शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी काश्मीरमधील विविध गटांशी चर्चा करण्यास तयार, संवादातून शांततेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 23:59 IST

काश्मीरमधील फुटीरवादी तसेच अतिरेकी गटांना बळाच्या जोरावर मोडून काढण्याची भूमिका बदलून तिथे संवादाची प्रक्रिया सुरू करण्याचा जो निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, त्याचे स्वागतच करायला हवे.

काश्मीरमधील फुटीरवादी तसेच अतिरेकी गटांना बळाच्या जोरावर मोडून काढण्याची भूमिका बदलून तिथे संवादाची प्रक्रिया सुरू करण्याचा जो निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, त्याचे स्वागतच करायला हवे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ आॅगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात काश्मीर प्रश्न ‘ना गोली से, ना गाली से, गले मिलने से’ सोडवण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात मात्र केंद्राकडून अशा गळाभेटीची तयारी दिसत नव्हती. केंद्र सरकारमध्येच हा प्रश्न कसा सोडवावा, याबाबत एकमत होत नव्हते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी एकवेळ आम्ही पाकिस्तानशी बोलू, पण हुर्रियत कॉन्फरन्सच्या नेत्यांशी चर्चा करणार नाही, अशी टोकाची भूमिका घेतली होती. त्यानंतर हुर्रियतच्या नेत्यांची चौकशी, त्यांना अटक व नजरकैदेत ठेवणे सुरू झाले. त्यामुळे काश्मिरी जनतेशी चर्चा करायला केंद्र सरकार खरोखर तयार आहे की नाही, याविषयी संभ्रम होता. अखेर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी काश्मीरमधील विविध गटांशी चर्चा करण्यासाठी दिनेश्वर शर्मा यांची नियुक्ती करीत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे गेली अनेक वर्षे अशांत असलेल्या या राज्यात संवादातून प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न सुरू होतील. म्हणूनच काँग्रेसपासून नॅशनल कॉन्फरन्सपर्यंत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या तीन वर्षांत काश्मिरींशी संवाद तुटल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. ते भरून काढण्यासाठी बरेच काही करावे लागेल. मधल्या काळात तिथे दहशतवादी कारवाया वाढल्या, त्यांना स्थानिकांची मदत वाढत गेली, सुरक्षा दलांवर दगडफेकीच्या घटनांत वाढ झाली. कधी नव्हे ते महिलाही रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करू लागल्या. जमावाला पांगवताना पेलेट गनचा वापर केल्याने शेकडो लोक जखमी झाले, काहींना अंधत्व आले आणि काही मरण पावले. त्यातून केंद्र सरकार लष्कराच्या जोरावर आपल्याला दाबू पाहत आहे, अशी भावना काश्मीरमध्ये निर्माण झाली. सारेच काश्मिरी हे दहशतवादी आहेत वा त्यांचे समर्थक आहेत, असे चित्र निर्माण झाले. सामान्य काश्मिरी लोकांत एकटे पडल्याची भावना निर्माण झाली. तसे होणे धोकादायकच होते. शिक्षण, रोजगाराचे प्रश्न सोडवण्याऐवजी सरकारी यंत्रणेकडून केवळ दंडुका आणि बंदुका यांचाच वापर होतो, असे वाटून अधिकाधिक तरुण तिथे अतिरेक्यांना मदत करू लागले होते. संवाद वा चर्चेमुळे हे प्रकार लगेच बंद होतील, असे नव्हे. पण केंद्र सरकार आपल्याशी चर्चा करायला तरी तयार आहे, असे लक्षात आल्याने वातावरण सामान्य व्हायला मदत होईल. डॉ. मनमोहन सिंग सरकारने पत्रकार दिलीप पाडगावकर यांच्यासह तिघांना चर्चेसाठी नेमले होते. त्याआधी वाजपेयी सरकारने एन. एन. व्होरा यांची नेमणूक केली होती. ते सध्या काश्मीरचे राज्यपाल आहेत. त्याचे चांगले परिणाम होत होते. आता दिनेश्वर शर्मा यांनी हुर्रियतशी चर्चा करायला आपण तयार आहोत, हुर्रियतचे नेतेही भारतीय आहेत, अशी सर्वसमावेशक भूमिका घेतली आहे. त्यामुळे संवादातून निश्चितच चांगले घडेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. पण संवादप्रक्रिया मध्येच थांबता कामा नये. ती सुरूच राहायला हवी. तरच काश्मिरी जनतेत विश्वासाचे वातावरण तयार होईल. तेथील जनतेचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडवण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. तिथे मेहबुबा मुफ्ती सरकारचा जनतेशी संबंध नाही. केंद्राविषयीही काहीसा आकस आहे. दोन्ही सरकारांविषयीचे हे वातावरण दूर करून प्रश्न सोडवण्यासाठी खरोखर प्रयत्न होत आहेत, हे जनतेत बिंबवण्याचे मोठे आव्हान दिनेश्वर शर्मा यांच्यापुढे आहे. मात्र त्यासाठी बंदुका आणि दंडुका यांचा वापर सावधपणे व अपवादानेच व्हायला हवा.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह