शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

आगामी निवडणुकीसाठी बिनविरोध परंपरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 04:16 IST

कडेगाव-पलूस मतदारसंघातील राजकीय संघर्ष संपलेला नाही. डॉ. पतंगराव कदम यांनी केलेल्या कार्याचे वारसदार आता व्हावे लागेल, त्या उंचीवर पोहोचावे लागेल, तरच दोन्ही बाजूूने संघर्षासही पात्र ठरतील.

- वसंत भोसलेकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. पतंगराव कदम यांचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनाने रिक्त झालेल्या सांगली जिल्ह्यातील कडेगाव-पलूस विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली होती. ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि डॉ. कदम यांचे चिरंजीव युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांना विधानसभेवर पाठवावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, त्याप्रमाणे घडेल असे वाटत नव्हते. कारण या मतदारसंघाने डॉ. पतंगराव कदम यांच्या रूपाने गेली ३८ वर्षे संघर्ष पाहिला आहे. या संघर्षात अखेर पतंगराव कदम यांनी बाजी मारली होती, तरी तो सहजासहजी संपणारा नव्हता.सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या या मतदारसंघाचे पूर्वीचे नाव भिलवडी-वांगी असे होते. सांगली जिल्ह्यातील तासगाव आणि खानापूर तालुक्यांचा पश्चिम भाग म्हणजे हा मतदारसंघ होता. तासगावचा भाग कृष्णा नदीच्या तीरावर पसरलेला, तर खानापूरचा भाग हा उंचावर आणि डोंगराळ तसेच दुष्काळी पट्ट्यात समाविष्ट असलेला. या दोन्ही भागाचे तालुके करण्यात आले. त्यातून कडेगाव आणि पलूस तालुके झाले. या मतदारसंघातून पतंगराव कदम यांनी १९८० पासून नऊवेळा निवडणुका लढविल्या. त्यामध्ये १९९७ च्या पोटनिवडणुकीचा समावेश आहे. यापैकी पोटनिवडणुकीसह तीनवेळा ते पराभूत झाले आणि सहावेळा विजयी झाले. त्यांच्या परंपरागत विरोधात डाव्या विचारांचे क्रांतिअग्रणी जी.डी. बापू लाड होते. तत्पूर्वी काँग्रेसचेच संपतराव चव्हाण आमदार होते. त्यांच्या विरोधात पतंगरावांनी संघर्ष केला. जी. डी. लाड यांच्या विरोधात संघर्ष झाला. या दोघांच्या पराभवानंतर १९९५ मध्ये काँग्रेसमधील दुसऱ्या गटाचे प्रतिनिधित्व करणाºया संपतराव देशमुख यांचा गट तयार झाला. त्यांनी अपक्ष राहून १९९५ मध्ये पतंगराव यांचा पराभव केला. त्याला लाड गटाचा पाठिंबा राहिला. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पुन्हा पराभव झाला. देशमुख यांचे चिरंजीव संग्रामसिंह देशमुख भाजपकडून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत.अशा पार्श्वभूमीवर पतंगराव कदम यांच्या निधनानंतर लगेच संघर्ष होणे उचित नव्हते. उलट सहानुभूतीचा लाभ विश्वजित कदम यांना झाला असता. कारण या मतदारसंघातील संघर्षात ते अखेर अपराजित राहिले. शिवाय विद्यमान विधानसभेची मुदत सव्वा वर्षाची राहिली आहे. त्याऐवजी विरोधासाठी विरोध न करता बिनविरोधाची पद्धत पाडून सहानुभूतीला विराम देण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. संपतराव देशमुख यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत हे घडले नाही; पण आम्ही नवा पायंडा पाडत आहोत असे सांगून पुढील राजकारणाची दिशा स्पष्ट करणारा तो एक इशाराही म्हणावा लागेल. विजयाची खात्री कमी, सहानुभूतीचा लाभ आणि बिनविरोध निवडणूक करून एक नवी सहानुभूती अशा त्रिसूत्रीतून ही प्रक्रिया पार पडली आहे. याचा अर्थ कडेगाव-पलूस मतदारसंघातील राजकीय संघर्ष संपलेला नाही. डॉ. पतंगराव कदम यांनी केलेल्या कार्याचे वारसदार आता व्हावे लागेल, त्या उंचीवर पोहोचावे लागेल, तरच दोन्ही बाजूूने संघर्षासही पात्र ठरतील. विश्वजित कदम यांना संधी आहे आणि विरोधी राजकारण करणाºयांनाही आता सत्तारूढ म्हणून गती मिळाली आहे. त्यातच आगामी निवडणुकीची पेरणी होणार आहे.आमदार विश्वजित कदम यांच्यावर दोन प्रकारचा दबाव असणार आहे. एक त्यांच्या पिताश्रींच्या कामाशी सतत तुलना होणार आणि अपेक्षाही तशीच राहणार आहे. दुसरी बाजू विरोधक जिल्हा, राज्यात आणि केंद्रातही सत्ताधारी आहेत, त्यांच्याशी संघर्षाची तयारी करावी लागेल. हे दबाव समर्थपणे पेलून पित्याचा राजकीय वारसा टिकविण्याचे आव्हान आता त्यांच्यापुढे आहे.

टॅग्स :Vishwajeet Kadamविश्वजीत कदम