शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

अस्मानी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 05:45 IST

मुंबईत घाटकोपरला भरवस्तीत चार्टर्ड विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत पायलटसह पाच जणांचा मृत्यू झाला; त्याचवेळी विमानतळाला लागून असलेल्या दाटीवाटीच्या वस्तीवर आलेले अस्मानी संकट थोडक्यात टळले

मुंबईत घाटकोपरला भरवस्तीत चार्टर्ड विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत पायलटसह पाच जणांचा मृत्यू झाला; त्याचवेळी विमानतळाला लागून असलेल्या दाटीवाटीच्या वस्तीवर आलेले अस्मानी संकट थोडक्यात टळले. आपत्काळात विमानाचा स्फोट झाल्यावरही पायलटनी त्यांच्या कौशल्याचा वापर करत शेवटच्या क्षणी हे विमान गर्दीच्या ठिकाणी कोसळणार नाही, याची दक्षता घेत भीषण दुर्घटना टाळली, याबद्दल त्यांचे कौतुक करायला हवे. मुळात उत्तर प्रदेश सरकारच्या मालकीचे असलेले हे विमान अलाहाबादला अपघातग्रस्त झाल्यावर त्या सरकारने विकले आणि दुरुस्तीसाठी साधारण चार वर्षे हँगरला ठेवल्यानंतर चाचणीसाठी गुरुवारी उडाले, ते परतलेच नाही; पण ज्या क्षणी ते कोसळले त्या क्षणी त्याने मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकवला. अशी दुर्घटना घडली, की मुंबई विमानतळाच्या धावपट्टीच्या क्षेत्रात असलेल्या बहुमजली झोपडपट्ट्या, विमानांच्या उड्डाणक्षेत्राच्या परिघात असलेल्या उंच इमारतींचा विषय दरवेळी चर्चेत येतो.कुणाला धावपट्टीवर येणाऱ्या कुत्र्यांचा विषय आठवतो, तर कुणाला खाद्याच्या शोधात फडफडणाºया आणि विमानांवर आदळणाºया पक्ष्यांचा. पण त्या भागातील मतदारांचा कैवार घेत वेगवेगळे राजकीय नेते झोपड्या हटवण्यास विरोध करतात. तोच प्रश्न इमारतींच्या उंचीचा. न्यायालयाने उंचीची मर्यादा आखून दिल्यानंतरही त्यातून पळवाटा काढण्यासाठी, दिलासा देण्यासाठी दबाव आणला जातो. पण मतांसाठी बेकायदा गोष्टींना पाठीशी घालण्याचा हा खेळ केवळ विमानातील प्रवाशांच्याच नव्हे, तर मुंबईकरांच्या जिवावर कसा उलटू शकतो, त्याची भयावह जाणीव घाटकोपरच्या घटनेने मुंबईकरांसह सर्व यंत्रणांना करून दिली. आधीच मुंबईचे हवामान, प्रदूषण यामुळे दृश्यमानता कमी होते. त्यात दाटीवाटीच्या वस्त्यांची भर पडते. अनेकदा विमाने उतरण्यास पुरेशी जागा न मिळाल्याने किंवा वैमानिकाचा अंदाज चुकल्याने पुन्हा उड्डाण घेत नव्याने विमाने उतरवावी लागतात. छेद देणाºया धावपट्टीमुळे आधीच मुंबई विमानतळाच्या क्षमतेवर मर्यादा येतात. नवी मुंबईतील विमानतळ पूर्ण होईपर्यंत या मर्यादांवर मात करत उड्डाणांचे नवनवे विक्रम केले जात आहेत. सध्या राज्यात विविध ठिकाणी छोटी विमानतळे कार्यरत करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सी प्लेनची संकल्पना प्रत्यक्षात येते आहे. वाहतुकीचे हे अवकाश अनेक मार्गांनी खुले करण्याची स्पर्धा सुरू असताना त्या सेवेची पायाभूत गरज असलेल्या धावपट्टीची आणि तिच्या सुरक्षिततेची गरज कळतेय, पण वळत नाही, अशा अवस्थेत सापडली आहे. वातावरण खराब असतानाही या विमानाची चाचणी घेण्यास भाग पाडल्याचा आरोप सहवैमानिक मारिया यांच्या पतीने केल्याने खाजगी विमानसेवेतील सुरक्षेचा, तथील गळेकापू स्पर्धेचा; परिणामी त्यातील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दाही समोर आला आहे. दुर्घटनेच्या तपासानिमित्ताने या साºयांचीच चौकशी होण्याची गरज आहे आणि कुणाचाही मुलाहिजा न बाळगता विमानांच्या उड्डाणांतील अडथळे दूर करण्याची, त्यांचा मार्ग मोकळा करण्याची गरज आहे. तोच इशारा या दुर्घटनेने दिला आहे.

टॅग्स :Mumbai Plane Crashमुंबई विमान दुर्घटना