शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाचे गांभीर्य समजेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2016 03:29 IST

‘मेक इन इंडिया’ सप्ताहात निम्म्यापेक्षा जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात आणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार कामगिरी केली आहे. मेक इन महाराष्ट्र त्यांनी मार्गी लावले.

- यदू जोशी‘मेक इन इंडिया’ सप्ताहात निम्म्यापेक्षा जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात आणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार कामगिरी केली आहे. मेक इन महाराष्ट्र त्यांनी मार्गी लावले. आता येत्या चार महिन्यात विदर्भ, मराठवाड्यातील दुष्काळ निवारणाचे मिशन हाती घेण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी सरकार अनेक उपाययोजना करीत आहे पण तरीही शेतकरी आत्महत्त्या थांबत नाहीत. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे पण सरकारी यंत्रणेला पाझर फुटत नाही, हे मुख्य कारण आहे. १४ दुष्काळी जिल्ह्यांमध्ये सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली तशी जबाबदारी मंत्र्यांनाही वाटून दिली पाहिजे. दुष्काळी उपाययोजनांवर नजर ठेवण्यासाठी मंत्र्यांनी कॅम्प केले पाहिजे. सचिव हलून चालणार नाही; तहसीलदार, तलाठी, गावातला डॉक्टर, कृषी खात्याचा कर्मचारी हलला पाहिजे. गावातले कर्मचारी गावात राहत नाहीत. सातव्या वेतन आयोगाचे वेध लागलेली नोकरशाही सहाव्या वेतन आयोगाच्या पगाराला किती न्याय देते याचे आॅडिट झाले पाहिजे. लोकांना धान्य वेळेत मिळत नाही. उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडीच्या सरपंच भाग्यश्री कदम यांचा परवा फोन होता. रेशनचे धान्य दुकानदार वेळेत देत नसल्याने लोकांचे हाल होतात, असे त्या सांगत होत्या. शासकीय यंत्रणेचा वचक नसल्याचे हे लक्षण आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी दुष्काळी भागात तनमनाने काम करण्याची हमी राज्याला देण्याची गरज आहे. अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे साटेलोटे तोडण्याची गरज आहे. नया दिन नई रात या सिनेमात संजीवकुमारच्या नऊ भूमिका होत्या. सध्याचे मुख्यमंत्री तेच करीत आहेत. मेक इन इंडियापासून जलयुक्त शिवारपर्यंत आणि महसूल विभागाचे निर्णय फिरवून सरकारची प्रतिमा सावरण्यापर्यंतची कसरत त्यांना करावी लागत आहे. धोनी इतरांकडून चांगली कामगिरी करवून घेतो म्हणून यशस्वी कॅप्टन आहे. सरकार वन मॅन आर्मी बनले तर यशाचे श्रेय मुख्यमंत्र्यांनाच मिळेल पण अपयशाचे खापरही त्यांच्यावरच फुटेल. एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, पंकजा मुंडे, दिवाकर रावते अशा दमदार मंत्र्यांनी दुष्काळी भागात तळ ठोकण्याची गरज आहे. चांगले निर्णय घेऊनही खडसे वादग्रस्त विधानांमुळे ‘आ बैल मुझे मार’ करून घेताना दिसतात. गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांकडे कामे घेऊन जाण्यात सर्वात पुढे असतात पण राज्यातील सिंचन प्रकल्पांची कामे काही पुढे सरकत नाहीत. भाजपा पक्षसंघटनेने दुष्काळ निवारणात स्वत:ला झोकून दिल्याचे दिसत नाही. शिवसैनिकांचा वाली कोण? आपले कार्यालय आणि भाजपाची पक्षसंघटना यात समन्वयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे दीर्घकाळापासूनचे मित्र श्रीकांत भारतीय यांना ओएसडी म्हणून नेमले. गावखेड्यातील सामान्य कार्यकर्त्यांपासून आमदार-खासदारांपर्यंत भारतीयांच्या माध्यमातून सीएम कनेक्ट उपलब्ध झाला आहे. मंत्रालयात येणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी ७० टक्के भाजपाचे असतात. मित्रपक्ष शिवसेनेचे कार्यकर्ते तुरळक दिसतात. ते जत्रेत हरवल्यासारखा चेहरा करून मंत्रालयात फिरत असतात. ‘जय भवानी, जय शिवाजी’ची घोषणा देत तग धरून असलेल्या कार्यकर्त्यांना आपले सरकार असल्यासारखे अजूनही वाटत नाही. ते वाटावे यासाठी समन्वयाच्या कायमस्वरूपी व्यवस्थेचा आदेश मातोश्रीवरून निघेल का? परावलंबी तिवारी१४ जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्त्या रोखण्यासाठी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्षपद विदर्भाचे चळवळे कार्यकर्ते किशोर तिवारी यांना मुख्यमंत्र्यांनी दिले. पण खालच्या यंत्रणेने त्यांना अमरावतीत बारा बाय बाराची खोली कार्यालय म्हणून दिली. स्टाफही दिला नाही. पेट्रोल-डिझेलचा खर्चही नियमित मिळत नाही, असे तिवारीच परवा सांगत होते. आधी तिवारींचं स्वावलंबन करा मग मिशनचे पाहू!