शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

अस्वस्थ केजरीवाल

By admin | Updated: July 11, 2016 04:04 IST

सामान्यत: लोकाना आक्रमकता भावत असते, मग ती कुठल्याही क्षेत्रातली असोे. अट एकच, त्या आक्रमकतेत विखार नसावा आणि तिला भांडकुदळपणाचे स्वरुप प्राप्त होता कामा नये

सामान्यत: लोकाना आक्रमकता भावत असते, मग ती कुठल्याही क्षेत्रातली असोे. अट एकच, त्या आक्रमकतेत विखार नसावा आणि तिला भांडकुदळपणाचे स्वरुप प्राप्त होता कामा नये. अर्थात आक्रमकता आणि भांडखोर वृत्ती यातील सीमारेषा तशी अस्पष्ट असते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तर ती दिसतच नसावी किंवा मान्य नसावी असे दिसते. त्यापायी सकारण वा अकारण सतत भांडणारा राजकारणी अशी त्यांची प्रतिमा होत चालली आहे. दिल्ली शहर प्रथमपासून केन्द्रशासित प्रदेश होता आणि तिथे शहराच्या कारभारासाठी महापालिका होती. १९९३मध्ये घटना दुरुस्तीच्या मार्गे दिल्ली विधानसभा अस्तित्वात आली आणि केजरीवालांपर्यंत एकूण चार मुख्यमंत्री तिथे होऊन गेले. पैकी काँग्रेसच्या शीला दीक्षित तर सलग दहा वर्षे मुख्यमंत्री होत्या. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा ही या चौघांची आणि विशेषत: श्रीमती दीक्षित यांचीही मागणी होती. पण ती पूर्ण झाली नाही म्हणून त्यांनी थयथयाट केला असे काही झाले नाही. त्याचबरोबर दिल्लीचे काही अडले असेही नाही. पण केजरीवालांची बातच न्यारी. मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांचे गाडे या एकाच मागणीवर अडून बसले असून ती पूर्ण होत नसल्याने ते केवळ या एकाच नव्हे तर अनेक बाबतीत नरेन्द्र मोदी यांना खलपुरुष ठरवीत आहेत. त्यांच्या प्रधान सचिवांच्या कार्यालयावर सीबीआयने छापा टाकला तेव्हांही त्यांनी मोदींच्याच नावे बोटे मोडली होती. आता त्या अधिकाऱ्यास लाच प्रकरणी अटकच झाली आहे. परिणामी मोदी आपल्याला हवे ते देत नाही म्हणून त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाकडे धाव घेतली. न्यायालयाकडून आपल्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा अशी त्यांची अपेक्षा होती. केजरीवालांना राज्यघटनेतील संबंधित तरतुदीचे स्पष्टीकरण करुन हवे होते. पण उच्च न्यायालयाने मुळात स्वत:च्याच कार्यकक्षेचा मुद्दा उपस्थित करुन निकाल राखून ठेवला. त्यावर केजरीवालांनी सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली. पण आता या वरिष्ठ न्यायालयाने त्यांनाच धरुन चांगले फटकारले आहे. उच्च न्यायालयाचा निवाडा येऊ द्या मग पाहू असे त्याने म्हटले. मुळात आपल्या तथाकथित अधिकारांसाठी केजरीवाल इतके कासावीस का होत आहेत आणि उच्च न्यायालयाला डावलून ते आमच्याकडे का आले आहेत याबद्दल सर्वात आधी सर्वोच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. या झगड्याचे मूळ आहे ते मुळात जमीन विषयक धोरणात्मक निर्णय, पोलीस यंत्रणेवर नियंत्रण, दिल्लीतील कायदा व सुव्यवस्था स्थिती आणि बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या. हे चारही अधिकार केजरीवाल यांना हवे आहेत आणि केन्द्र सरकार ते सोडण्यास तयार नाही. पण केवळ मोदी सरकारच ते सोडीत नाही असे नाही तर संपुआच्या राजवटीत त्या सरकारनेदेखील ते सोडले नव्हते. शीला दीक्षित तर काँग्रेसच्याच होत्या पण त्यांच्या आधी भाजपाचे जे तीन मुख्यमंत्री होऊन गेले त्यांनीदेखील केजरीवाल करतात तशा थयथयाट केला नव्हता. एकटे केजरीवाल जे अस्वस्थ आहेत त्यामागे म्हणूनच आक्रमकतेपेक्षा खोडसाळपणा अधिक असल्याचे दिसून येते.