शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

दानवे-खोतकरांच्या जोर-बैठका अन सत्तारांची गांधीटोपी 

By सुधीर महाजन | Updated: February 8, 2019 12:18 IST

खोतकरांच्या जोडीला सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनीसुद्धा दानवेंना पराभूत करण्यासाठी डोईवरचे केस न वाढविण्याची प्रतिज्ञा घेतली.

- सुधीर महाजन

आपल्या जिल्ह्यातील राज्यमंत्री विकासाच्या गप्पा मारतात. त्यांनी पारध ते धामणगाव या रस्त्याचे काम करून दाखवावे, असे आव्हान खासदार रावसाहेब दानवेंनी देताच राज्यमंत्री अर्जुन खोतकर कामाला लागले. काम सुरू करण्यापूर्वी दानवेपुत्र आमदार संतोष यांनी रात्रीच घाईघाईत कामाचे उद्घाटन करून प्रारंभ केला. दानवे-खोतकर यांच्या राजकीय वैमनस्याचे हे ताजे उदाहरण; पण यामुळे का होईना, हा रस्ता चांगला झाला. जालन्याच्या राजकीय आखाड्यात सध्या हे दोघे भिडले आहेत. खोतकरांच्या जोडीला सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनीसुद्धा दानवेंना पराभूत करण्यासाठी डोईवरचे केस न वाढविण्याची प्रतिज्ञा घेतली. गेल्या दीड वर्षापासून या निमित्ताने का होईना गांधी टोपीचे दर्शन होते.

खोतकर गेल्या काही दिवसांपासून दानवेंच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढण्याची तयारी करताना दिसतात. परवा तर मुख्यमंत्र्यांनी दोघांच्या भांडणात जाहीर शिष्टाईचा प्रयत्न केला; परंतु खोतकर माघार घ्यायला तयार नाहीत. माघार घेतली तर ती राजकीय आत्महत्या ठरेल असे ते म्हणतात आणि आता तर दोघेही इरेला पेटले असल्याने शह-काटशहाच्या राजकारणाने जोर धरला आहे. मराठवाडा पॅकेजअंतर्गत पालकमंत्री या नात्याने खोतकरांनी ‘वैयक्तिक गाय वाटप योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला. ५० टक्के अनुदानावर गायीचे वाटप करण्याचे नियोजन केले. तसा हा पथदर्शी प्रकल्प होता; पण दानवेंनी त्यात खोडा घातला आणि ही योजना बासनात गेली. ही निवडणूक खोतकरांसाठी राजकीय अस्तित्वाची आहे. गेल्या वेळी ते २८६ इतक्या अल्पमतांनी विजयी झाले होते आणि गेल्या दीड-दोन वर्षांपासून त्यांनी जो दानवेंच्या विरोधात उघड पवित्रा घेतला, तो पाहता ते म्हणतात त्याप्रमाणे आता माघार घेणे ही राजकीय आत्महत्या ठरू शकते. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष त्यांच्या उमेदवारीसाठी पायघड्या टाकतील, अशी स्थिती आहे.

या राजकीय संघर्षाला २०१६ ची जिल्हा परिषद निवडणूक कारणीभूत आहे. भाजपचे २२ उमेदवार निवडून आले असताना खोतकरांनी शिवसेना-काँग्रेस अशी युती करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. त्यांची ही खेळी दानवेंच्या जिव्हारी लागली. कारण त्यांची कन्या आशा मुकेश पांडे या जि.प. अध्यक्षपदाच्या प्रबळ दावेदार होत्या. त्यामुळे हे अपयश त्यांनी वैयक्तिक घेतले. पुढे बाजार समितीतही त्यांनी भाजपला फारसे स्थान दिले नाही.

दुसरीकडे दानवेंनी जिल्हा व जालना शहरात विविध योजना  आणून खोतकरांना शह देण्याचा प्रयत्न केला जिल्हाभर रस्त्याची कामे हाती घेतली. ड्राय पोर्ट, रसायन संस्थासारखे महत्त्वाचे प्रकल्प आणले. कामाचा झपाटा दाखवून दिला. राजकारणाचा विचार केला, तर भोकरदन, बदनापूर या तालुक्यांवर त्यांचे राजकीय वर्चस्व आहे. तरी भोकरदनमध्ये कुठेतरी सत्तेच्या केंद्रीकरणावर नाराजी  दिसते. त्यांच्या मतदारसंघात औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघ येतो. आजवर त्यांचे व अब्दुल सत्तार यांचे ‘आतून’ साटेलोटे होते. दोघेही एकमेकांना रसद पुरवत असत; पण अचानक काय बिघडले याची वाच्यता झालेली नाही; पण आज दोघेही एकमेकांच्या विरोधात दिसतात. सत्तार यांनी ‘भीष्म प्रतिज्ञा’ केली आहे; पण या दोघांच्या भांडणावर सामान्य माणसाचा विश्वास नाही. वेळेवर दोघे हातमिळवणी करतील, असे त्यांना वाटते.  मुख्यमंत्र्यांनी परवा दोघांनाही जाहीरपणे समजुतीच्या चार गोष्टी सांगितल्या. त्या किती मनावर घेतल्या जातील, याचा लवकरच उलगडा होईल. घोडा-मैदान जवळच आहे. दोघे खरेच एकमेकांना भिडतात की, नुसते शड्डू ठोकत मतदारांचे मनोरंजन करतात, हे कळेलच.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेArjun Khotkarअर्जुन खोतकरAbdul Sattarअब्दुल सत्तारJalanaजालना