शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
2
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
3
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
4
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
6
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
7
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
8
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
9
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
10
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
11
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
12
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
13
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
14
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
15
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
16
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
17
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
18
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
19
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
20
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

अविश्वासार्हतेचे शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 06:17 IST

प्रश्नपत्रिकांचे चार संच करणे, पर्यवेक्षकांनाही परीक्षा केंद्रात मोबाइलवर बंदी घालण्यापासून भरारी पथकांची संख्या वाढविण्यापर्यंत अनेक उपाय झाले.

प्रश्नपत्रिकांचे चार संच करणे, पर्यवेक्षकांनाही परीक्षा केंद्रात मोबाइलवर बंदी घालण्यापासून भरारी पथकांची संख्या वाढविण्यापर्यंत अनेक उपाय झाले. परंतु, प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रमाण कमी होण्यास तयार नाही. पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच फुटलेले पेपर व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हायरल होऊन राज्यभरात पोहोचतात. यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने अनेक उपाययोजनांवर चर्चा केली. गेल्या वर्षी सूचनाही मागविण्यात आल्या होत्या. याचाच एक भाग म्हणून यंदाच्या वर्षीपासून प्रत्येक वर्गातील प्रश्नपत्रिकांचे सीलबंद पाकीट विद्यार्थ्यांच्या सहीने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. उशिरा येणाºया विद्यार्थ्यांकडूनच प्रश्नपत्रिका फोडण्याचे प्रकार होत असल्याचे दिसून आल्याने या वर्षीपासून उशिरा येणाºया कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात प्रवेश द्यायचा नाही, असा निर्णय घेण्यात आला. तरीही सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामधील एका केंद्रावर इंग्रजीचा पेपर फुटलाच. या प्रकारांना रोखायचे कसे, हा प्रश्न आहे. वास्तविक, तंत्रज्ञानाचा वापर करून पेपर फुटण्याचे प्रकार घडत असतील, तर त्याला रोखण्यासाठीही तंत्रज्ञान वापरणे अपेक्षित आहे. गेल्या वर्षीच्या सूचनांत एक किंवा दोन पानांच्या असणाºया प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांवर इंटरनेटच्या माध्यमातून पाठविण्यात याव्यात व तेथे त्यांची छपाई व्हावी, असा विचार पुढे आला होता. प्रश्नपत्रिकेतील मानवी हस्तक्षेप दूर करण्यासाठी प्रत्येक विषयाची ‘क्वेश्चन बँक’ तयार करून संगणकीय प्रणालीमार्फत प्रश्नपत्रिकेचे संच तयार करण्याबाबत चर्चा झाली. मोबाइलवरून व्हायरल होऊ न देण्यासाठी परीक्षा केंद्रांवर मोबाइल जॅमर आणि आवश्यक तेथे सीसीटीव्ही बसविण्याचाही विचार झाला. प्रशासकीय पातळीवर होऊ शकणाºया सुधारणा बासनात गेल्या. फक्त उशिरा पोहोचणाºया विद्यार्थ्याला प्रवेश द्यायचा नाही, ही एकमेव सूचना अमलात आणली गेली. त्यामुळे दुखणे तसेच राहिले. वास्तविक, शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात अशी लबाडी होणेच गैर आहे. परंतु, पाल्यांना केवळ ‘गुणवंतराव’ करण्यात धन्यता मानणारे पालकच पेपर मिळविण्यासाठी प्रयत्न करतात. पर्यवेक्षकही शिक्षकाचा धर्म विसरतात. पेपर फार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले नाहीत किंवा एका तासानंतर ते मिळूनही उपयोग नाही, असाही युक्तिवाद पेपरफुटीबाबत होतो. परंतु, एक लक्षात घ्यायला हवे की, अशा घटनांमुळे कोवळ्या वयातच विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास उडून जात आहे. राजकारणापासून प्रशासनापर्यंत आणि आर्थिक व्यवहारापर्यंतची अनेक क्षेत्रे आपली विश्वासार्हता गमावून बसलेली आहेत. शालेय शिक्षणक्षेत्राने तरी ती गमावू नये!