शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

शहरांच्या गळ्याभोवती अनधिकृत होर्डिंग्जचा फास!

By किरण अग्रवाल | Updated: May 19, 2024 11:15 IST

Unauthorized hoardings : घाटकोपर प्रकरणानंतर जागी झालेली यंत्रणा आतापर्यंत झोपली होती काय?

- किरण अग्रवाल

शहरातच नव्हे, तर खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेले होर्डिंग्जचे लोण पाहता त्याच्या मजबुतीकडे लक्ष दिले जाणे गरजेचे बनले आहे. सध्याचे वादळी वारा, पावसाचे दिवस पाहता अनधिकृत होर्डिंग्जचा निकाल लावताना अधिकृत असलेल्या होर्डिंग्जचेही 'स्ट्रक्चरल ऑडिट' व्हायला हवे.

दुर्घटना घडत नाही तोपर्यंत यंत्रणा जागच्या हालत नाहीत, हेच खरे; त्यामुळे जिल्ह्यापासून ते तालुकास्तरापर्यंतच्या शहरांना अनधिकृत होर्डिंग्जचा फास बसला असला तरी तेथील स्थानिक प्रशासन घाटकोपरसारखी जीवघेणी घटना घडण्याची वाट पाहत बसल्याचेच दिसून यावे हे केवळ बेफिकीरपणाचेच नव्हे, तर संतापजनकही म्हणता यावे.

घाटकोपरमधील होर्डिंग्ज कोसळून त्याखाली १४ जणांचा जीव गेल्याची व काही जण जखमी झाल्याची दुर्घटना नुकतीच घडल्यावर आता जागोजागचे स्थानिक प्रशासन झोपेतून जागे झाले आहे. आपापल्या शहरात किती होर्डिंग्ज अधिकृत व किती अनधिकृत, याचा शोध घेऊन आता संबंधितांना नोटीसही बजावल्या जात आहेत व स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. खरे तर मागेच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अशा अनधिकृत होर्डिंग्ज व पोस्टर्स संदर्भात निर्देश दिले होते. तेव्हा काही ठिकाणी जुजबी, तोंडदेखली कार्यवाही केलीही गेली; परंतु पुढे सारे सपाट झाले आणि आता घाटकोपरमध्ये काही जीव गेल्यावर पुन्हा यंत्रणा कामाला लागल्या आहेत. तेव्हा मुळात हा उशीर करणाऱ्या यंत्रणांमधील संबंधितांवरच दप्तर दिरंगाईच्या कारवाया केल्या जावयास हव्या.

लहान-मोठ्या सर्वच शहरांमध्ये हल्ली होर्डिंग्जचा सुळसुळाट झाला आहे, इतकेच नव्हे तर गाव खेड्यातही बसस्थानकांवर व हॉटेल्स आणि पान टपऱ्यांवर मोठमोठे पोस्टर्स उभारलेले दिसून येऊ लागले आहेत. स्वस्तात होणारी ही 'डिजिटल चमकोगिरी' जीवघेणी ठरणारी आहे, याचा संबंधितांकडून विचारच केला जात नाही. सध्या तर पाणी पावसाचे, वादळाचे दिवस आहेत. अवकाळी पावसासोबत जो वादळ वारा येतो, तो अनेकांच्या घरावरील टिन पत्रे उडवून नेतो. अशात अधिकतर तकलादू स्वरूपात असलेले होर्डिंग्ज कोसळून पडले तर ते जीवघेणेच ठरते, पण 'या भावात' चमकणाऱ्यांना व त्यासाठी जागा उपलब्ध करून पैसे कमावू पाहणाऱ्यांना याचे सोयरसुतक नाही.

घाटकोपरमध्ये घटना घडून गेल्यानंतर आपल्याकडे जागे झालेल्या प्रशासनाला आपापल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग्ज आढळून आले आहेत. अकोला, बुलढाणा व वाशिमसारख्या जिल्हा शहरांमध्ये त्याचे प्रमाण मोठे आहे. तेथील कोणतेही रस्ते व चौक उरले नाहीत, जेथे होर्डिंग्ज नाहीत. काही चौक तर असे आहेत, की जेथे थांबल्यावर झकपक करणाऱ्या डिजिटल वॉल्समुळे वाहन चालकांचे लक्ष विचलित झाल्याखेरीज राहत नाही. काही वाणिज्य संकुल व मुख्य रस्त्यालगतच्या खासगी इमारतधारकांनी प्रशासनाची परवानगी न घेताच आपापल्या इमारतींवरही मोठमोठे होर्डिंग्ज उभारले आहेत. असे करताना त्यांनी आपल्या सदनिकाधारकांच्या हवा पाण्याची सोय तर हिरावून घेतली आहेच, पण इतरांच्या जिवासाठी धोकाही निर्माण करून ठेवला आहे.

विशेष म्हणजे, स्थानिक प्रशासनाकडून १० होर्डिंग्जवर पोस्टर चिपकवण्याची परवानगी घेऊन पन्नास ठिकाणी पोस्टर्स लावणाऱ्यांवर काही एक कारवाई केली जाताना दिसून येत नाही. यातून प्रशासनाचा महसूल बुडतो, आणि अनधिकृत होर्डिंग्जबाजांचे खिसे गरम होतात. पण, मुद्दा तोही नाही, या अनधिकृत होर्डिंग्जची भक्कमता व त्याच्याशी संबंधित सुरक्षिततेची तपासणी तरी कुणी करणार आहे की नाही? तेच होत नाही हे दुर्दैव आहे. शिवाय, अधिकृत म्हणजे नोंदणीकृत होर्डिंग्ज तरी भक्कमच असतील याची खात्री कोण देणार? कमकुवत पायावर उभे असलेले हेच होर्डिंग्ज वादळी वाऱ्यात जीवघेणे ठरतात. घाटकोपरच्या घटनेने यासंदर्भातील धडा अधोरेखित करून दिला आहे.

सारांशात, धोकादायक होर्डिंग्जचा अनधिकृत बाजार रोखायचा असेल तर स्थानिक प्रशासनाने खंबीरपणे संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे आहे, इतकेच नव्हे तर प्रत्येक होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याची मजबुतीही तपासली जाणे गरजेचे आहे. दुर्घटना घडून कोणाचे जीव जाण्यापूर्वी हे व्हायला हवे.