शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

हे तर अघोषित अमानवी युद्धच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 06:08 IST

डिसेंबर, १९९९ मध्ये इंडियन एअरलाइन्सचे आय-८१४ हे विमान काठमांडूहून नवी दिल्लीला जात असताना पळवून नेण्यात आले आणि तालिबानच्या ताब्यात असलेल्या कंदाहार येथे उतरविण्यात आले.

माणसे सतत दहशतीखाली वावरत असतात. मग ती दहशत अज्ञात घटकांची असो की, ठाऊक असलेल्या मानसिक वा शारीरिक घटकांची असो. दहशतवादी हल्ला मग तो माणसांवर असो की लष्करावर असो, तेथे मृत्यूची चाहूल असतेच असते. लष्कराचे जवान आपल्या आयुष्याची बाजी लावून देशाचे रक्षण आक्रमकांपासून करीत असतात, पण शस्त्र उचलण्याची संधीही न मिळता जवान मृत्युमुखी पडतात. तो दहशतवादी हल्लाच मानायचा का? युद्ध सुरू असताना काही नियम पाळायचे असतात, पण दहशतवादी हल्ल्यात कोणते नियम पाळण्यात येतात? पलीकडून होणारा दहशतवाद आहे, असे म्हणून स्वस्थ बसता येईल का? केंद्रीय राखीव दलाचे ४४ जवान एका झटक्यात जेव्हा मारले जातात, तेव्हा तो दहशतवादी हल्ला नसतो, तर ते युद्धाचे कृत्य असते! गुप्तचर संघटनेचे अपयश असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. हा तर देशांतर्गत घातपातच म्हणावा लागेल. त्यामागे पाकिस्तानात राहून इशारे देणाऱ्या जैश-ए-महंमद संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याचाच हात असल्याचे समजले जाते.

डिसेंबर, १९९९ मध्ये इंडियन एअरलाइन्सचे आय-८१४ हे विमान काठमांडूहून नवी दिल्लीला जात असताना पळवून नेण्यात आले आणि तालिबानच्या ताब्यात असलेल्या कंदाहार येथे उतरविण्यात आले. या विमानातील प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आले होते आणि त्यांच्या सुटकेच्या बदल्यात मसूद अजहरसह तीन अतिरेक्यांच्या सुटकेची मागणी अपहरणकर्त्यांकडून करण्यात आली होती. त्या दहशतवाद्यांची मुक्तता करणे हे तत्कालीन सरकारचे अपयश समजायचे का? अशा तºहेच्या घटना जगभर कुठे ना कुठे घडतच असतात. लष्करी हालचालींचा गुप्तपणे सुरू असलेला त्या भाग असतात. तसाच प्रकार या घटनेत घडला नाही का? त्याच व्यक्तीकडून एका पिढीपासून दुसऱ्या पिढीतील लोकांपर्यंत ओलीस ठेवण्याचा प्रकार घडला नाही का?

जिहादी गटांना कोणतेही नियम नसतात. त्यांच्यावर जेव्हा हल्ला होतो, तेव्हा उंदराप्रमाणे बिळात लपण्याची त्यांची धडपड सुरू होते. मग अशा घटकांना कायद्याच्या मर्यादांच्या पलीकडे जाऊन संपवून टाकणे शक्य नाही का? अनेक नेत्यांनी स्वत:च्या स्वार्थी हेतूंसाठी त्यांना संपवून टाकण्याची इच्छा व्यक्त केली असताना, त्या व्यक्ती सत्तेवर आल्यावर, त्यांनी त्या उंदरांना बिनदिक्कतपणे बिळात लपू दिले आहे. उंदरांची बिळे दुर्लक्षित केली, तर ती अधिकाधिक वाढत जातात आणि त्यांचे जाळेच तयार होते, पण सत्तारूढ नेत्यांच्या हाती असलेल्या सत्तेच्या बळावर ही सर्व बिळे उद्ध्वस्त का करू नयेत? त्यासाठी राजकीय नेत्यांच्या पाठीचा कणा ताठ असायला हवा, पण त्याचा अभाव असणे हीच खरी समस्या आहे. त्याची फार मोठी किंमत जनतेला आणि सरकारलादेखील चुकवावी लागते.

वास्तविक, धार्मिक वेडाचाराला जगात कुठेही स्थान नाही. ही माणसे जर दहशतवादाचा आश्रय घेत असतील, तर सत्ताधाऱ्यांनी त्यांना तोंड देण्याची तयारी करायला हवी. बलात्काºयांवर कारवाई करण्यासाठी जशी विशेष न्यायालये आहेत, तशीच न्यायालये जिहादी तत्त्वांसाठीही असायला हवीत. त्यामुळे सूड घेणे सहज शक्य होईल. दहशतवादी मारले गेले, तरी दहशतवाद मरत नाही, हे जरी खरे असले, तरी या संकटाचा सामना करण्यासाठी निरनिराळे उपाय योजावे लागतील आणि बदला घेणे हा त्यापैकी एक असेल!

आपण सध्या डिजिटल युगात वास्तव्य करीत असल्याने, सीमेपलीकडून होणाºया हल्ल्यांना आणखी एक पैलू लाभला आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण आपल्या मुलांना आणि तरुणांना अधिक कट्टरपंथी बनवत आहोत. त्यातही काश्मीर खोºयाचे झपाट्याने धृवीकरण होत आहे. एकट्या अनंतनाग येथे पाचशेपेक्षा अधिक मदरसे असून, ते तरुणांना कसल्याही प्रकारचे शिक्षण देण्यास मोकळे आहेत. पाच वर्षांपासून मुलांना जिहादमुळे कोणता गौरव प्राप्त होतो, ते शिकविले जाते. काश्मीरमध्ये वापरल्या जाणाºया स्मार्टफोनमधील मजकूर धक्कादायक असतो आणि त्याला तोंड देण्याची कोणतीही योजना आपल्यापाशी नाही.

मेजर गौरव आर्य यांनी काश्मीर खोºयातल्या होणाºया धृवीकरणावर पुढील उपाय सुचविला आहे. काश्मीरच्या राजधानीत तंत्रज्ञानाने परिपूर्ण इमारत उभारण्यात यावी. त्यात काश्मिरी युवकांसह काही नागरिकही असावेत. ते लेखक असतील, व्हिडीओग्राफर असतील, हॅकर्स असतील, तसेच सोशल मीडियाचे तज्ज्ञ असतील. ते इस्लामी संस्कृतीचे तज्ज्ञ असावे. गीतलेखक आणि संगीतकारही असावेत. त्यांच्यामार्फत पाकिस्तानच्या प्रचाराला जबरदस्त प्रत्युत्तर देण्यात यावे. भारताची गाथा सांगू शकतील, अशा हजारो तरुण-तरुणींना एका व्यासपीठावर आणण्याची गरज आहे.

पाकिस्तानने भारताविरुद्ध जे अघोषित अमानवी युद्ध छेडले आहे, ते कोणत्याही प्रकारे आपण जिंकायला हवे. काश्मिरातून येणाºया शहीद झालेल्या जवानांच्या शवपेट्या थांबविण्यासाठी सर्व तºहेचे प्रयत्न केले पाहिजेत. मुख्य म्हणजे नागरिकांनी लष्करास सल्ला देणे बंद केले पाहिजे. त्यांना त्यांचे काम त्यांच्या पद्धतीने करू द्या, त्यांच्यात तेवढे शहाणपण आणि तेवढी क्षमता नक्कीच आहे!!- डॉ. एस. एस. मंठामाजी चेअरमन, एआयसीटीई एडीजे, प्रोफेसर, एनआयएएस, बंगळुरू.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला