शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी काश्मीरमधील विविध गटांशी चर्चा करण्यास तयार, संवादातून शांततेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 23:59 IST

काश्मीरमधील फुटीरवादी तसेच अतिरेकी गटांना बळाच्या जोरावर मोडून काढण्याची भूमिका बदलून तिथे संवादाची प्रक्रिया सुरू करण्याचा जो निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, त्याचे स्वागतच करायला हवे.

काश्मीरमधील फुटीरवादी तसेच अतिरेकी गटांना बळाच्या जोरावर मोडून काढण्याची भूमिका बदलून तिथे संवादाची प्रक्रिया सुरू करण्याचा जो निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, त्याचे स्वागतच करायला हवे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ आॅगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात काश्मीर प्रश्न ‘ना गोली से, ना गाली से, गले मिलने से’ सोडवण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात मात्र केंद्राकडून अशा गळाभेटीची तयारी दिसत नव्हती. केंद्र सरकारमध्येच हा प्रश्न कसा सोडवावा, याबाबत एकमत होत नव्हते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी एकवेळ आम्ही पाकिस्तानशी बोलू, पण हुर्रियत कॉन्फरन्सच्या नेत्यांशी चर्चा करणार नाही, अशी टोकाची भूमिका घेतली होती. त्यानंतर हुर्रियतच्या नेत्यांची चौकशी, त्यांना अटक व नजरकैदेत ठेवणे सुरू झाले. त्यामुळे काश्मिरी जनतेशी चर्चा करायला केंद्र सरकार खरोखर तयार आहे की नाही, याविषयी संभ्रम होता. अखेर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी काश्मीरमधील विविध गटांशी चर्चा करण्यासाठी दिनेश्वर शर्मा यांची नियुक्ती करीत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे गेली अनेक वर्षे अशांत असलेल्या या राज्यात संवादातून प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न सुरू होतील. म्हणूनच काँग्रेसपासून नॅशनल कॉन्फरन्सपर्यंत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या तीन वर्षांत काश्मिरींशी संवाद तुटल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. ते भरून काढण्यासाठी बरेच काही करावे लागेल. मधल्या काळात तिथे दहशतवादी कारवाया वाढल्या, त्यांना स्थानिकांची मदत वाढत गेली, सुरक्षा दलांवर दगडफेकीच्या घटनांत वाढ झाली. कधी नव्हे ते महिलाही रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करू लागल्या. जमावाला पांगवताना पेलेट गनचा वापर केल्याने शेकडो लोक जखमी झाले, काहींना अंधत्व आले आणि काही मरण पावले. त्यातून केंद्र सरकार लष्कराच्या जोरावर आपल्याला दाबू पाहत आहे, अशी भावना काश्मीरमध्ये निर्माण झाली. सारेच काश्मिरी हे दहशतवादी आहेत वा त्यांचे समर्थक आहेत, असे चित्र निर्माण झाले. सामान्य काश्मिरी लोकांत एकटे पडल्याची भावना निर्माण झाली. तसे होणे धोकादायकच होते. शिक्षण, रोजगाराचे प्रश्न सोडवण्याऐवजी सरकारी यंत्रणेकडून केवळ दंडुका आणि बंदुका यांचाच वापर होतो, असे वाटून अधिकाधिक तरुण तिथे अतिरेक्यांना मदत करू लागले होते. संवाद वा चर्चेमुळे हे प्रकार लगेच बंद होतील, असे नव्हे. पण केंद्र सरकार आपल्याशी चर्चा करायला तरी तयार आहे, असे लक्षात आल्याने वातावरण सामान्य व्हायला मदत होईल. डॉ. मनमोहन सिंग सरकारने पत्रकार दिलीप पाडगावकर यांच्यासह तिघांना चर्चेसाठी नेमले होते. त्याआधी वाजपेयी सरकारने एन. एन. व्होरा यांची नेमणूक केली होती. ते सध्या काश्मीरचे राज्यपाल आहेत. त्याचे चांगले परिणाम होत होते. आता दिनेश्वर शर्मा यांनी हुर्रियतशी चर्चा करायला आपण तयार आहोत, हुर्रियतचे नेतेही भारतीय आहेत, अशी सर्वसमावेशक भूमिका घेतली आहे. त्यामुळे संवादातून निश्चितच चांगले घडेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. पण संवादप्रक्रिया मध्येच थांबता कामा नये. ती सुरूच राहायला हवी. तरच काश्मिरी जनतेत विश्वासाचे वातावरण तयार होईल. तेथील जनतेचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडवण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. तिथे मेहबुबा मुफ्ती सरकारचा जनतेशी संबंध नाही. केंद्राविषयीही काहीसा आकस आहे. दोन्ही सरकारांविषयीचे हे वातावरण दूर करून प्रश्न सोडवण्यासाठी खरोखर प्रयत्न होत आहेत, हे जनतेत बिंबवण्याचे मोठे आव्हान दिनेश्वर शर्मा यांच्यापुढे आहे. मात्र त्यासाठी बंदुका आणि दंडुका यांचा वापर सावधपणे व अपवादानेच व्हायला हवा.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह