शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी काश्मीरमधील विविध गटांशी चर्चा करण्यास तयार, संवादातून शांततेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 23:59 IST

काश्मीरमधील फुटीरवादी तसेच अतिरेकी गटांना बळाच्या जोरावर मोडून काढण्याची भूमिका बदलून तिथे संवादाची प्रक्रिया सुरू करण्याचा जो निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, त्याचे स्वागतच करायला हवे.

काश्मीरमधील फुटीरवादी तसेच अतिरेकी गटांना बळाच्या जोरावर मोडून काढण्याची भूमिका बदलून तिथे संवादाची प्रक्रिया सुरू करण्याचा जो निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, त्याचे स्वागतच करायला हवे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ आॅगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात काश्मीर प्रश्न ‘ना गोली से, ना गाली से, गले मिलने से’ सोडवण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात मात्र केंद्राकडून अशा गळाभेटीची तयारी दिसत नव्हती. केंद्र सरकारमध्येच हा प्रश्न कसा सोडवावा, याबाबत एकमत होत नव्हते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी एकवेळ आम्ही पाकिस्तानशी बोलू, पण हुर्रियत कॉन्फरन्सच्या नेत्यांशी चर्चा करणार नाही, अशी टोकाची भूमिका घेतली होती. त्यानंतर हुर्रियतच्या नेत्यांची चौकशी, त्यांना अटक व नजरकैदेत ठेवणे सुरू झाले. त्यामुळे काश्मिरी जनतेशी चर्चा करायला केंद्र सरकार खरोखर तयार आहे की नाही, याविषयी संभ्रम होता. अखेर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी काश्मीरमधील विविध गटांशी चर्चा करण्यासाठी दिनेश्वर शर्मा यांची नियुक्ती करीत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे गेली अनेक वर्षे अशांत असलेल्या या राज्यात संवादातून प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न सुरू होतील. म्हणूनच काँग्रेसपासून नॅशनल कॉन्फरन्सपर्यंत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या तीन वर्षांत काश्मिरींशी संवाद तुटल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. ते भरून काढण्यासाठी बरेच काही करावे लागेल. मधल्या काळात तिथे दहशतवादी कारवाया वाढल्या, त्यांना स्थानिकांची मदत वाढत गेली, सुरक्षा दलांवर दगडफेकीच्या घटनांत वाढ झाली. कधी नव्हे ते महिलाही रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करू लागल्या. जमावाला पांगवताना पेलेट गनचा वापर केल्याने शेकडो लोक जखमी झाले, काहींना अंधत्व आले आणि काही मरण पावले. त्यातून केंद्र सरकार लष्कराच्या जोरावर आपल्याला दाबू पाहत आहे, अशी भावना काश्मीरमध्ये निर्माण झाली. सारेच काश्मिरी हे दहशतवादी आहेत वा त्यांचे समर्थक आहेत, असे चित्र निर्माण झाले. सामान्य काश्मिरी लोकांत एकटे पडल्याची भावना निर्माण झाली. तसे होणे धोकादायकच होते. शिक्षण, रोजगाराचे प्रश्न सोडवण्याऐवजी सरकारी यंत्रणेकडून केवळ दंडुका आणि बंदुका यांचाच वापर होतो, असे वाटून अधिकाधिक तरुण तिथे अतिरेक्यांना मदत करू लागले होते. संवाद वा चर्चेमुळे हे प्रकार लगेच बंद होतील, असे नव्हे. पण केंद्र सरकार आपल्याशी चर्चा करायला तरी तयार आहे, असे लक्षात आल्याने वातावरण सामान्य व्हायला मदत होईल. डॉ. मनमोहन सिंग सरकारने पत्रकार दिलीप पाडगावकर यांच्यासह तिघांना चर्चेसाठी नेमले होते. त्याआधी वाजपेयी सरकारने एन. एन. व्होरा यांची नेमणूक केली होती. ते सध्या काश्मीरचे राज्यपाल आहेत. त्याचे चांगले परिणाम होत होते. आता दिनेश्वर शर्मा यांनी हुर्रियतशी चर्चा करायला आपण तयार आहोत, हुर्रियतचे नेतेही भारतीय आहेत, अशी सर्वसमावेशक भूमिका घेतली आहे. त्यामुळे संवादातून निश्चितच चांगले घडेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. पण संवादप्रक्रिया मध्येच थांबता कामा नये. ती सुरूच राहायला हवी. तरच काश्मिरी जनतेत विश्वासाचे वातावरण तयार होईल. तेथील जनतेचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडवण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. तिथे मेहबुबा मुफ्ती सरकारचा जनतेशी संबंध नाही. केंद्राविषयीही काहीसा आकस आहे. दोन्ही सरकारांविषयीचे हे वातावरण दूर करून प्रश्न सोडवण्यासाठी खरोखर प्रयत्न होत आहेत, हे जनतेत बिंबवण्याचे मोठे आव्हान दिनेश्वर शर्मा यांच्यापुढे आहे. मात्र त्यासाठी बंदुका आणि दंडुका यांचा वापर सावधपणे व अपवादानेच व्हायला हवा.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह