शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
4
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
5
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
6
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
7
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
8
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
9
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
10
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
11
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
12
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
13
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
14
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
15
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
16
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
17
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
18
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
19
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
20
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत

अस्मानी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 05:45 IST

मुंबईत घाटकोपरला भरवस्तीत चार्टर्ड विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत पायलटसह पाच जणांचा मृत्यू झाला; त्याचवेळी विमानतळाला लागून असलेल्या दाटीवाटीच्या वस्तीवर आलेले अस्मानी संकट थोडक्यात टळले

मुंबईत घाटकोपरला भरवस्तीत चार्टर्ड विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत पायलटसह पाच जणांचा मृत्यू झाला; त्याचवेळी विमानतळाला लागून असलेल्या दाटीवाटीच्या वस्तीवर आलेले अस्मानी संकट थोडक्यात टळले. आपत्काळात विमानाचा स्फोट झाल्यावरही पायलटनी त्यांच्या कौशल्याचा वापर करत शेवटच्या क्षणी हे विमान गर्दीच्या ठिकाणी कोसळणार नाही, याची दक्षता घेत भीषण दुर्घटना टाळली, याबद्दल त्यांचे कौतुक करायला हवे. मुळात उत्तर प्रदेश सरकारच्या मालकीचे असलेले हे विमान अलाहाबादला अपघातग्रस्त झाल्यावर त्या सरकारने विकले आणि दुरुस्तीसाठी साधारण चार वर्षे हँगरला ठेवल्यानंतर चाचणीसाठी गुरुवारी उडाले, ते परतलेच नाही; पण ज्या क्षणी ते कोसळले त्या क्षणी त्याने मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकवला. अशी दुर्घटना घडली, की मुंबई विमानतळाच्या धावपट्टीच्या क्षेत्रात असलेल्या बहुमजली झोपडपट्ट्या, विमानांच्या उड्डाणक्षेत्राच्या परिघात असलेल्या उंच इमारतींचा विषय दरवेळी चर्चेत येतो.कुणाला धावपट्टीवर येणाऱ्या कुत्र्यांचा विषय आठवतो, तर कुणाला खाद्याच्या शोधात फडफडणाºया आणि विमानांवर आदळणाºया पक्ष्यांचा. पण त्या भागातील मतदारांचा कैवार घेत वेगवेगळे राजकीय नेते झोपड्या हटवण्यास विरोध करतात. तोच प्रश्न इमारतींच्या उंचीचा. न्यायालयाने उंचीची मर्यादा आखून दिल्यानंतरही त्यातून पळवाटा काढण्यासाठी, दिलासा देण्यासाठी दबाव आणला जातो. पण मतांसाठी बेकायदा गोष्टींना पाठीशी घालण्याचा हा खेळ केवळ विमानातील प्रवाशांच्याच नव्हे, तर मुंबईकरांच्या जिवावर कसा उलटू शकतो, त्याची भयावह जाणीव घाटकोपरच्या घटनेने मुंबईकरांसह सर्व यंत्रणांना करून दिली. आधीच मुंबईचे हवामान, प्रदूषण यामुळे दृश्यमानता कमी होते. त्यात दाटीवाटीच्या वस्त्यांची भर पडते. अनेकदा विमाने उतरण्यास पुरेशी जागा न मिळाल्याने किंवा वैमानिकाचा अंदाज चुकल्याने पुन्हा उड्डाण घेत नव्याने विमाने उतरवावी लागतात. छेद देणाºया धावपट्टीमुळे आधीच मुंबई विमानतळाच्या क्षमतेवर मर्यादा येतात. नवी मुंबईतील विमानतळ पूर्ण होईपर्यंत या मर्यादांवर मात करत उड्डाणांचे नवनवे विक्रम केले जात आहेत. सध्या राज्यात विविध ठिकाणी छोटी विमानतळे कार्यरत करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सी प्लेनची संकल्पना प्रत्यक्षात येते आहे. वाहतुकीचे हे अवकाश अनेक मार्गांनी खुले करण्याची स्पर्धा सुरू असताना त्या सेवेची पायाभूत गरज असलेल्या धावपट्टीची आणि तिच्या सुरक्षिततेची गरज कळतेय, पण वळत नाही, अशा अवस्थेत सापडली आहे. वातावरण खराब असतानाही या विमानाची चाचणी घेण्यास भाग पाडल्याचा आरोप सहवैमानिक मारिया यांच्या पतीने केल्याने खाजगी विमानसेवेतील सुरक्षेचा, तथील गळेकापू स्पर्धेचा; परिणामी त्यातील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दाही समोर आला आहे. दुर्घटनेच्या तपासानिमित्ताने या साºयांचीच चौकशी होण्याची गरज आहे आणि कुणाचाही मुलाहिजा न बाळगता विमानांच्या उड्डाणांतील अडथळे दूर करण्याची, त्यांचा मार्ग मोकळा करण्याची गरज आहे. तोच इशारा या दुर्घटनेने दिला आहे.

टॅग्स :Mumbai Plane Crashमुंबई विमान दुर्घटना