शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

अविश्वासार्हतेचे शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 06:17 IST

प्रश्नपत्रिकांचे चार संच करणे, पर्यवेक्षकांनाही परीक्षा केंद्रात मोबाइलवर बंदी घालण्यापासून भरारी पथकांची संख्या वाढविण्यापर्यंत अनेक उपाय झाले.

प्रश्नपत्रिकांचे चार संच करणे, पर्यवेक्षकांनाही परीक्षा केंद्रात मोबाइलवर बंदी घालण्यापासून भरारी पथकांची संख्या वाढविण्यापर्यंत अनेक उपाय झाले. परंतु, प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रमाण कमी होण्यास तयार नाही. पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच फुटलेले पेपर व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हायरल होऊन राज्यभरात पोहोचतात. यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने अनेक उपाययोजनांवर चर्चा केली. गेल्या वर्षी सूचनाही मागविण्यात आल्या होत्या. याचाच एक भाग म्हणून यंदाच्या वर्षीपासून प्रत्येक वर्गातील प्रश्नपत्रिकांचे सीलबंद पाकीट विद्यार्थ्यांच्या सहीने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. उशिरा येणाºया विद्यार्थ्यांकडूनच प्रश्नपत्रिका फोडण्याचे प्रकार होत असल्याचे दिसून आल्याने या वर्षीपासून उशिरा येणाºया कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात प्रवेश द्यायचा नाही, असा निर्णय घेण्यात आला. तरीही सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामधील एका केंद्रावर इंग्रजीचा पेपर फुटलाच. या प्रकारांना रोखायचे कसे, हा प्रश्न आहे. वास्तविक, तंत्रज्ञानाचा वापर करून पेपर फुटण्याचे प्रकार घडत असतील, तर त्याला रोखण्यासाठीही तंत्रज्ञान वापरणे अपेक्षित आहे. गेल्या वर्षीच्या सूचनांत एक किंवा दोन पानांच्या असणाºया प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांवर इंटरनेटच्या माध्यमातून पाठविण्यात याव्यात व तेथे त्यांची छपाई व्हावी, असा विचार पुढे आला होता. प्रश्नपत्रिकेतील मानवी हस्तक्षेप दूर करण्यासाठी प्रत्येक विषयाची ‘क्वेश्चन बँक’ तयार करून संगणकीय प्रणालीमार्फत प्रश्नपत्रिकेचे संच तयार करण्याबाबत चर्चा झाली. मोबाइलवरून व्हायरल होऊ न देण्यासाठी परीक्षा केंद्रांवर मोबाइल जॅमर आणि आवश्यक तेथे सीसीटीव्ही बसविण्याचाही विचार झाला. प्रशासकीय पातळीवर होऊ शकणाºया सुधारणा बासनात गेल्या. फक्त उशिरा पोहोचणाºया विद्यार्थ्याला प्रवेश द्यायचा नाही, ही एकमेव सूचना अमलात आणली गेली. त्यामुळे दुखणे तसेच राहिले. वास्तविक, शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात अशी लबाडी होणेच गैर आहे. परंतु, पाल्यांना केवळ ‘गुणवंतराव’ करण्यात धन्यता मानणारे पालकच पेपर मिळविण्यासाठी प्रयत्न करतात. पर्यवेक्षकही शिक्षकाचा धर्म विसरतात. पेपर फार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले नाहीत किंवा एका तासानंतर ते मिळूनही उपयोग नाही, असाही युक्तिवाद पेपरफुटीबाबत होतो. परंतु, एक लक्षात घ्यायला हवे की, अशा घटनांमुळे कोवळ्या वयातच विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास उडून जात आहे. राजकारणापासून प्रशासनापर्यंत आणि आर्थिक व्यवहारापर्यंतची अनेक क्षेत्रे आपली विश्वासार्हता गमावून बसलेली आहेत. शालेय शिक्षणक्षेत्राने तरी ती गमावू नये!