱ्या आणि म्हणूनच कदाचित संघ-भाजपा यांचा आशीर्वाद लाभलेल्या निवडक उन्मादी लोकांचे हे कृत्य असावे, असे गृहीत धरायला सकृतदर्शनी तरी वाव आहे. पण ज्यात सरळसरळ मानवतेच्या विरोधातली भूमिका आणि त्यातून घडलेला गंभीर स्वरुपाचा मनुष्यवधाचा गुन्हा दिसून येतो आहे, तिथे राजकीय पक्ष जी साठमारी करीत आहेत, ती केवळ उबगवाणी आहे. दादरी गाव उत्तर प्रदेश राज्यात मोडत असल्याने घडल्या प्रकाराची दखल घेणे मुख्यमंत्री या नात्याने अखिलेश यादव यांचे कर्तव्यच होते. ते कर्तव्य बजावण्यासाठी त्यांनी जी पावले उचलली आहेत, त्यांना भाजपाविरोधी राजकारण म्हणून यादव यांच्यावर टीका करणे हा भाजपाचा कांगावखोरपणा झाला. देशाचे गृहमंत्री राजनाथसिंह यांनीही, घडला तो प्रकार दुर्दैवी होता परंतु त्याचे राजकियीकरण होता कामा नये, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ईखलाकच्या घरातील शिजवलेले मास प्रयोगशाळेत पाठविण्याच्या अखिलेश यांच्या निर्णयावर भाजपाने जे आकांडतांडव सुरु केले आहे ते करण्याचे खरे तर काही कारण नाही. तथापि असा अगोचरपणा करण्यातही पुन्हा भाजपाची मक्तेदारी नाही. उत्तर प्रदेशचे एक बोलभांड मंत्री आझम खान यांनी दादरी प्रकरण थेट युनोत उपस्थित करण्याच्या दृष्टीने पत्रव्यवहार सुरु केला असून त्यांनी स्वत:च तसे जाहीर केले आहे. त्याशिवाय त्यांनी पंतप्रधानांना उद्देशून एक अत्यंत उपरोधिक पत्रदेखील लिहिले आहे. पंतप्रधानांनी संपूर्ण देशभर गोमांस बंदी लागू करावी. पंचतारांकित हॉटेल्समधील जेवणाच्या मेन्यूमधून गोमांस हद्दपार करण्याचे आदेश जारी करावेत यासारख्या सूचना त्यांनी केल्या आहेत. एकीकडे राजकीय पक्ष दादरी प्रकरण आणि मांसभक्षण या संदर्भात आपापल्या परीने राजकारण करीत असताना सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी विद्यार्थ्याच्या पुढ्यात बोलताना गोमांसभक्षणाचे समर्थन केले आणि त्यापायी संबंधित विद्यार्थी चवताळून उठले. कोणी काय खावे आणि काय खाऊ नये हा एरवी सामान्य विषय जर देशाची राजनीती ढवळून काढण्यास निमित्त ठरत असेल आणि युनोसारख्या संघटनेला त्यात ओढले जात असेल तर मोठे अवघडच आहे.