शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अस्वस्थ अरविंद

By admin | Updated: June 17, 2016 10:02 IST

देशातील भले तीस टक्के लोकानी का होईना भाजपाला देशाच्या सत्तेत आणि नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी बसविले आहे व ही स्थिती अजून तीनेक वर्षे तशीच राहाणार आहे

देेशातील भले तीस टक्के लोकानी का होईना भाजपाला देशाच्या सत्तेत आणि नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी बसविले आहे व ही स्थिती अजून तीनेक वर्षे तशीच राहाणार आहे. परंतु ही बाब ज्या अनेकाना आजही रुचलेली नाही आणि त्यामुळेच ज्यांना मोदीज्वर वा मोदी फोबियाने ग्रासले आहे अशा लोकांच्या यादीत अग्रक्रमाने झळकतात ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल. वस्तुत: ते एका संपूर्ण राज्याचेही नव्हे तर अर्ध्याकच्च्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत व मोदी संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे बरोबरी वा ईर्ष्या करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तरीही केजरीवाल ती करीत असतात आणि प्रत्येक गोष्टीचे खापर मोदींवर फोडत राहून मोदी आपल्याला घाबरतात अशी शेखी मिरवीत असतात. याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे त्यांच्या एकवीस आमदारांवर लटकू लागलेली अपात्रतेची तलवार. या साऱ्यांना त्यांनी संसदीय सचिव म्हणून नियुक्त करुन टाकले. केन्द्रीय गृह मंत्रालयानुसार घटनेतील तरतुदीप्रमाणे दिल्लीत एकूण आमदारांच्या संख्येच्या दहा टक्क््यांपेक्षा अधिकाना संसदीय सचिव म्हणून नेमताच येत नाही. अन्य राज्यांमध्ये हे प्रमाण पंधरा टक्क््यांचे असले तरी ज्या काही राज्यांनी संसदीय सचिव नेमले होते, त्यांच्या नेमणुकाही न्यायप्रविष्ट झाल्या आहेत. कारण लाभप्रद पदांच्या व्याख्येत हे पद मोडते. साहजिकच लाभाची दोन पदे धारण करता येत नसल्याने ‘आप’च्या आमदारांवर संक्रांत येऊ शकते हे पाहून केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत एक विधेयक मंजूर करुन घेऊन पूर्वलक्षी प्रभावाने आपल्या आमदारांवर येऊ पाहाणारे संकट टाळण्याचा प्रयत्न केला, पण विधेयक राष्ट्रपतींनी फेटाळले व केजरीवालांनी पंतप्रधानांच्या नावाने खडे फोडण्यास सुरुवात केली. पण त्याआधी बरेच काही घडून गेले होते. आमदारांची घाऊक पद्धतीने लाभाच्या पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या बरखास्तीसाठी राष्ट्रपतींकडे एका वकिलाने गेल्या मार्च महिन्यातच एक जनहित याचिका सादर केली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने सर्व संबंधित आमदारांचे खुलासे मागविले. त्यापैकी बहुतेकानी आपले काम प्रशिक्षणार्थीसारखे आहे, आपण संबंधित मंत्र्यांना जनतेचा अभिप्राय कळवत असतो आणि घरचे खाऊन लष्करच्या भाकरी भाजतो असे सांगितले. पण प्रत्यक्षात काही आमदारांना दिल्ली सरकारच्या सचिवालयात स्वतंत्र खोल्या आणि कर्मचारीही दिले आहेत. तरीही जे आमदार स्वत:ला प्रशिक्षणार्थी म्हणवून घेतात त्यांना तसेच संबोधले गेले असते तर हरकत येण्याचे कारण नव्हते. केजरीवालांनी ते केले नाही व तोंडघशी पडले. यात मोदी कुठून आले?